प्रश्न प्रलंबित : सरकारी कर्मचार्यांप्रमाणे वाढीव महागाई भत्त्याची मागणी यवतमाळ : प्रलंबित प्रश्नांकडे एसटी महामंडळ प्रशासन आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आगार आणि कार्यशाळेतील कामगारांनी निदर्शने केली. राज्य सरकारी कर्मचार्यांप्रमाणेच वाढीव दहा टक्के महागाई भत्ता कामगार करारानुसार लागू करून थकबाकीसह मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. कामगार करार २0१२-१६ होवून एक वर्षाचा कालावधी लोटला. मात्र कामगारांना अजूनही ५५0 कोटींची थकबाकी देण्यात आली नाही. शासनाकडून महामंडळाला घेणे असलेले एक हजार ८४0 कोटी मिळावे, इतर राज्याप्रमाणे प्रवासीकरात सूट द्यावी, पथकरातून सूट मिळावी, बंधनकारक परंतु फायद्याच्या नसलेल्या मार्गावरील बससेवेमुळे महामंडळाच्या होणार्या आर्थिक तोट्याची भरपाई शासनाने करून तशी तरतूद बजेटमध्ये करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. करार कायदे, परिपत्रकाचा होणारा भंग करून घेतलेले निर्णय रद्द करावे, न्यायालयाच्या आदेशानुसार अवैध प्रवासी वाहतूक थांबवावी, उत्पन्न वाढविण्यासाठी संघटनेने सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी आदी मागण्या करून निदर्शने करण्यात आली. याची दखल न घेतल्यास ४ जूनला आझाद मैदान मुंबई येथे धरणे आणि यानंतरही प्रश्न निकाली न निघाल्यास राज्यव्यापी चक्काजामचा इशारा देण्यात आला आहे. यवतमाळ कार्यशाळेसमोर या आंदोलनाचे नेतृत्त्व महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव सदाशिव शिवनकर यांनी केले. आंदोलनात विजय मुळे, प्रवीण बोनगीरवार, खेमराज जावडेकर, मो. इस्तीयाक, विलास डगवार, शंकर ठाकरे, प्रताप तरवरे, सै. इरफान, राहुल धार्मीक, लक्ष्मण गारशेलवार, उत्तम पाटील, रमेश पेटे, प्रकाश उईके आदी सहभागी झाले होते. नेर येथे सुद्धा धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी संघटनेचे अध्यक्ष एन. खान, नितीन चव्हाण, सलीम भाई, संजय ठाकरे, दिलीप नाईकर, संदीप मुने, रामदास बेले, अनिल गोंडाणे, राजेश कारमोरे, उमेश लोहकरे, मोहंमद नवादिन, राहुल बिजवे आदींसह शेकडो चालक, वाहक, कामगार उपस्थित होते. (वार्ताहर)
एसटी कामगारांची निदर्शने
By admin | Updated: May 28, 2014 00:00 IST