शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

रेल्वे प्रवाशांची पायपीट वाढण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:37 IST

वाहनांच्या गर्दीचा त्रास होत असल्याने धामणगाव (रेल्वे) येथे स्टेशनजवळ एसटी बस थांब्याला तेथील नागरिकांकडून प्रचंड विरोध केला जात आहे. हा थांबा बंद झाल्यास प्रवाशांची एक किलोमीटर पायपीट होणार आहे.

ठळक मुद्देस्टेशनजवळ बसथांब्याला विरोध : यवतमाळ येथून धामणगावसाठी एसटीच्या दररोज शंभर फेऱ्या

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वाहनांच्या गर्दीचा त्रास होत असल्याने धामणगाव (रेल्वे) येथे स्टेशनजवळ एसटी बस थांब्याला तेथील नागरिकांकडून प्रचंड विरोध केला जात आहे. हा थांबा बंद झाल्यास प्रवाशांची एक किलोमीटर पायपीट होणार आहे. यात प्रशासन काय भूमिका घेते याकडे प्रामुख्याने यवतमाळसह या मार्गावर असलेल्या गावातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. यवतमाळ ते धामणगाव दररोज दीड हजारावर नागरिक प्रवास करतात. यात प्रामुख्याने रेल्वे प्रवाशांची संख्या अधिक आहे.धामणगाव रेल्वेसाठी यवतमाळ आगाराच्या दररोज शंभरहून अधिक फेºया आहेत. या सर्व बसेस मागील ४० वर्षांपासून धामणगाव रेल्वे स्टेशनपर्यंत जातात. तेथेच प्रवासी उतरवितात आणि घेतातही. धामणगाव एसटी स्थानकापासून रेल्वे स्टेशन अर्धा ते पाऊन किलोमीटर दूर आहे. प्रवाशांची पायपीट थांबावी आणि त्यांना आॅटोरिक्षा किंवा इतर भाड्याचा भुर्दंड बसू नये यासाठी या बसेस रेल्वे स्टेशनजवळ प्रवाशांची चढ उतार करतात.रेल्वे स्टेशनजवळ वाहनांची वर्दळ वाढली आहे. प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांसह इतर प्रकारच्या वाहनांची याठिकाणी गर्दी होत आहे. बसेस वळविण्याचा मार्गही बदलवून नागरी वस्तीतून करण्यात आला. या सर्व प्रकाराने वाढलेला त्रास आणि अपघाताची भीती व्यक्त करत धामणगावातील नागरिकांनी रेल्वे स्टेशनजवळ बस थांबविण्यास विरोध चालविला आहे. काही वर्षांपूर्वीही हा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी ‘एसटी’ने न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी रेल्वे स्टेशनजवळ बसेस थांबविण्याच्या बाजूने निर्णय झाला होता. आता मात्र पुन्हा हा प्रश्न पुढे आला आहे.रेल्वे स्टेशन जवळ प्रवाशांची चढ उतार बंद झाल्यास नागरिकांची गैरसोय वाढणार आहे. त्रास होत असल्याने रेल्वे स्टेशनजवळ प्रवाशांची चढ उतर थांबवावी ही धामणगावातील नागरिकांची मागणी आहे. दुसरीकडे प्रवाशांची पायपीट वाढणार आहे. अशावेळी संबंधित प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.खासगी वाहनधारकांडून नियमाचे उल्लंघनयवतमाळ-धामणगाव मार्गावर काही खासगी प्रवासी वाहनधारकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. तालुका परवाना असलेली वाहने जिल्ह्याच्या सीमा ओलांडत आहे. अमरावती पासिंगची वाहने यवतमाळात तर यवतमाळ पासिंगची वाहने धामणगावातून चालविली जात आहे. या वाहनांद्वारे प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. विशेष म्हणजे धामणगाव रेल्वे स्टेशनजवळून आणि बसस्थानकापासूनच प्रवासी घेतले जातात. या प्रकाराकडे पोलीस आणि परिवहन विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष सुरू आहे. यवतमाळ आणि धामणगाव पोलिसांनी हा विषय गांभीर्याने घ्यावा, अशीही मागणी या निमित्ताने पुढे आली आहे.

टॅग्स :railwayरेल्वे