शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

भाजपच्या सहा आमदारांपुढे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 06:00 IST

जिल्ह्यात विधानसभेचे सात पैकी पाच आमदार भाजपचे आहेत. त्याशिवाय विधान परिषदेचे पुसद येथील सदस्य त्यांच्या साथीला आहेत. अखेरपर्यंत सत्तेसाठी प्रयत्न करूनही यश न आल्याने या सहाही आमदारांना आता विरोधी पक्षाची भूमिका जिल्ह्यात पार पाडावी लागणार आहे. एकाच वेळी विरोधी पक्षाचे सहा आमदार असल्याने सत्ताधारी महाविकास आघाडीला कामकाज करणे निश्चितच सोपे नाही.

ठळक मुद्देआक्रमक आंदोलनाची अपेक्षा । शेतकरी, जनतेला न्याय देण्याची संधी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विधानसभेचा विचार केल्यास आज जिल्ह्यात सर्वाधिक ताकद भाजपची आहे. परंतु त्यांना विरोधी बाकावर बसावे लागत आहे. आता भाजपचे हे आमदार शेतकरी व जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरणार काय याकडे नजरा लागल्या आहेत.जिल्ह्यात विधानसभेचे सात पैकी पाच आमदार भाजपचे आहेत. त्याशिवाय विधान परिषदेचे पुसद येथील सदस्य त्यांच्या साथीला आहेत. अखेरपर्यंत सत्तेसाठी प्रयत्न करूनही यश न आल्याने या सहाही आमदारांना आता विरोधी पक्षाची भूमिका जिल्ह्यात पार पाडावी लागणार आहे. एकाच वेळी विरोधी पक्षाचे सहा आमदार असल्याने सत्ताधारी महाविकास आघाडीला कामकाज करणे निश्चितच सोपे नाही. जिल्ह्यात नियोजन समितीसह अन्य बैठकांमध्ये भाजपच्या या आमदारांंचा अधिक प्रभाव राहण्याची शक्यता आहे.सहा आमदारांची ताकद बरीच मोठी आहे. या ताकदीचा उपयोग जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी होतो का, ही ताकद आक्रमक आंदोलनांच्या निमित्ताने रस्त्यावर दिसते का हे पाहणे महत्वाचे ठरते. गेली पाच वर्ष सत्तेत असल्याने भाजपच्या या आमदारांवर विरोध करण्याची वेळच आली नाही किंवा संधी मिळाली नाही. त्यामुळे पाच वर्ष सत्तेत राहून आता अचानक विरोधी पक्षाची भूमिका वठविण्याची आलेली वेळ हे आमदार कसे निभावून नेतात याकडे नजरा आहेत. महाविकास आघाडी ‘तुमच्या पाच वर्षाच्या सत्ता काळात तुम्ही का केले नाही’ असे म्हणून या आमदारांची विविध मागण्यांवर वेळोवेळी कोंडी करण्याची व त्यांना तोंडघशी पाडण्याची शक्यता आहे. अनेकदा याच मुद्यावरून भाजपच्या या आमदारांना बॅकफूटवर यावे लागण्याचीही वेळ येऊ शकते. परंतु महाविकास आघाडीने घोषित केलेल्या समान किमान कार्यक्रमावर बोट ठेऊन जाब विचारण्याची संधी सहज निर्माण होऊ शकते. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा, दहा रुपयात जेवणाची थाळी या प्रमुख दोन मुद्यांवरच भाजपला वेळोवेळी आंदोलनाची संधी मिळू शकते. कारण सातबारा कोरा करणे सरकारसाठी दिसते तेवढे सोपे काम नाही, त्यासाठी ६० हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. राज्याचे खर्चाचे वार्षिक बजेट ५५ हजार कोटींचे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार अचानक ६० हजार कोटींची आर्थिक तरतूद करणार कशी हा मूळ प्रश्न आहे. यासंबंधी एखादवेळी सातबारा कोरा करण्याची घोषणा केली जाऊ शकते. परंतु त्याची अंमलबजावणी तेवढीच कठीण आहे. याच मुद्यावर भाजपच्या आमदारांना महाविकास आघाडीला उघडे पाडता येऊ शकते. गेली पाच वर्ष सत्तेच्या खुर्चीत बसलेले भाजपचे हे आमदार आता विरोधी पक्ष म्हणून किती सक्षम पणे भूमिका वठवू शकतात हे पाहणे महत्वाचे ठरते. भाजपच्या जिल्ह्यात असलेल्या सहा आमदारांकडून आक्रमक आंदोलनांची प्रतीक्षा आहे. भाजपच्या या सहा आमदारांची ताकद खूप मोठी आहे.फोटो सेशनसाठी आंदोलन नकोभाजपची आंदोलनेही काँग्रेस सारखीच फोटो सेशनपूर्ती राहणार नाही ना अशी शंकाही जनतेतून उपस्थित केली जात आहे. २०१४ पूर्वी भाजप विरोधी पक्षात होती. मात्र भाजपने आक्रमक आंदोलन केल्याचे ऐकिवात नाही. शिवसेनेने मात्र अनेक आक्रमक आंदोलने केली आहेत. परंतु सेना आता सलग दुसऱ्या टर्ममध्ये सत्तेत भागीदार आहे. भाजप सरकारमध्ये असतानाही सेनेने आंदोलने कायम ठेवली होती. आता मात्र मुख्यमंत्रीच सेनेचा असल्याने सेनेकडून जनतेच्या प्रश्नावर आंदोलनांची शक्यता नाही.

टॅग्स :BJPभाजपाFarmerशेतकरी