शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
4
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
5
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
6
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
7
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
8
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
9
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
10
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
11
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
12
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
13
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
14
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
15
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
16
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
17
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
18
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
19
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
20
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख हेक्टरवर पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 22:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मानसूनपूर्व पावसाच्या दमदार आगमनाने जिल्ह्यात पहिल्याच आठवड्यात तब्बल दोन लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र कपाशीचे असल्याचे पुढे आले आहे. दरम्यान हवामान खात्याने २२ जूनपर्यंत उघडीप राहणार असल्याचा अंदाज वर्तविला. या काळात शेतकऱ्यांनी सिंचनाची दक्षता घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.जिल्ह्यात नऊ लाख हेक्टरवर ...

ठळक मुद्दे२२ जूनपर्यंत पावासाची उघडीप : जिल्ह्यात सर्वाधिक लागवड क्षेत्र कपाशीचे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मानसूनपूर्व पावसाच्या दमदार आगमनाने जिल्ह्यात पहिल्याच आठवड्यात तब्बल दोन लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र कपाशीचे असल्याचे पुढे आले आहे. दरम्यान हवामान खात्याने २२ जूनपर्यंत उघडीप राहणार असल्याचा अंदाज वर्तविला. या काळात शेतकऱ्यांनी सिंचनाची दक्षता घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.जिल्ह्यात नऊ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार आहे. यामधील एक लाख ३० हजार ९९४ हेक्टरवर शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे. २० हजार २६८ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली. १६ हजार ६१५ हेक्टरवर तूर, १२५० हेक्टरवर मूग, १०५० हेक्टरवर उडीद, ६६ हेक्टरवर ज्वारी आणि २४३० हेक्टरवर उसाची लागवड करण्यात आली.१२ ते २२ जूनपर्यंत जिल्ह्यात पावसाची उघडीप राहणार आहे. या काळात पिकांना ताण पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करताना घाई करू नये आणि सिंचनाची व्यवस्था असेल तरच पेरणीचा पुढाकार घ्यावा अन्यथा पेरणीसाठी प्रतीक्षा करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.एकीकडे पावसाने विश्रांती घेतलेली असली तरी अनेक शेतकऱ्यांना अद्याप बियाणे खरेदीची तजवीज करता आलेली नाही. अद्याप पीककर्ज कधी मिळेल याच प्रतीक्षेत अनेकजण ताटकळत आहे. पाऊस पुरेसा बरसल्यावरही या शेतकऱ्यांची पेरणी पैशाविना खोळंबण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात कापसाच्या विक्रमी पेऱ्याचे संकेतयावर्षी खुल्या बाजारात कापसाचे दर तेज राहतील. असा प्राथमिक अहवाल जागतिक बाजारातून पुढे आला आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल अचानक कापसाच्या लागवडीकडे वळला आहे. यातून कृषी विभागाचा अंदाजही मागे पडला आहे. पहिल्या टप्प्याच्या पेरणीत एक लाख ४० हजार हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. आठ दिवसाच्या या अहवालाने जिल्ह्यातील कपाशी लागवडीचे क्षेत्र सर्वाधिक असल्याचे पुढे आले आहे. ८० टक्के क्षेत्रातल्या पेरण्या बाकी आहे. कृषी केंद्रातून मोठ्या प्रमाणात कपाशीची विक्री होत आहे. यामुळे गतवर्षीपेक्षाही जास्त क्षेत्रावर कापसाची लागवड होण्याचा अंदाज आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी