शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

अमरावती जिल्ह्यात संत्राचोरांंचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 11:41 IST

अचलपूर तालुक्यातील ग्रामीण भागात चोरट्यांनी आपला मोर्चा संत्राफळाकडे वळविला आहे. मध्यरात्री बागेतील फळे चोरून नेण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बुधवारी पहाटे चमक येथे चोरट्यांंनी संत्री रस्त्यावरच टाकून पळ काढला.

ठळक मुद्देअचलपूर पोलिसांत तक्रार : चमक येथे संत्री टाकून पलायन, पोलिसांच्या गस्तीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अचलपूर तालुक्यातील ग्रामीण भागात चोरट्यांनी आपला मोर्चा संत्राफळाकडे वळविला आहे. मध्यरात्री बागेतील फळेचोरून नेण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बुधवारी पहाटे चमक येथे चोरट्यांंनी संत्री रस्त्यावरच टाकून पळ काढला. त्याची फिर्याद पोलिसांत करण्यात आली आहे.नायगाव ते चमक खुर्द मार्गातील छोटू ऊर्फ प्रवीण डोके यांच्या शेतातील ५० कॅरेटहून अधिक संत्री मंगळवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास चोरट्यांनी तोडून रस्त्यावर आणून टाकली. सात हजार रुपयाची ही संत्री चोरून नेत असताना रस्त्याने अन्य वाहनांचा आवाज आल्याने चोरट्यांंनी तेथून पळ काढल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सदर घटनेची फिर्याद सरमसपुरा पोलीस ठाण्यात देण्यात आली असून, पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर तपासाला प्रारंभ केला.परिसरात रात्री व पहाटे गस्त लावण्याची मागणी प्रहारचे बबलू चरोडे यांनी केली आहे. सरमसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तालुक्यातील ग्रामीण भागाचा समावेश आहे. आधीच संत्र्याचे दर कोसळल्याने शेतकºयांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. अशातच चोरट्यांनी थेट संत्राबागांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.मध्यरात्री शिरतात चोरअचलपूर शहराला लागून असलेल्या चमक, सुरवाडा नायगाव या रस्त्यावरील गावांमध्ये संत्राबागा आहेत. मध्यरात्री ते पहाटे ४ दरम्यान संत्री चोरून पळ काढत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. परतवाडा, अचलपूर या जुळ्या शहरांमध्ये घरफोडी, चोरी, लुटमारीच्या घटनांनंतर काही चोरट्यांनी थेट संत्राबागांना लक्ष्य केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Thiefचोरfruitsफळे