लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. पेरलेले कंपनीचे बियाणे अनेक ठिकाणी उगवलेच नाही, अशा तक्रारी येत आहे. यामुळे कृषी विभाग हादरला आहे. शेतकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे.गतवर्षी सोयाबीन काढणीच्या वेळेस परतीचा पाऊस आला. यामुळे बिजोत्पादन क्षेत्रातील सोयाबीन बिजाला फटका बसला. यामुळे बाजारात सोयाबीन बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला. अचानक बाजारात सोयाबीन बियाण्याची गर्दी वाढली. आता हे सोयाबीन बियाणे बोगस निघाल्याच्या तक्रारी वाढत आहेत.पेरणीनंतर पाऊस बरसला. मात्र शेतकºयांच्या शेतातील बियाणे उगवलेच नाही. यात नामांकित कंपन्यांसोबत काही नवख्या कंपन्यांचा समावेश आहे. यवतमाळ, दारव्हा, उमरखेड, पुसद, वणी आणि झरीजामणीसह इतरही तालुक्यातून बियाण्याची उगवण न झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यामुळे या क्षेत्रावर आता दुबार पेरणी करण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.बाजारात विक्रीस आलेले सोयाबीन काही कंपन्यांनी बॅगमध्ये भरूनच विकले तर नाही ना, असा संशय शेतकरी उपस्थित करत आहे. काही बियाण्याच्या बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात कचराही आढळला. बाजारातील टंचाई लक्षात घेता शेतकºयांच्या माथी, असे बियाणे मारले तर गेले नाही ना, अशी ओरड होत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनच्या पेरण्या उलटत आहे. शेतकºयांनी जिल्हा कृषी अधीक्षकांसह कृषी विकास अधिकाºयांकडे तक्रारी नोंदविल्या आहेत. तालुका कृषी अधिकाºयांकडेही तक्रारी आल्या आहेत.घरचे बियाणे उगवलेकंपनीच्या बियाण्यावर पूर्ण भरवसा असल्याने शेतकरी दामदुप्पट भावात बियाणे खरेदी करतात. तर काही शेतकºयांनी घरचे बियाणे आणि विकतचे बियाणे शेतात पेरले. विकतचे बियाणे बाद झाले. मात्र घरचे बियाणे निघाले. एकाच दिवशी एकाच शेतात पेरणी केल्यावर हा प्रकार शेतकºयांच्या निदर्शनास आला. चिकणीचे शेतकरी अविनाश राऊत यांनी या प्रकारावर तीव्र संताप नोंदविलाशनिवारपासून करणार पंचनामेप्रत्येक तालुक्यात बोगस बियाण्याच्या तक्रारी येत आहे. त्यांची दखल घेत शनिवारपासून कृषी विभाग पंचनामे करणार आहे. शुक्रवारी खानगावचे शेतकरी प्रमोदचंद मुराब, धानोºयाचे शेतकरी रवींद्र यादव, शैलेश यादव, राजेश यादव यांनी तक्रारी नोंदविल्या. याशिवाय यवतमाळ तालुक्यातील कामठवाडा शिवारातूनही काही तक्रारी आल्या आहेत.
सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:01 IST
पेरणीनंतर पाऊस बरसला. मात्र शेतकºयांच्या शेतातील बियाणे उगवलेच नाही. यात नामांकित कंपन्यांसोबत काही नवख्या कंपन्यांचा समावेश आहे. यवतमाळ, दारव्हा, उमरखेड, पुसद, वणी आणि झरीजामणीसह इतरही तालुक्यातून बियाण्याची उगवण न झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यामुळे या क्षेत्रावर आता दुबार पेरणी करण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही
ठळक मुद्देकृषी विभागाकडे तक्रारींचा खच : अनेकांवर दुबार पेरणीची वेळ