शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

एसटी ड्रायव्हर-कंडक्टरची अवस्था काळीपिवळीवाल्यांसारखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:01 IST

लॉकडाऊनच्या नियमानुसार सध्या एसटी बसमध्ये बालके आणि वृद्धांना प्रवेश नाही. पण एसटी तोट्यात चालविण्यापेक्षा कंडक्टर-ड्रायव्हर याही प्रवाशांना एन्ट्री देत आहे. २२ प्रवासी गाडीत बसविताना ‘हाफ तिकिट’वाला एकही प्रवासी घेतला जात नाही. वृद्धांनाही फुल तिकिट लागतेय. शिवाय, सायंकाळच्या शेवटच्या फेरीच्या वेळी तर २५-३० प्रवासी बसवून नेले जाते.

ठळक मुद्देप्रवाशांसाठी कंठशोष : चला हाये का घाटंजी.. नेर.. आर्णीवालेऽऽऽ, एसटी चाललीच पाहिजे, ही सर्वाची भावना

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भाऊ कुठंसा चाल्ले? आर्णी हाये का? मंग यानं लागूनच हाये एसटी... राळेगाव असन तं १५ मिनिट लागते.. येते पन गाडी.. बसा जराकसे..!यवतमाळच्या बसस्थानकावर प्रवाशांना अक्षरश: धरून ठेवण्यासाठी महामंडळाच्या कंडक्टर-ड्रायव्हरला असा कंठशोष करावा लागत आहे. पूर्वी काळीपिवळी चालक असेच प्रवाशांना पकडून वाहनात कोंबायचे. आता ती वेळ परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर आली आहे.लॉकडाऊनमुळे लोकवाहिनी एसटी लोकांविना थांबली होती. आता ती कशीबशी सुरू झाली. मात्र लोक एसटीत बसायलाच तयार नाही. पण एसटीच्या उत्पन्नावरच चालक आणि वाहकांचे पगार अवलंबून आहेत. म्हणून हे कर्मचारी घर चालविण्यासाठी कसेही करून एसटी चाललीच पाहिजे, या भावनेने झटत आहेत.तब्बल अडीच महिन्यांच्या ‘ब्रेक’नंतर जिल्हांतर्गत वाहतूक एसटीने सुरू केली. परंतु, कोरोनाच्या भीतीपायी त्यात अटी लादल्या गेल्या. एका बसमध्ये केवळ २२ प्रवाशांना परवानगी आहे. त्यातही छोटी मुले अन् वयोवृद्धांना ‘एन्ट्री’च नाही. या दोन वयोगटाच्या मधला प्रवासी सध्या स्वत:च्या दुचाकीने प्रवास करण्यास प्राधान्य देतोय. त्यामुळे ‘येसटीचा डब्बा ढलढल रिकामा धावून रायला’ अशी व्यथित प्रतिक्रिया महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून ऐकायला मिळाली.यवतमाळ बसस्थानकावरचे शुक्रवारचे ताजे चित्र असे होते... राळेगावकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या शोधासाठी चालक विठ्ठल वनकर सर्वत्र चकरा मारत होते. मध्येच कोणी पिशवी वगैरे घेऊन दिसला की लगेच त्यांचा प्रश्न, ‘काय म्हंता साहेब, राळेगाव का पांढरकवडा?’ समोरच्याने हो म्हटले की ते त्याला संबंधित प्लॅटफॉर्मवर अदबीने बसण्याची सूचना करीत होते. मग थोड्या वेळाने घाटंजी-यवतमाळ (एमएच ४०/६०७८) ही बस दाखल झाली. सारे प्रवासी उतरल्यावर कंडक्टरने दहा-बारा प्रवाशांच्या चिल्लरचा प्रश्न मिटविला. पण तरीही ३० रुपये जास्तीचे कंडक्टरजवळ उरले. इतरवेळी हे पैसे कंडक्टरकडेच राहिले असते. पण या कंडक्टरने किमान १५ वेळा ओरडून ‘आरे हे पैसे कोणाचे राह्यले हो?’ म्हणून परिसर धुंडाळला. शेवटी १५ मिनिटांनी एक तरुण त्यांना शोधत आला अन् पैसे घेऊन गेला... मग या कंडक्टरची धडपड सुरू झाली घाटंजीकडे जाणारे प्रवासी शोधण्यासाठी. ‘का हो बावाजी कोण्या गावाले? कळंब का? मंग थे तिकडं लागून हाये गाडी.. जा तिकडं’ हे त्याचे शब्द म्हणजे प्रवाशांना देव मानून त्यांची मनोभावे आराधना करण्याचाच प्रयत्न होता.... अन् एवढे करूनही आमचा पगार अर्धाच !एसटी तोट्यात चालू नये, म्हणून कंडक्टर-ड्रायव्हर जीवाचे रान करीत आहेत. पण एवढे हाल भोगूनही आम्हाला ५० टक्केच पगार दिला जाणार आहे. त्यातूनच आमच्या वेगवेगळ्या ‘कपाती’ होणार आहेत. मग आमच्या हाती पगार म्हणून किती पैसे येणार? त्यात घर कसे चालणार? हे प्रश्न राळेगावचे चालक विठ्ठल वनकर यांनी मांडले.प्रवासी थांबविण्यासाठी कर्मचाऱ्यांची ड्युटीएसटी भरण्यासाठी एकेक तास लागत आहे. त्यामुळे राळेगाव, पांढरकवडा, वणी, पुसद आगार दरदिवशी दोन कर्मचारी यवतमाळ बसस्थानकावर पाठवित आहे. ते येथे आपल्या गावाकडचे प्रवासी शोधतात. बस येईपर्यंत त्यांना बसवून ठेवतात. यवतमाळातून बस निघाली की आपल्या आगाराला फोन करतात. मग तेथे थांबलेल्या प्रवाशांना बसचे लोकेशन सांगितले जाते.मुले-वृद्धांनाही बिनधोक एन्ट्रीलॉकडाऊनच्या नियमानुसार सध्या एसटी बसमध्ये बालके आणि वृद्धांना प्रवेश नाही. पण एसटी तोट्यात चालविण्यापेक्षा कंडक्टर-ड्रायव्हर याही प्रवाशांना एन्ट्री देत आहे. २२ प्रवासी गाडीत बसविताना ‘हाफ तिकिट’वाला एकही प्रवासी घेतला जात नाही. वृद्धांनाही फुल तिकिट लागतेय. शिवाय, सायंकाळच्या शेवटच्या फेरीच्या वेळी तर २५-३० प्रवासी बसवून नेले जाते.

टॅग्स :state transportएसटी