शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

‘पवित्र’ तंत्राने घटविली शिक्षक भरतीची सहाशे पदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 21:33 IST

जिल्ह्यात किमान एक हजार नव्या शिक्षकांची भरती होईल, अशी बेरोजगारांना अपेक्षा असताना शिक्षण विभागाने केवळ ९५ पदांंची जाहिरात पवित्र पोर्टलवर झळकविली आहे. प्रत्यक्षात पोर्टलच्या आॅनलाईन कारभारामुळे २०१८ ऐवजी २०१२ मधील मान्य पदे ग्राह्य धरण्यात आली.

ठळक मुद्देबेरोजगारांचा आक्रोश : कार्यरत शिक्षकांमध्येही पदोन्नतीसाठी चलबिचल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात किमान एक हजार नव्या शिक्षकांची भरती होईल, अशी बेरोजगारांना अपेक्षा असताना शिक्षण विभागाने केवळ ९५ पदांंची जाहिरात पवित्र पोर्टलवर झळकविली आहे. प्रत्यक्षात पोर्टलच्या आॅनलाईन कारभारामुळे २०१८ ऐवजी २०१२ मधील मान्य पदे ग्राह्य धरण्यात आली. त्यामुळे शिक्षक भरतीचा आकडा सहाशेने घटल्याची बाब पुढे आली आहे.आठ वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर हजारो बेरोजगार तरुण-तरुणींना यंदा शिक्षक म्हणून नोकरीत रुजू होण्याची संधी दिसत आहे. मात्र जिल्हा परिषदेने केवळ ९५ पदे भरणार असल्याचे पोर्टलवर जाहीर केले. त्यातही पेसा क्षेत्र आणि उर्दू माध्यमाचीच ही सर्व पदे असल्याने बहुतांश प्रवर्गातील उमेदवारांची निराशा झाली आहे. या पदभरतीसाठी बिंदुनामावली करताना २०१२ मधील संच मान्यतेत मंजूर झालेली पदसंख्या ग्राह्य धरण्यात आली. मात्र भरती २०१९ मध्ये होत असल्यामुळे किमान २०१८ मधील संच मान्यतेने मंजूर झालेली पदांची संख्या ग्राह्य धरली जावी, अशी मागणी बेरोजगारांनी केली आहे.ताज्या संच मान्यतेतील पदसंख्या ग्राह्य धरल्यास ३५० ते ४०० पदांची जाहिरात काढणे शक्य आहे. याशिवाय जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, उच्चश्रेणी मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती झालेली नाही. सेवाज्येष्ठ शिक्षकांना पदोन्नत केल्यास शिक्षकांची रिक्त पदे वाढून आणखी साडेतीनशे शिक्षक पदे भरतीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीने जवळपास ७०० नवीन शिक्षक नेमण्याची संधी जिल्हा परिषदेला मिळू शकेल, असा दावा बेरोजगार युवक आणि कार्यरत शिक्षकांनी केला आहे.उमरखेड, महागावची तगमग कायमगेल्या वर्षीच्या बदली प्रक्रियेनंतर उमरखेड, महागाव पंचायत समिती अंतर्गत अनेक दुर्गम शाळांना शिक्षक मिळाले नाही. या परिसरात शेकडो पदे रिक्त आहे. शिवाय यंदाच्या बदली प्रक्रियेतही २० गावांचा पसंतीक्रम भरण्याची मुभा शिक्षकांना मिळणार असल्याने ही दुर्गम गावे शिक्षकांच्या प्रतीक्षेतच राहण्याची शक्यता आहे. तर याच सुमारास होत असलेल्या नवीन पदभरतीत प्रामुख्याने पेसा क्षेत्रातील पदे भरली जाणार आहे. त्यामुळे दुर्गम असूनही नॉन पेसा क्षेत्रात येणारी महागाव, उमरखेडची गावे शिक्षकांपासून वंचित राहणार आहे. त्यामुळे २०१२ ऐवजी २०१८ च्या संच मान्यतेनुसार वाढीव पदांना शासनाकडून मान्यता मिळवून घ्यावी, अशी मागणी होत आहे.एकीकडे कार्यरत शिक्षकांना पदोन्नती द्यायची नाही आणि दुसरीकडे नवीन पदभरतीची पदे कमी दाखवून बेरोजगारांवर अन्याय करायचा, असे धोरण दिसत आहे. त्यामुळे पदोन्नतीसह विविध विषयांसाठी सीईओंकडे पाठपुरावा सुरू आहे.- महेंद्र वेरुळकरजिल्हाध्यक्ष, पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख सभा.

टॅग्स :zpजिल्हा परिषद