शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

दोन लाख हेक्टरवर पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 22:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मानसूनपूर्व पावसाच्या दमदार आगमनाने जिल्ह्यात पहिल्याच आठवड्यात तब्बल दोन लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र कपाशीचे असल्याचे पुढे आले आहे. दरम्यान हवामान खात्याने २२ जूनपर्यंत उघडीप राहणार असल्याचा अंदाज वर्तविला. या काळात शेतकऱ्यांनी सिंचनाची दक्षता घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.जिल्ह्यात नऊ लाख हेक्टरवर ...

ठळक मुद्दे२२ जूनपर्यंत पावासाची उघडीप : जिल्ह्यात सर्वाधिक लागवड क्षेत्र कपाशीचे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मानसूनपूर्व पावसाच्या दमदार आगमनाने जिल्ह्यात पहिल्याच आठवड्यात तब्बल दोन लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र कपाशीचे असल्याचे पुढे आले आहे. दरम्यान हवामान खात्याने २२ जूनपर्यंत उघडीप राहणार असल्याचा अंदाज वर्तविला. या काळात शेतकऱ्यांनी सिंचनाची दक्षता घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.जिल्ह्यात नऊ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार आहे. यामधील एक लाख ३० हजार ९९४ हेक्टरवर शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे. २० हजार २६८ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली. १६ हजार ६१५ हेक्टरवर तूर, १२५० हेक्टरवर मूग, १०५० हेक्टरवर उडीद, ६६ हेक्टरवर ज्वारी आणि २४३० हेक्टरवर उसाची लागवड करण्यात आली.१२ ते २२ जूनपर्यंत जिल्ह्यात पावसाची उघडीप राहणार आहे. या काळात पिकांना ताण पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करताना घाई करू नये आणि सिंचनाची व्यवस्था असेल तरच पेरणीचा पुढाकार घ्यावा अन्यथा पेरणीसाठी प्रतीक्षा करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.एकीकडे पावसाने विश्रांती घेतलेली असली तरी अनेक शेतकऱ्यांना अद्याप बियाणे खरेदीची तजवीज करता आलेली नाही. अद्याप पीककर्ज कधी मिळेल याच प्रतीक्षेत अनेकजण ताटकळत आहे. पाऊस पुरेसा बरसल्यावरही या शेतकऱ्यांची पेरणी पैशाविना खोळंबण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात कापसाच्या विक्रमी पेऱ्याचे संकेतयावर्षी खुल्या बाजारात कापसाचे दर तेज राहतील. असा प्राथमिक अहवाल जागतिक बाजारातून पुढे आला आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल अचानक कापसाच्या लागवडीकडे वळला आहे. यातून कृषी विभागाचा अंदाजही मागे पडला आहे. पहिल्या टप्प्याच्या पेरणीत एक लाख ४० हजार हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. आठ दिवसाच्या या अहवालाने जिल्ह्यातील कपाशी लागवडीचे क्षेत्र सर्वाधिक असल्याचे पुढे आले आहे. ८० टक्के क्षेत्रातल्या पेरण्या बाकी आहे. कृषी केंद्रातून मोठ्या प्रमाणात कपाशीची विक्री होत आहे. यामुळे गतवर्षीपेक्षाही जास्त क्षेत्रावर कापसाची लागवड होण्याचा अंदाज आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी