शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

SSC Result 2019: यवतमाळ जिल्ह्याचा दहावीचा निकाल १८ टक्क्यांनी घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 15:45 IST

अमरावती विभागीय शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत यंदा निकाल गतवर्षीच्या तुलनेत तब्बल १८ टक्क्यांनी घटला आहे.

ठळक मुद्देगुरुजी प्रॅक्टीकल गुणांच्या भ्रमात राहिल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अमरावती विभागीय शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत यंदा निकाल गतवर्षीच्या तुलनेत तब्बल १८ टक्क्यांनी घटला आहे. त्यासाठी विविध कारणे सांगितली जात असली तरी शिक्षण विभागाने या वर्षापासून बंद झालेले प्रात्यक्षिकाचे गुण हे प्रमुख कारण पुढे करून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न चालविला आहे.२०१७-१८ या शैक्षणिक वर्षात जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८३.९९ टक्के एवढा लागला होता. परंतु शनिवारी जाहीर झालेल्या शैक्षणिक सत्र २०१८-१९ च्या निकालाची टक्केवारी अवघी ६६.३३ एवढी नोंदविली गेली. वर्षभरात दहावीचा निकाल सुमारे १८ टक्क्यांनी घटला. अमरावती विभागात यवतमाळ जिल्हा सर्वात शेवटी अर्थात पाचव्या क्रमांकावर राहिला आहे. या घटलेल्या टक्केवारीमुळे जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे. ३४ टक्के विद्यार्थी दहावीत अनुत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षीपर्यंत सर्वच विषयात प्रात्यक्षिकाचे गुण दिले जात होते. परंतु यावर्षापासून हे गुण केवळ गणित व विज्ञान या विषयांपुरते मर्यादित करण्यात आले. त्याचा परिणाम निकालाच्या टक्केवारीवर झाल्याचे शिक्षण विभाग सांगत आहे. याशिवाय आठवीपर्यंत कुणालाही नापास न करण्याचा निर्णय, कॉपीमुक्ती अभियान, दहावीत विद्यार्थ्यांना लागणारे उच्चशिक्षणाचे वेध, दहावीतच या उच्च शिक्षणाची सुरू झालेली तयारी, त्यामुळे दहावीच्या अभ्यासाकडे होणारे दुर्लक्ष, मोबाईलचा वापर याबाबीही कारणीभूत ठरल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात सातत्याने बदल्यांच्या राजकारणात व्यस्त राहणाऱ्या शिक्षक मंडळींकडून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याकडे दुर्लक्ष केले गेल्याचा आरोप पालकवगार्तून केला जात आहे. नापास विद्यार्थ्यांमध्ये अनेक महागड्या व नामांकित कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचीही माहिती आहे.

मोटिव्हेशनमध्ये शिक्षक कमी पडलेजिल्ह्याच्या १८ टक्क्यांनी घटलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर लोकमतला सांगितले की, शिक्षक मंडळी विद्यार्थ्यांचे मोटिव्हेशन करण्यात कमी पडले, त्यांनी विद्यार्थ्यांवर त्याच्या यशासाठी पुरेसे परिश्रम घेतले नाही. गेल्या वर्षीची प्रॅक्टीकलच्या २० मार्कांची सवलत बंद झाली. मात्र शिक्षक वर्ग या सवलतीच्या भ्रमात राहिला. त्यातून शिक्षकांनी बाहेर निघून विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण प्रेरणादायी शिक्षण देणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात त्याकडे दुर्लक्ष झाले आणि बोर्डाने या शिक्षकांना झटका दिला, अशी प्रतिक्रिया या अधिकाऱ्याने नोंदविली. या घटलेल्या निकालासाठी बहुतांश शिक्षकांचे दुर्लक्षच कारणीभूत असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल