शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

तब्बल पाच महिन्यांनंतर एसटीचा दुखवटा संपला, ६५० कर्मचारी कामावर परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2022 17:29 IST

न्यायालयाच्या आदेशाला मान्य करीत एसटीच्या कर्मचाऱ्यांनी यवतमाळमध्ये संपातून माघार घेतली. शनिवारी हा दुखवटा संपविण्यात आला.

ठळक मुद्देआठवडाभरात सर्व एसटी बसेस धावणार

यवतमाळ : एसटीच्या विलीनीकरणासाठी कर्मचाऱ्यांनी पाच महिन्यांपासून बेमुदत संप सुरू केला होता. या प्रकरणात न्यायालयाने २२ मेपर्यंत पुन्हा कामावर रुजू होण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशाला मान्य करीत एसटीच्या कर्मचाऱ्यांनी यवतमाळमध्ये संपातून माघार घेतली. शनिवारी हा दुखवटा संपविण्यात आला.

यामुळे राज्य परिवहन महामंडळापुढे विविध अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. पुढील आठवडाभरात सर्व कर्मचारी कामावर रुजू होतील, अशी शक्यता आहे. ८ ते १५ एप्रिलपर्यंत ३०३ कर्मचारी कामावर रुजू झाले होते. यामुळे कामावर रुजू होणाऱ्या चालक-वाहकांची संख्या ६५० च्या घरात पोहोचली आहे. उर्वरित चालक-वाहक लवकरच कामावर रुजू होण्याची शक्यता आहे. सोमवारपासून फेऱ्या वाढतील.

२२ एप्रिलची डेडलाईन

न्यायालयाने कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याच्या सूचना दिल्या हाेत्या. त्यासाठी अवधी दिल्याने कर्मचारी परतण्यास सुरुवात झाली हाेती. यवतमाळातील आंदोलन सोमवारी संपेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, हे आंदोलन शनिवारीच मागे घेण्यात आले.

एसटीच्या फेऱ्या वाढणार

मर्यादित कर्मचाऱ्यांच्या संख्येमुळे एसटीने लांबपल्ल्याच्या गाड्यांकडे लक्ष वळविले होते. आता कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असल्याने प्रत्येक मार्गावर एसटीच्या फेऱ्या दिसण्यास सुरुवात होईल. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष करून ज्येष्ठ नागरिकांना याची मोठी मदत होणार आहे.

दरदिवसाला २५ लाखांचे उत्पन्न

तब्बल वर्षभर कोरोनामुळे एसटी बंद राहिली. यानंतर संपामुळे फटका बसला. आता एसटी पुन्हा रुळावर येत आहे. एसटीचे उत्पन्न २५ लाखांपर्यंत पोहोचले आहे.

६५० चालक-वाहक परतले

यापूर्वी कामावर परतणाऱ्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांची संख्या मोठी होती. यामुळे एसटीच्या फेऱ्या वाढल्या नव्हत्या. यामुळे प्रत्यक्षात एसटीच्या उत्पन्नात वाढ करणाऱ्या चालक-वाहकांची प्रतीक्षा होती.

नंतरच्या काळात चालक-वाहक कामावर रुजू होण्यास सुरुवात झाली. प्रारंभी ही संख्या ४५० च्या घरात होती. आता ही संख्या ६५० च्या घरात पोहोचली आहे. यामुळे एसटीच्या फेऱ्या वाढण्यास मदत होईल.

महामंडळाला पुन्हा प्रवासी मिळविण्याचे आव्हान

प्रत्येक गावखेड्यापर्यंत पोहोचलेली एसटी बस रुसली होती. यामुळे पाच महिन्यांपासून प्रवासी पर्यायी व्यवस्थेच्या आधारावर अवलंबून होते. आता हा आधार त्यांना मोलाचा वाटत आहे. यामुळे एसटी सुरू झाल्यानंतर एसटी बसकडे किती प्रवासी वळतात, त्यावर एसटीचे पुढील उत्पन्न अवलंबून राहणार आहे. त्यासाठी प्रयत्न करावे लागेल.

एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी परिवहन महामंडळाचे कर्मचारी पूर्णत: प्रयत्न करीत आहे. लवकरच इतरही कर्मचारी कामावर रुजू होतील आणि प्रवाशांना पूर्वीप्रमाणेच सेवा मिळेल. - प्रताप राठोड, विभागीय वाहतूक अधिकारी

टॅग्स :state transportएसटीST Strikeएसटी संप