शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

राजकारणात मतदारांची बोळवण

By admin | Updated: October 30, 2016 00:23 IST

स्थानिक पातळीवर विशेषत: नगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षीय राजकारणाचे डावपेच फारसे प्रभावी ठरत नसतात

उमरखेड : स्थानिक पातळीवर विशेषत: नगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षीय राजकारणाचे डावपेच फारसे प्रभावी ठरत नसतात असा अलिकडे नेत्यांचा गोड समज होऊन बसलाय. हे सूत्र धरुन पक्षीय विचारसरणीला फाटा देण्याची प्रथा स्थानिक निवडणुकांमध्ये बोकाळून आघाड्यांचे राजकारण स्थानिक पातळीवर सरसकट दिसत आहे. उमरखेड नगरपालिकेतही तेच घडले. खरे तर कोणत्याच पक्षात एकवाक्यता अलिकडे राहिलेली नाही. लोकांना जे अपेक्षित असते ते कधीच घडत नसते. भाजपा-सेनेमध्ये स्थानिक स्तरावर तरी युती होईल, हे दोनही पक्ष एकत्रित लढतील असे उमरखेडच्या जनतेला वाटले होते. पण तसे घडलेच नाही. माहेश्वरी काँग्रेसचेच; परंतु कॉँग्रेसची कार्यशैली आणि काँग्रेसमधीलच काही अट्टाहासी लोकांवर ठपका ठेऊन माहेश्वरी गटाने भाजपाशी साठगाठ केली. सेनेचे भाजपाशी जुळण्याचे संकेत मुळीच दिसत नाहीत हे पाहून माहेश्वरी गटाने तातडीने भाजपाशी साठगाठ केली. इकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने माजी नगराध्यक्ष बाबा जागीरदार यांच्याशी जवळीक करण्याचा आटोकाट प्रयत्न सुरूच ठेवला. परंतु कोणत्याच गटाला जागीरदारांचा प्रत्यक्ष सहभाग मिळवता आला नाही. कारण जागीरदारांच्याच प्रयत्नाने नगराध्यक्षाच्या थेट निवडणुकीमध्ये एका प्रामाणिक विचारमंचाच्या माध्यमातून २००१ मध्ये प्रस्थापितांच्या सत्तेला उमरखेडमध्ये हादरा दिला होता हे विशेष. प्रत्येक गट जागीरदारांशी जवळीक साधण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. जनतेच्या मनात जागीरदारांची कारकीर्द अजूनही ताजी आहे. उमरखेडच्या जनतेला आता प्रामाणिक प्रशासनाची गरज आहे. सर्वसामान्य माणसाला त्यांच्या अधिकारातल्या सुख-सुविधा मिळतील काय? कर्मचाऱ्यांवरील अन्याय थांबेल काय ? सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य अबाधित राहील काय? इत्यादी प्रश्नांनी नागरिकांना घेरले आहे. सोईचे राजकारण करून निवडणुकीच्या तोंडावर आघाड्यांच्या कुबड्या घेऊन परत सत्तेत मिरवणाऱ्यांचीही आता नागरिकांना चीड येत आहे. (प्रतिनिधी)