शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:01 IST

पेरणीनंतर पाऊस बरसला. मात्र शेतकºयांच्या शेतातील बियाणे उगवलेच नाही. यात नामांकित कंपन्यांसोबत काही नवख्या कंपन्यांचा समावेश आहे. यवतमाळ, दारव्हा, उमरखेड, पुसद, वणी आणि झरीजामणीसह इतरही तालुक्यातून बियाण्याची उगवण न झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यामुळे या क्षेत्रावर आता दुबार पेरणी करण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाकडे तक्रारींचा खच : अनेकांवर दुबार पेरणीची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. पेरलेले कंपनीचे बियाणे अनेक ठिकाणी उगवलेच नाही, अशा तक्रारी येत आहे. यामुळे कृषी विभाग हादरला आहे. शेतकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे.गतवर्षी सोयाबीन काढणीच्या वेळेस परतीचा पाऊस आला. यामुळे बिजोत्पादन क्षेत्रातील सोयाबीन बिजाला फटका बसला. यामुळे बाजारात सोयाबीन बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला. अचानक बाजारात सोयाबीन बियाण्याची गर्दी वाढली. आता हे सोयाबीन बियाणे बोगस निघाल्याच्या तक्रारी वाढत आहेत.पेरणीनंतर पाऊस बरसला. मात्र शेतकºयांच्या शेतातील बियाणे उगवलेच नाही. यात नामांकित कंपन्यांसोबत काही नवख्या कंपन्यांचा समावेश आहे. यवतमाळ, दारव्हा, उमरखेड, पुसद, वणी आणि झरीजामणीसह इतरही तालुक्यातून बियाण्याची उगवण न झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यामुळे या क्षेत्रावर आता दुबार पेरणी करण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.बाजारात विक्रीस आलेले सोयाबीन काही कंपन्यांनी बॅगमध्ये भरूनच विकले तर नाही ना, असा संशय शेतकरी उपस्थित करत आहे. काही बियाण्याच्या बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात कचराही आढळला. बाजारातील टंचाई लक्षात घेता शेतकºयांच्या माथी, असे बियाणे मारले तर गेले नाही ना, अशी ओरड होत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनच्या पेरण्या उलटत आहे. शेतकºयांनी जिल्हा कृषी अधीक्षकांसह कृषी विकास अधिकाºयांकडे तक्रारी नोंदविल्या आहेत. तालुका कृषी अधिकाºयांकडेही तक्रारी आल्या आहेत.घरचे बियाणे उगवलेकंपनीच्या बियाण्यावर पूर्ण भरवसा असल्याने शेतकरी दामदुप्पट भावात बियाणे खरेदी करतात. तर काही शेतकºयांनी घरचे बियाणे आणि विकतचे बियाणे शेतात पेरले. विकतचे बियाणे बाद झाले. मात्र घरचे बियाणे निघाले. एकाच दिवशी एकाच शेतात पेरणी केल्यावर हा प्रकार शेतकºयांच्या निदर्शनास आला. चिकणीचे शेतकरी अविनाश राऊत यांनी या प्रकारावर तीव्र संताप नोंदविलाशनिवारपासून करणार पंचनामेप्रत्येक तालुक्यात बोगस बियाण्याच्या तक्रारी येत आहे. त्यांची दखल घेत शनिवारपासून कृषी विभाग पंचनामे करणार आहे. शुक्रवारी खानगावचे शेतकरी प्रमोदचंद मुराब, धानोºयाचे शेतकरी रवींद्र यादव, शैलेश यादव, राजेश यादव यांनी तक्रारी नोंदविल्या. याशिवाय यवतमाळ तालुक्यातील कामठवाडा शिवारातूनही काही तक्रारी आल्या आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती