शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

समाजकल्याणची चौकशी

By admin | Updated: July 30, 2014 00:02 IST

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील अनागोंदी अनेक वर्षांपासून कायम आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या उत्थानासाठी येथून विविध योजना राबविल्या जातात. साहित्याचे वाटप केले जाते.

जिल्हा परिषद : लाभार्थी निवडण्यापूर्वी खरेदी, वाटपच नाहीयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील अनागोंदी अनेक वर्षांपासून कायम आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या उत्थानासाठी येथून विविध योजना राबविल्या जातात. साहित्याचे वाटप केले जाते. यात अनियमितता असल्याने हे साहित्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी समाजकल्याण विभागाची चौकशी सुरू केली आहे. राळेगाव पंचायत समितीचे सभापती अशोक केवटे यांनी सर्वसाधारण सभेत समाजकल्याणचे साहित्य गोदामातच कुजल्याचा मुद्दा उपस्थित केला. हे साहित्य का वाटण्यात आले नाही, याची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर सीईओंनी तातडीने मुख्य लेखाधिकारी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना समाजकल्याणच्या साहित्य खरेदी व वाटपाच्या प्रक्रियेची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.विशेष म्हणजे येथील समाजकल्याण अधिकाऱ्याला सीईओंनी शोकॉज बजावल्यानंतर त्यांनी आचारसंहितेची सबब पुढे करून साहित्य खरेदी व वाटप रखडल्याचे सांगितले. समाजकल्याण विभागात मोठ्या प्रमाणात भोंगळ कारभार सुरू आहे. २००९-१० मध्ये लाभार्थी न ठरविताच थेट साहित्याची खरेदी करण्यात आली होती. त्यानंतर वाटपासाठी लाभार्थी निवडीची प्रक्रिया पूर्ण झालीच नाही. साहित्य अजूनही पंचायत समितीस्तरावर गोदामांमध्ये कुजत आहे. आता पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती केली जात आहे. जिल्हा परिषदेचा सेस फंड आणि १३ वनेमधून मिळणारा निधी यातून वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येतात. प्रत्यक्षात मात्र अजूनही साहित्य खरेदीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. आर्थिक वर्षे संपले तरी या विभागाचा निधी अखर्चित आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या अल्पभूधारक व भूमिहिन घटकांसाठी या योजना आहेत. अधिकाऱ्याचा हेतू प्रामाणिक नसल्याने लाभार्थ्यांची परवड होत आहे. आता सीईओंकडून केल्या जात असलेल्या चौकशीमध्ये काय बाहेर येते आणि त्यावरून कोणती कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी नवलकिशोर राम यांनीसुद्धा समाजकल्याण विभागाची चौकशी सुरू केली होती. मात्र त्यावेळी संबंधित विभागाकडून कोणतेच सहकार्य मिळाले नाही. प्रकरण अंगावर शेकणार, हे लक्षात येताच कॉंग्रेस धार्जिण्या तत्कालीन अधिकाऱ्याने आपली बदली करून घेतली. आता ही तशीच स्थिती निर्माण झाली आहे. इकडे चौकशी लागण्यापूर्वीच समाजकल्याण अधिकारी विजय साळवे यांची बदली झाली आहे. या दोन्ही घटनेत साम्य म्हणजे स्थानिक कॉंग्रेसच्या नेत्यांचेच अभय मिळाले आहे. अशा स्थितीत अपहार व अनियमितता सिद्ध झाल्यास बदलून गेलेल्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल काय, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)