शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:01 IST

पेरणीनंतर पाऊस बरसला. मात्र शेतकºयांच्या शेतातील बियाणे उगवलेच नाही. यात नामांकित कंपन्यांसोबत काही नवख्या कंपन्यांचा समावेश आहे. यवतमाळ, दारव्हा, उमरखेड, पुसद, वणी आणि झरीजामणीसह इतरही तालुक्यातून बियाण्याची उगवण न झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यामुळे या क्षेत्रावर आता दुबार पेरणी करण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाकडे तक्रारींचा खच : अनेकांवर दुबार पेरणीची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. पेरलेले कंपनीचे बियाणे अनेक ठिकाणी उगवलेच नाही, अशा तक्रारी येत आहे. यामुळे कृषी विभाग हादरला आहे. शेतकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे.गतवर्षी सोयाबीन काढणीच्या वेळेस परतीचा पाऊस आला. यामुळे बिजोत्पादन क्षेत्रातील सोयाबीन बिजाला फटका बसला. यामुळे बाजारात सोयाबीन बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला. अचानक बाजारात सोयाबीन बियाण्याची गर्दी वाढली. आता हे सोयाबीन बियाणे बोगस निघाल्याच्या तक्रारी वाढत आहेत.पेरणीनंतर पाऊस बरसला. मात्र शेतकºयांच्या शेतातील बियाणे उगवलेच नाही. यात नामांकित कंपन्यांसोबत काही नवख्या कंपन्यांचा समावेश आहे. यवतमाळ, दारव्हा, उमरखेड, पुसद, वणी आणि झरीजामणीसह इतरही तालुक्यातून बियाण्याची उगवण न झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यामुळे या क्षेत्रावर आता दुबार पेरणी करण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.बाजारात विक्रीस आलेले सोयाबीन काही कंपन्यांनी बॅगमध्ये भरूनच विकले तर नाही ना, असा संशय शेतकरी उपस्थित करत आहे. काही बियाण्याच्या बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात कचराही आढळला. बाजारातील टंचाई लक्षात घेता शेतकºयांच्या माथी, असे बियाणे मारले तर गेले नाही ना, अशी ओरड होत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनच्या पेरण्या उलटत आहे. शेतकºयांनी जिल्हा कृषी अधीक्षकांसह कृषी विकास अधिकाºयांकडे तक्रारी नोंदविल्या आहेत. तालुका कृषी अधिकाºयांकडेही तक्रारी आल्या आहेत.घरचे बियाणे उगवलेकंपनीच्या बियाण्यावर पूर्ण भरवसा असल्याने शेतकरी दामदुप्पट भावात बियाणे खरेदी करतात. तर काही शेतकºयांनी घरचे बियाणे आणि विकतचे बियाणे शेतात पेरले. विकतचे बियाणे बाद झाले. मात्र घरचे बियाणे निघाले. एकाच दिवशी एकाच शेतात पेरणी केल्यावर हा प्रकार शेतकºयांच्या निदर्शनास आला. चिकणीचे शेतकरी अविनाश राऊत यांनी या प्रकारावर तीव्र संताप नोंदविलाशनिवारपासून करणार पंचनामेप्रत्येक तालुक्यात बोगस बियाण्याच्या तक्रारी येत आहे. त्यांची दखल घेत शनिवारपासून कृषी विभाग पंचनामे करणार आहे. शुक्रवारी खानगावचे शेतकरी प्रमोदचंद मुराब, धानोºयाचे शेतकरी रवींद्र यादव, शैलेश यादव, राजेश यादव यांनी तक्रारी नोंदविल्या. याशिवाय यवतमाळ तालुक्यातील कामठवाडा शिवारातूनही काही तक्रारी आल्या आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती