शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

कापूस खरेदी सुरू करा

By admin | Updated: October 21, 2015 02:41 IST

दिवाळी जवळ येऊनही अद्याप कापूस खरेदी सुरू झालेली नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी पेचात पडले आहेत.

शेतकऱ्यांची मागणी : बाभूळगाव संकलन केंद्रावर लक्षबाभूळगाव : दिवाळी जवळ येऊनही अद्याप कापूस खरेदी सुरू झालेली नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी पेचात पडले आहेत. बाभूळगाव कापूस संकलन केंद्रावर तातडीने खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत जवळपास सव्वाशे गावे जोडलेली आहे. बाभूळगाव संकलन केंद्रावर एक ते सव्वा लाख क्विंटल कापसाची आवक होण्याची शक्यता आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रामधील शेतकऱ्यांची कापूस संकलन केंद्र सुरू करण्याची मागणी आहे. कापूस वेचणीला प्रारंभ झाला आहे. दिवाळी जवळ आलेली असून कापूस खरेदी अद्यापपर्यंत सरू झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस कुठे न्यावा, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. यंदा कापसाचे उत्पादन पाहता लवकरात लवकर कापूस संकलन केंद्र सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. बाभूळगाव संकलन केंद्रापासून सर्व कापूस संकलन केंद्रही जवळपास २५-३० किलोमीटरवर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास होतो. कार्यक्षेत्रामध्ये दोन खासगी जिनिंग चालू अवस्थेत असून दोन सहकारी व फेडरेशन जिनिंग बंद अवस्थेत आहेत. सॉ जिनिंग हा कापूस पणन महासंघाच्या मालकीचा असून हा जीन बंद पडल्यामुळे बाभूळगाव बाजारपेठेमध्ये अवकळा पसरली आहे. त्यामुळे येथील लोकप्रतिनिधींनी सदर जीन चालू करण्याबाबत प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे झाल्यास बाभूळगावच्या बाजारपेठेला जुने वैभव प्राप्त होण्याची शक्यता आहे. बाभूळगाव बाजार समिती ही एकमेव संस्था कार्यरत असून धान्याच्या उत्पन्नावर या बाजार समितीचे अस्तित्व कायम आहे. येथे सध्या सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. सोयाबीनला ३५०० ते ३८०० असा भाव आहे. खासगी व्यापारी व सीसीआय यांचे धोरण निश्चित नसल्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष कापूस उत्पादक पणन महासंघाच्या ९ नोव्हेंबरच्या संचालक मंडळाच्या बैठकीकडे लागलेले आहे. त्यातच कापूस पणन महासंघाचा व सहकारी रामचंद्र जिनिंग बंद असल्यामुळे तसेच खासगी कापूस खरेदीची, सीसीआयची अनिश्चितता असल्यामुळे कापूस विक्रीसाठी कोठे न्यावा, हा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)