शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:01 IST

पेरणीनंतर पाऊस बरसला. मात्र शेतकºयांच्या शेतातील बियाणे उगवलेच नाही. यात नामांकित कंपन्यांसोबत काही नवख्या कंपन्यांचा समावेश आहे. यवतमाळ, दारव्हा, उमरखेड, पुसद, वणी आणि झरीजामणीसह इतरही तालुक्यातून बियाण्याची उगवण न झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यामुळे या क्षेत्रावर आता दुबार पेरणी करण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाकडे तक्रारींचा खच : अनेकांवर दुबार पेरणीची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. पेरलेले कंपनीचे बियाणे अनेक ठिकाणी उगवलेच नाही, अशा तक्रारी येत आहे. यामुळे कृषी विभाग हादरला आहे. शेतकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे.गतवर्षी सोयाबीन काढणीच्या वेळेस परतीचा पाऊस आला. यामुळे बिजोत्पादन क्षेत्रातील सोयाबीन बिजाला फटका बसला. यामुळे बाजारात सोयाबीन बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला. अचानक बाजारात सोयाबीन बियाण्याची गर्दी वाढली. आता हे सोयाबीन बियाणे बोगस निघाल्याच्या तक्रारी वाढत आहेत.पेरणीनंतर पाऊस बरसला. मात्र शेतकºयांच्या शेतातील बियाणे उगवलेच नाही. यात नामांकित कंपन्यांसोबत काही नवख्या कंपन्यांचा समावेश आहे. यवतमाळ, दारव्हा, उमरखेड, पुसद, वणी आणि झरीजामणीसह इतरही तालुक्यातून बियाण्याची उगवण न झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यामुळे या क्षेत्रावर आता दुबार पेरणी करण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.बाजारात विक्रीस आलेले सोयाबीन काही कंपन्यांनी बॅगमध्ये भरूनच विकले तर नाही ना, असा संशय शेतकरी उपस्थित करत आहे. काही बियाण्याच्या बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात कचराही आढळला. बाजारातील टंचाई लक्षात घेता शेतकºयांच्या माथी, असे बियाणे मारले तर गेले नाही ना, अशी ओरड होत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनच्या पेरण्या उलटत आहे. शेतकºयांनी जिल्हा कृषी अधीक्षकांसह कृषी विकास अधिकाºयांकडे तक्रारी नोंदविल्या आहेत. तालुका कृषी अधिकाºयांकडेही तक्रारी आल्या आहेत.घरचे बियाणे उगवलेकंपनीच्या बियाण्यावर पूर्ण भरवसा असल्याने शेतकरी दामदुप्पट भावात बियाणे खरेदी करतात. तर काही शेतकºयांनी घरचे बियाणे आणि विकतचे बियाणे शेतात पेरले. विकतचे बियाणे बाद झाले. मात्र घरचे बियाणे निघाले. एकाच दिवशी एकाच शेतात पेरणी केल्यावर हा प्रकार शेतकºयांच्या निदर्शनास आला. चिकणीचे शेतकरी अविनाश राऊत यांनी या प्रकारावर तीव्र संताप नोंदविलाशनिवारपासून करणार पंचनामेप्रत्येक तालुक्यात बोगस बियाण्याच्या तक्रारी येत आहे. त्यांची दखल घेत शनिवारपासून कृषी विभाग पंचनामे करणार आहे. शुक्रवारी खानगावचे शेतकरी प्रमोदचंद मुराब, धानोºयाचे शेतकरी रवींद्र यादव, शैलेश यादव, राजेश यादव यांनी तक्रारी नोंदविल्या. याशिवाय यवतमाळ तालुक्यातील कामठवाडा शिवारातूनही काही तक्रारी आल्या आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती