शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कोळसा तस्करांच्या टोळ्यांमध्ये संघर्षाची ठिणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 05:01 IST

खाणीतील ढिगा-यातून कोळसा लुटून नेण्याची जणू स्पर्धाच तस्करांच्या टोळ्यांमध्ये लागली आहे. ही ‘लूट’ सर्वच पातळ्यांवर ‘मॅनेज’ होत असल्याने टोळ्यांची संख्या वाढत आहे. या टोळ्यांच्या सदस्यांमध्ये संघर्षाची ठिणगीही पडत आहे. खाणीतून कोळसा पळविण्यासाठी शस्त्रांचाही खुलेआम वापर होत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.

वणी (यवतमाळ) - खाणीतील ढिगा-यातून कोळसा लुटून नेण्याची जणू स्पर्धाच तस्करांच्या टोळ्यांमध्ये लागली आहे. ही ‘लूट’ सर्वच पातळ्यांवर ‘मॅनेज’ होत असल्याने टोळ्यांची संख्या वाढत आहे. या टोळ्यांच्या सदस्यांमध्ये संघर्षाची ठिणगीही पडत आहे. खाणीतून कोळसा पळविण्यासाठी शस्त्रांचाही खुलेआम वापर होत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.वणी तालुक्यातील मुंगोली खाणीतून कोळसा लुटण्याच्या प्रकाराला सुरुवात झाली. या खाणीत घुग्घूस परिसरातील कोलमाफियांच्या टोळ्यांचा धुडगूस सुरू झाला. पाच वर्षांपूर्वी यातूनच या खाणीत तस्करांचे टोळीयुद्ध भडकले होते. एकमेकांना रिव्हॉल्व्हर दाखविण्यापर्यंत या सदस्यांची मजल गेली. आजही अधूनमधून असा प्रकार सुरू असतो. मात्र हा वाद पोलिसांपर्यंत येऊ न देता टोळ्यांचे म्होरके आपसातच ‘तडजोड’ करून प्रकरण मिटवित आहेत.दोन महिन्यांपूर्वी उकणी खाणीत रात्रीच्या वेळी अनधिकृतरीत्या शिरून पिक-अप वाहनात कोळसा भरण्याचा प्रयत्न सुरू असताना या तस्करांना सुरक्षा रक्षकांनी अडविले. परंतु सुरक्षा यंत्रणेला न जुमानता शस्त्राच्या धाकावर कोळसा पळविण्याचा प्रयत्न या तस्करांनी केला. मात्र, संबंधित सुरक्षा रक्षकांच्या मदतीला रात्रपाळीतील कामगार धावून आले व त्यांनी या तस्करांना खाणीतून पिटाळून लावले. या घटनेने संतप्त झालेल्या कामगारांनी दुस-या दिवशी पहिल्या पाळीत काम बंद आंदोलनही केले होते.राजकीय अभय असल्याने हे कोलमाफिया कुणालाही जुमानत नसल्याने वेकोलि प्रशासनालादेखील अनेकदा या कोलमाफियांपुढे नांगी टाकावी लागत आहे. काही अधिकारी जिवाच्या भीतीने कारवाई करीत नाहीत. या सर्व प्रकारात राष्टÑीय संपत्तीची मात्र अक्षरश: लूट सुरू आहे. कोलमाफियांमध्ये परप्रांतीयांचाही समावेश असून त्यांना कायद्याचा धाक उरला नसल्याचे पाहायला मिळते.कोळसा तस्करीमध्ये राजकीय पाठबळ असलेले किंवा थेट राजकीय पक्षाशी संबंध असलेले अनेक घटक आपले हात काळे करून घेत असल्याचेही बोलले जात आहे.वेकोलिची सुरक्षा यंत्रणा पांगळीतोटा सहन करावा लागत असल्याने वेकोलि प्रशासनाने खाणींमध्ये असलेली खासगी सुरक्षा यंत्रणा काढून घेतली. त्यानंतर खाणीच्या सुरक्षेची जबाबदारी खाणीत काम करणाºया कामगारांवरच सोपविण्यात आली. विशेष म्हणजे कोळसा तस्करांच्या टोळ्यांकडे घातक शस्त्रे असतात. त्याउलट वेकोलिच्या सुरक्षा यंत्रणेकडे खाणीच्या सुरक्षेसाठी कोणतीही शस्त्रे देण्यात आली नाहीत. त्यामुळे कोळसा तस्करांच्या दंडेलीपुढे वेकोलिची सुरक्षा यंत्रणा पांगळी ठरत आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळMaharashtraमहाराष्ट्र