शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

SSC Result 2019: यवतमाळ जिल्ह्याचा दहावीचा निकाल १८ टक्क्यांनी घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 15:45 IST

अमरावती विभागीय शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत यंदा निकाल गतवर्षीच्या तुलनेत तब्बल १८ टक्क्यांनी घटला आहे.

ठळक मुद्देगुरुजी प्रॅक्टीकल गुणांच्या भ्रमात राहिल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अमरावती विभागीय शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत यंदा निकाल गतवर्षीच्या तुलनेत तब्बल १८ टक्क्यांनी घटला आहे. त्यासाठी विविध कारणे सांगितली जात असली तरी शिक्षण विभागाने या वर्षापासून बंद झालेले प्रात्यक्षिकाचे गुण हे प्रमुख कारण पुढे करून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न चालविला आहे.२०१७-१८ या शैक्षणिक वर्षात जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८३.९९ टक्के एवढा लागला होता. परंतु शनिवारी जाहीर झालेल्या शैक्षणिक सत्र २०१८-१९ च्या निकालाची टक्केवारी अवघी ६६.३३ एवढी नोंदविली गेली. वर्षभरात दहावीचा निकाल सुमारे १८ टक्क्यांनी घटला. अमरावती विभागात यवतमाळ जिल्हा सर्वात शेवटी अर्थात पाचव्या क्रमांकावर राहिला आहे. या घटलेल्या टक्केवारीमुळे जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे. ३४ टक्के विद्यार्थी दहावीत अनुत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षीपर्यंत सर्वच विषयात प्रात्यक्षिकाचे गुण दिले जात होते. परंतु यावर्षापासून हे गुण केवळ गणित व विज्ञान या विषयांपुरते मर्यादित करण्यात आले. त्याचा परिणाम निकालाच्या टक्केवारीवर झाल्याचे शिक्षण विभाग सांगत आहे. याशिवाय आठवीपर्यंत कुणालाही नापास न करण्याचा निर्णय, कॉपीमुक्ती अभियान, दहावीत विद्यार्थ्यांना लागणारे उच्चशिक्षणाचे वेध, दहावीतच या उच्च शिक्षणाची सुरू झालेली तयारी, त्यामुळे दहावीच्या अभ्यासाकडे होणारे दुर्लक्ष, मोबाईलचा वापर याबाबीही कारणीभूत ठरल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात सातत्याने बदल्यांच्या राजकारणात व्यस्त राहणाऱ्या शिक्षक मंडळींकडून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याकडे दुर्लक्ष केले गेल्याचा आरोप पालकवगार्तून केला जात आहे. नापास विद्यार्थ्यांमध्ये अनेक महागड्या व नामांकित कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचीही माहिती आहे.

मोटिव्हेशनमध्ये शिक्षक कमी पडलेजिल्ह्याच्या १८ टक्क्यांनी घटलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर लोकमतला सांगितले की, शिक्षक मंडळी विद्यार्थ्यांचे मोटिव्हेशन करण्यात कमी पडले, त्यांनी विद्यार्थ्यांवर त्याच्या यशासाठी पुरेसे परिश्रम घेतले नाही. गेल्या वर्षीची प्रॅक्टीकलच्या २० मार्कांची सवलत बंद झाली. मात्र शिक्षक वर्ग या सवलतीच्या भ्रमात राहिला. त्यातून शिक्षकांनी बाहेर निघून विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण प्रेरणादायी शिक्षण देणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात त्याकडे दुर्लक्ष झाले आणि बोर्डाने या शिक्षकांना झटका दिला, अशी प्रतिक्रिया या अधिकाऱ्याने नोंदविली. या घटलेल्या निकालासाठी बहुतांश शिक्षकांचे दुर्लक्षच कारणीभूत असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल