शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याने उडविली मागास वस्त्यांची झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 21:55 IST

मोठ्या अपेक्षेने नगरपालिकेत सहभागी झालेल्या ग्रामपंचायतींमधील मागास वस्त्यांना अजूनही प्राथमिक सुविधांसाठी झगडावे लागत आहे. त्यात यंदा आलेल्या पराकोटीच्या पाणीटंचाईने तर त्यांची शब्दश: झोप उडविली आहे.

ठळक मुद्देविहिरी, हातपंप कोरडे : गुंडभर पाण्यासाठी रात्रभर शहर प्रदक्षिणा, पाण्याच्या ड्रमला लावावे लागते कुलूप

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मोठ्या अपेक्षेने नगरपालिकेत सहभागी झालेल्या ग्रामपंचायतींमधील मागास वस्त्यांना अजूनही प्राथमिक सुविधांसाठी झगडावे लागत आहे. त्यात यंदा आलेल्या पराकोटीच्या पाणीटंचाईने तर त्यांची शब्दश: झोप उडविली आहे. एखादवेळी कसेबसे मिळालेले पाणी १५ दिवस पुरविण्याची सर्कस करावी लागत आहे. कपडे धुतलेले पाणी नंतर भांडी धुण्यासाठी वापरायचे, लहान मुलांना खुर्चीवर बसवून अंघोळ घालायची, खाली टप ठेवून अंघोळीचे पाणी गोळा करायचे आणि तेच पाणी इतर कामांसाठी वापरायचे असा पाण्याचा पुनर्वापर केला जात आहे. ‘रियूझ’चा फंडा नागरिकांनी शोधला, मात्र प्रशासनाने या भागात टँकर वाढविण्याची तसदी काही घेतलेली नाही. त्यामुळे पिण्याचे पाणी भरण्यासाठी येथील नागरिकांना रात्री शहराला अक्षरश: प्रदक्षिणाच घालावी लागते. जेमतेम दोन गुंड भरतानाच अर्धी रात्र संपून जाते. मग दुसऱ्या दिवशीच्या कामावरही परिणाम होतो...आधीच दुर्लक्षित असलेल्या मागास वस्त्यांची भिस्त हातपंप आणि नळावरच आहे. महिनाभरापासून येथे प्राधिकरणाचा नळही आलेला नाही. त्यामुळे नागरिकांचे लोंढे हातपंपावरच जमले आहेत. अर्ध्या हापश्यांनी तळ गाठला आहे. तर काही नादुरुस्त आहेत. दुरूस्तीसाठी नागरिकांनी नगरपरिषदेकडे वारंवार पुरवठा केला. तरी उपयोग झाला नाही.या वस्त्यांमध्ये टँकर घेऊन जाणारा ड्रायव्हर नगरसेवक सोबत असल्याशिवाय पाणीच वाटत नाही. पाणी दिल्यानंतरही अनेकजण टँकर मिळालेच नाही, असा आरोप करतात. यामुळे वितरित पाण्याची ग्राहकांच्या स्वाक्षरीने नोंद घेणे नगरसेवकांनी सुरू केले आहे.सहा ट्रिपनंतरही गांधीनगर तहानलेलेचगांधीनगरात प्रत्येक घराला पाणी मिळावे म्हणून टँकरचे नियोजन नगरसेवक गजानन इंगोले यांनी केले. त्याकरिता एक स्वतंत्र रजिस्टर केले. ज्यांना पाणी दिले, त्यांच्या त्यावर स्वाक्षºया घेतल्या जातात. मात्र दिवसाच्या सहा ट्रिप अपुºया आहेत. ज्या ठिकाणापासून पाणी वाटपाला प्रारंभ केला, त्या ठिकाणी पुन्हा येण्यासाठी किमान आठ दिवसाचा वेळ लागतो. तोपर्यंत या भागातील नागरिकांना पाणी जपून वापरावे लागते, असे जीवन भेंडारे म्हणाले. या भागात रोहित चौधरीचा लाँड्रीचा व्यवसाय आहे. पाण्याच्या कमतरतेने त्यांचा व्यवसायच प्रभावित झाला आहे. पाणी नसल्याने नागरिक कपडे कमी धूत आहेत. यामुळे कपडे प्रेसला येण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.धोबीघाट पडला बंदतलाव फैलात गोळा होणारे पाणी धोबीघाटात जात होते. या ठिकाणावर कपडे धुतले जात होते. याकरिता या ठिकाणावर प्रचंड गर्दी व्हायची. तलाव फैलातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. नाला बांधला जात आहे. यामुळे या भागात पाणीच नाही. यातून धोबीघाटावर धुणे धुणाऱ्या गृहिणी आणि व्यावसायिकही दिसत नाही.जय बजरंग चौकात नळही कुचकामीगवळीपुऱ्याकडे जाणाऱ्या जय बजरंग चौकामध्ये एक सार्वजनिक नळ आहे. हा भाग उतारात आहे. यामुळे पूर्वी दररोज पाणी राहत होते. तीन ते चार किलोमीटर अंतरावरून नागरिक पाण्यासाठी येथे येत होते. आता तीन ते चार दिवसापासून नळ बंद आहे. रविवारी या नळाला बारीक धार होती. या भागातील इतर हातपंप कोरडे पडले आहेत. आता पाणी आणायचे तरी कुठून, असा गंभीर प्रश्न कौशल्या रामटेके, सुरेखा जाधव, कविता कोडापे यांनी मांडला.तलाव असूनही चमेडीयानगर कोरडेचमेडीयानगर तलाव फैल परिसरात आहे. तरी येथील बोअरवेल आणि हापश्या कोरडया आहे. यामुळे या भागातील नागरिकांची भिस्त टँकरवरच आहे. सात-आठ दिवसानंतर टँकर फिरविला जातो. यामुळे या भागातील नागरिकांची चांगलीच अडचण झाली आहे. पंचशिल चौकाकडून येथील नागरिक पाणी आणतात. त्यासाठी संपूर्ण दिवस वाया जातो, असे सुनिता भरने, भीमाबाई पावडे म्हणाल्या. अनेकजण भंगीपुऱ्यातून पाणी आणतात, असे त्यांनी सांगितले.पॉवर हाऊस परिसरात पाण्यासाठी जागरणया भागात रोजमजुरी करून पाण्यासाठी रात्र जागण्याची वेळ आली आहे. अरूंद रस्त्यांमुळे शेवटपर्यंत टँकर पोहचत नाही. यामुळे पाणी टिकविण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर केला जातो. कपडे धुतलेले पाणी भांड्यासाठी वापरले जाते, असे सुनिल उदापुरे म्हणाले. बहुतांश नागरिक कॉटन मार्केट, वॉटर सप्लाय आणि छोटी गुजरी चौकातून पाणी आणण्याच प्रयत्न करतात. संपूर्ण परिसर रात्री जागा असतो, असे शेख अय्यूब म्हणाले, समीर भानखेडे, इमरान खान, पप्पू ढाले, अजित माकोडे, चेतन कावळे, कांचन भानखेडे म्हणाले. नळाला पर्यायी व्यवस्था म्हणून टँकर आहेत. मात्र, ही व्यवस्था कुचकामी असल्याचे ते म्हणाले.खासगी टँकरची प्रतीक्षामोफत पाण्याचे टँकर मिळविण्यासाठी सात ते आठ दिवस प्रत्येक प्रभागाला प्रतीक्षा करावी लागत आहे. काही लोक अत्यावश्यक बाब म्हणून खासगी टँकरधारकांना फोन करतात. हे टँकरही वेटींगवर आहे. यामुळे खासगी टँकर मिळणेही अवघड झाले आहे.सार्वजनिक शौचालये मोडकळीससार्वजनिक शौचालये बोअरवेलवर आहेत. या बोअरवेलचे पाणी संपले आहे. यामुळे शौचालयातही पाणी नाही. यातून मागास वस्त्यांमधील शौचालयात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. आता नागरिकांनी शौचालयांकडे पाठ फिरवायला सुरूवात केली आहे. दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे उपाययोजनांची मागणी आहे.