शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

५२ शेतकऱ्यांकडे सौर कृषिपंप कार्यान्वित

By admin | Updated: June 18, 2016 02:00 IST

भारनियमन आणि अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे सिंचनात अडथळा येत असल्याने शेतकरी हतबल झाला होता.

पुसदमध्ये सर्वाधिक : ४०५ पंपांना जिल्हा समितीची मंजुरी, ८८ शेतकऱ्यांकडून रकमेचा भरणा यवतमाळ : भारनियमन आणि अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे सिंचनात अडथळा येत असल्याने शेतकरी हतबल झाला होता. अशा शेतकऱ्यांसाठी शासनाने सौर कृषीपंप योजना कार्यान्वित केली असून ५२ शेतकऱ्यांकडे सौर कृषीपंप कार्यान्वित करण्यात आले आहे. सर्वाधिक १४ सौरकृषीपंप पुसद तालुक्यात कार्यान्वित झाले आहे.सौर कृषी पंप योजनेअंतर्गत तीन वेगवेगळ्या प्रकारचे पंप अनुदानावर पुरविले जातात. शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा उपलब्ध होत नाही, अशा ठिकाणी ही योजना कार्यान्वित केली जाते. या योजनेअंतर्गत ३ ते ७.५ अश्वशक्तीचे पंप पुरविले जात असून त्याची किंमत तीन लाख २४ हजार ते सात लाख २० हजार रुपये आहे. यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी भारनियमनामुळे त्रस्त झाले आहे. अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना लाभदायी ठरत आहे. जिल्हास्तरीय समितीने आतापर्यंत ४०५ सौर कृषीपंपांच्या अर्जांना मंजुरी दिली आहे. मंजुरीनंतर शेतकऱ्यांनी रकमेचा भरणा केल्यानंतर पंप बसवून दिले जातात. जिल्ह्यात ८८ शेतकऱ्यांनी पैशाचा भरणा केला असून त्यापैकी ५२ शेतकऱ्यांच्या शेतावर कृषीपंप कार्यान्वित करण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या शेतात पंप बसविण्याची कारवाई सुरू आहे. पुसद तालुक्यात सर्वाधिक १४, बाभूळगाव दोन, कळंब एक, दिग्रस तीन, दारव्हा आठ, आर्णी नऊ, यवतमाळ सहा, घाटंजी तीन, मारेगाव सहा पंपांचा समावेश आहे.सौर पंपासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज स्वीकारले जाणार असून इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी आपले कर्ज महावितरणच्या नजीकच्या उपविभागीय कार्यालय अथवा विभागीय कार्यालयात २० जुलैपर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग यांनी केले आहे. जिल्ह्यात ५२ शेतकऱ्यांनी कृषीपंप बसविले असून या पंपांची काय अवस्था होते, यावर इतर शेतकरी सौर कृषी पंप घ्यायचे की नाही याचा विचार करीत आहे. देखभाल दुरुस्ती आणि तांत्रिक बिघाड यासाठी कोणत्या उपाययोजना आहे याची मात्र अद्याप माहिती नाही. त्यामुळे शेतकरी या योजनेकडे फारसा आकर्षित झाला नाही. (शहर वार्ताहर) सौरपंपासाठी ३५ टक्के अनुदान सौर कृषीपंप योजनेअंतर्गत शासनाच्यावतीने ३५ टक्के अनुदान दिले जाते. त्यात ३० टक्के केंद्र सरकार व पाच टक्के राज्य शासनाचा वाटा आहे. पाच टक्के वाटा लाभार्थी शेतकऱ्याला भरावा लागतो. उर्वरित ६० टक्के रकमेचे बँक कर्ज घ्यावे लागते. हे ६० टक्के कर्ज महावितरण कंपनीद्वारे टप्प्याटप्प्याने परतफेड केले जाणार आहे. जिल्ह्याला या योजनेअंतर्गत १४२० कृषीपंपाचे उद्दीष्ट देण्यात आले आहे.