शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

राजकारणात मतदारांची बोळवण

By admin | Updated: October 30, 2016 00:23 IST

स्थानिक पातळीवर विशेषत: नगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षीय राजकारणाचे डावपेच फारसे प्रभावी ठरत नसतात

उमरखेड : स्थानिक पातळीवर विशेषत: नगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षीय राजकारणाचे डावपेच फारसे प्रभावी ठरत नसतात असा अलिकडे नेत्यांचा गोड समज होऊन बसलाय. हे सूत्र धरुन पक्षीय विचारसरणीला फाटा देण्याची प्रथा स्थानिक निवडणुकांमध्ये बोकाळून आघाड्यांचे राजकारण स्थानिक पातळीवर सरसकट दिसत आहे. उमरखेड नगरपालिकेतही तेच घडले. खरे तर कोणत्याच पक्षात एकवाक्यता अलिकडे राहिलेली नाही. लोकांना जे अपेक्षित असते ते कधीच घडत नसते. भाजपा-सेनेमध्ये स्थानिक स्तरावर तरी युती होईल, हे दोनही पक्ष एकत्रित लढतील असे उमरखेडच्या जनतेला वाटले होते. पण तसे घडलेच नाही. माहेश्वरी काँग्रेसचेच; परंतु कॉँग्रेसची कार्यशैली आणि काँग्रेसमधीलच काही अट्टाहासी लोकांवर ठपका ठेऊन माहेश्वरी गटाने भाजपाशी साठगाठ केली. सेनेचे भाजपाशी जुळण्याचे संकेत मुळीच दिसत नाहीत हे पाहून माहेश्वरी गटाने तातडीने भाजपाशी साठगाठ केली. इकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने माजी नगराध्यक्ष बाबा जागीरदार यांच्याशी जवळीक करण्याचा आटोकाट प्रयत्न सुरूच ठेवला. परंतु कोणत्याच गटाला जागीरदारांचा प्रत्यक्ष सहभाग मिळवता आला नाही. कारण जागीरदारांच्याच प्रयत्नाने नगराध्यक्षाच्या थेट निवडणुकीमध्ये एका प्रामाणिक विचारमंचाच्या माध्यमातून २००१ मध्ये प्रस्थापितांच्या सत्तेला उमरखेडमध्ये हादरा दिला होता हे विशेष. प्रत्येक गट जागीरदारांशी जवळीक साधण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. जनतेच्या मनात जागीरदारांची कारकीर्द अजूनही ताजी आहे. उमरखेडच्या जनतेला आता प्रामाणिक प्रशासनाची गरज आहे. सर्वसामान्य माणसाला त्यांच्या अधिकारातल्या सुख-सुविधा मिळतील काय? कर्मचाऱ्यांवरील अन्याय थांबेल काय ? सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य अबाधित राहील काय? इत्यादी प्रश्नांनी नागरिकांना घेरले आहे. सोईचे राजकारण करून निवडणुकीच्या तोंडावर आघाड्यांच्या कुबड्या घेऊन परत सत्तेत मिरवणाऱ्यांचीही आता नागरिकांना चीड येत आहे. (प्रतिनिधी)