शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘पवित्र’ तंत्राने घटविली शिक्षक भरतीची सहाशे पदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 21:33 IST

जिल्ह्यात किमान एक हजार नव्या शिक्षकांची भरती होईल, अशी बेरोजगारांना अपेक्षा असताना शिक्षण विभागाने केवळ ९५ पदांंची जाहिरात पवित्र पोर्टलवर झळकविली आहे. प्रत्यक्षात पोर्टलच्या आॅनलाईन कारभारामुळे २०१८ ऐवजी २०१२ मधील मान्य पदे ग्राह्य धरण्यात आली.

ठळक मुद्देबेरोजगारांचा आक्रोश : कार्यरत शिक्षकांमध्येही पदोन्नतीसाठी चलबिचल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात किमान एक हजार नव्या शिक्षकांची भरती होईल, अशी बेरोजगारांना अपेक्षा असताना शिक्षण विभागाने केवळ ९५ पदांंची जाहिरात पवित्र पोर्टलवर झळकविली आहे. प्रत्यक्षात पोर्टलच्या आॅनलाईन कारभारामुळे २०१८ ऐवजी २०१२ मधील मान्य पदे ग्राह्य धरण्यात आली. त्यामुळे शिक्षक भरतीचा आकडा सहाशेने घटल्याची बाब पुढे आली आहे.आठ वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर हजारो बेरोजगार तरुण-तरुणींना यंदा शिक्षक म्हणून नोकरीत रुजू होण्याची संधी दिसत आहे. मात्र जिल्हा परिषदेने केवळ ९५ पदे भरणार असल्याचे पोर्टलवर जाहीर केले. त्यातही पेसा क्षेत्र आणि उर्दू माध्यमाचीच ही सर्व पदे असल्याने बहुतांश प्रवर्गातील उमेदवारांची निराशा झाली आहे. या पदभरतीसाठी बिंदुनामावली करताना २०१२ मधील संच मान्यतेत मंजूर झालेली पदसंख्या ग्राह्य धरण्यात आली. मात्र भरती २०१९ मध्ये होत असल्यामुळे किमान २०१८ मधील संच मान्यतेने मंजूर झालेली पदांची संख्या ग्राह्य धरली जावी, अशी मागणी बेरोजगारांनी केली आहे.ताज्या संच मान्यतेतील पदसंख्या ग्राह्य धरल्यास ३५० ते ४०० पदांची जाहिरात काढणे शक्य आहे. याशिवाय जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, उच्चश्रेणी मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती झालेली नाही. सेवाज्येष्ठ शिक्षकांना पदोन्नत केल्यास शिक्षकांची रिक्त पदे वाढून आणखी साडेतीनशे शिक्षक पदे भरतीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीने जवळपास ७०० नवीन शिक्षक नेमण्याची संधी जिल्हा परिषदेला मिळू शकेल, असा दावा बेरोजगार युवक आणि कार्यरत शिक्षकांनी केला आहे.उमरखेड, महागावची तगमग कायमगेल्या वर्षीच्या बदली प्रक्रियेनंतर उमरखेड, महागाव पंचायत समिती अंतर्गत अनेक दुर्गम शाळांना शिक्षक मिळाले नाही. या परिसरात शेकडो पदे रिक्त आहे. शिवाय यंदाच्या बदली प्रक्रियेतही २० गावांचा पसंतीक्रम भरण्याची मुभा शिक्षकांना मिळणार असल्याने ही दुर्गम गावे शिक्षकांच्या प्रतीक्षेतच राहण्याची शक्यता आहे. तर याच सुमारास होत असलेल्या नवीन पदभरतीत प्रामुख्याने पेसा क्षेत्रातील पदे भरली जाणार आहे. त्यामुळे दुर्गम असूनही नॉन पेसा क्षेत्रात येणारी महागाव, उमरखेडची गावे शिक्षकांपासून वंचित राहणार आहे. त्यामुळे २०१२ ऐवजी २०१८ च्या संच मान्यतेनुसार वाढीव पदांना शासनाकडून मान्यता मिळवून घ्यावी, अशी मागणी होत आहे.एकीकडे कार्यरत शिक्षकांना पदोन्नती द्यायची नाही आणि दुसरीकडे नवीन पदभरतीची पदे कमी दाखवून बेरोजगारांवर अन्याय करायचा, असे धोरण दिसत आहे. त्यामुळे पदोन्नतीसह विविध विषयांसाठी सीईओंकडे पाठपुरावा सुरू आहे.- महेंद्र वेरुळकरजिल्हाध्यक्ष, पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख सभा.

टॅग्स :zpजिल्हा परिषद