शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

शालेय स्रेहभोजनातून सामाजिक सलोख्याचे बीजारोपण

By admin | Updated: February 4, 2016 02:27 IST

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माणूस माणसापासून दूर जात आहे. सिमेंट काँक्रिटच्या जंगलातील माणसे आत्मकेंद्री तर गावगाड्यातील माणसे वेगवेगळ्या कारणांनी विभाजित झाली आहे.

विवेक ठाकरे दारव्हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माणूस माणसापासून दूर जात आहे. सिमेंट काँक्रिटच्या जंगलातील माणसे आत्मकेंद्री तर गावगाड्यातील माणसे वेगवेगळ्या कारणांनी विभाजित झाली आहे. अशा गावखेड्यात सामाजिक सलोखा पुन्हा जिवंत व्हावा म्हणून दारव्हा पंचायत समितीने पुढाकार घेतला आहे. लोकसहभागातून स्रेहभोजनाचे कार्यक्रम शाळांमध्ये आयोजित करून सामाजिक सलोख्याचे बीजारोपण केले जात आहे. तालुक्यातील ८० शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला आहे. दारव्हा पंचायत समितीअंतर्गत १३५ शाळा आहे. या शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्याचा विडा गटशिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी आणि विस्तार अधिकारी विकास घाडगे यांनी घेतला आहे. ११ केंद्रप्रमुख, आठ विषयतज्ज्ञ आणि मुख्याध्यापक व शिक्षकांच्यासोबतच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य गावकऱ्यांना यात सहभागी करून घेतले आहे. शाळांमध्ये दररोज विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारांतर्गत खिचडी दिली जाते. मात्र दारव्हा पंचायत समितीने आता मुलांसोबतच पालकांनाही यात सहभागी करून घेण्याचा निश्चिय केला. गटशिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांनी मुख्याध्यापकांच्या बैठकीत स्रेहभोजन उपक्रमाची माहिती दिली. राजुरा येथील एक पालक यासाठी तयार झाला. शाळेतील विद्यार्थी आणि पालकांना स्रेहभोजन दिले. ही माहिती इतर शाळांनाही मिळाली. त्यामुळे इतर शाळाही तयार झाल्या.विद्यार्थ्यांना पुरणपोळी, दूध, तूप, सलाद, पुरी-भाजी, पुलाव, कढी, जिलेबी असे जेवण मिळू लागले. खिचडी जेवणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत असे पंचपक्वान्न मिळू लागले. सुरुवातीला स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनी या स्रेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु आता विविध दिवशीही लोकसहभागातून स्रेहभोजन कार्यक्रम केले जात आहे. आतापर्यंत राजुरा, जवळा, दहेली, रामगाव हरू, लोही, चिकणी यासह ८० शाळांमध्ये हा उपक्रम पार पडला. मुलाचा वाढदिवस शाळेतदारव्हा तालुक्यात स्रेहभोजन हा उपक्रम एका विद्यार्थ्याच्या वाढदिवसापासून सुरू झाला. मुख्याध्यापकाने राजुरा येथील पालकांना अशा उपक्रमाची माहिती दिली, तेव्हा तेथील एक पालक स्रेहभोजन देण्यास तयार झाला. त्याने आपल्या मुलाचा वाढदिवस शाळेत साजरा करून विद्यार्थी व पालकांना स्रेहभोजन दिले आणि तेथून या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली.