शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

एसटी महामंडळाने दिली अस्थायी कामगारांना बढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 22:24 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात प्रशासकीय कामांचा खेळखंडोबा सुरू आहे. आस्थापना विभागावर वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने हा प्रकार सुरू आहे.

ठळक मुद्देनियमांना तिलांजली : भविष्याची चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात प्रशासकीय कामांचा खेळखंडोबा सुरू आहे. आस्थापना विभागावर वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने हा प्रकार सुरू आहे. हजारावर कामगारांना मागील अनेक वर्षापासून स्थायी करण्यात आलेले नाही. यामध्ये भविष्यात कर्मचाऱ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे.एसटी महामंडळात रुजू झाल्यानंतर प्रथम वेतनवाढ देण्यापूर्वी कामगारांना स्थायी करणे आवश्यक आहे. मात्र यवतमाळ विभागात ही प्रक्रियाच मागील काही वर्षांपासून करण्यात आलेली नाही. या कर्मचाºयांना महामंडळाचे सर्व आर्थिक लाभ मिळत आहे. मात्र स्थायी करण्यात आले नसल्याने त्यांची सेवा नेमकी किती वर्ष झाली हा प्रश्न पुढील काळात निर्माण होण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे कामगारांना स्थायी करावे लागते यापासून काही कर्मचारी अनभिज्ञ आहेत. सदर प्रक्रियेची जबाबदारी सांभाळणारे कर्मचारी, पर्यवेक्षक आणि अधिकाºयांना यासाठी जबाबदार धरून कारवाई करावी तसेच जुन्या तारखेपासूनच स्थायी आदेश काढण्यात यावे, अशी मागणी या कामगारांमधून जोर धरू लागली आहे.दरम्यान एसटी कामगार सेनेचे विभागीय सचिव सुरेश कन्नाके यांनी यासंदर्भात विभाग नियंत्रकांकडे तक्रार नोंदविली आहे.खातेअंतर्गत बढतीस्थायी नसलेल्या कर्मचाऱ्यांना खाते अंतर्गत बढती देण्याची किमया यवतमाळ विभागात करण्यात आली आहे. स्थायी कर्मचाऱ्यांनाच अटी पूर्ण करत असल्यास बढती परीक्षेस परवानगी दिली जाते. यानंतरच पुढे बढती मिळते. यवतमाळात मात्र एसटी महामंडळाच्या सर्व नियमांना तिलांजली देवून अस्थायी कामगारांना बढती दिली गेली आणि दिली जात आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ