शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
2
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
3
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
4
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
5
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
6
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
7
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
8
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
9
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
10
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
11
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
12
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
13
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
14
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
15
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
16
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
17
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
18
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
19
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
20
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका

सुजाण नागरिक हीच शिक्षकाची सार्थकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 22:13 IST

शिक्षकांच्या संस्कारातूनच सुजाण नागरिक निर्माण होतात. हे नागरिक म्हणजेच शिक्षकाच जीवनाची सार्थकता असल्याचे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ.रमाकांत कोलते यांनी मांडले.

ठळक मुद्देरमाकांत कोलते : दिग्रस तालुक्यात अ.भा. साहित्य संमेलनाच्या कार्याध्यक्षांचा सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : शिक्षकांच्या संस्कारातूनच सुजाण नागरिक निर्माण होतात. हे नागरिक म्हणजेच शिक्षकाच जीवनाची सार्थकता असल्याचे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ.रमाकांत कोलते यांनी मांडले.तालुक्यातील सावंगा बु. येथे ईश्वर देशमुख सैनिकी शाळेत डॉ.रमाकांत कोलते व कार्यवाह प्रा.घनश्याम दरणे यांचा सत्कार समारंभ पार पडला. त्यावेळी डॉ.कोलते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव माजी राज्यमंत्री संजय देशमुख होते. तर प्रमुख अतिथी डॉ.एस.व्ही. आगरकर होते. प्राथमिक शिक्षक म्हणून सुरुवात करणारे डॉ.कोलते पुढे अमोलकचंद महाविद्यालय येथून प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजनात प्रचंड अडथळे येऊनही विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्यामुळे व विश्वासामुळे सदर संमेलन यशस्वी झाले, असे त्यांनी सांगितले. तर प्रा.घनश्याम दरणे यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकावा, असे आवाहन केले. शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये जिव्हाळा असल्याशिवाय भावनिक परिवर्तन शक्य नसल्याचे ते म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य नितीन धनवंत यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष भोकरे तर टाकेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विस्तार अधिकारी शुभदा पाटील, केंद्र प्रमुख किरण बारसे, संतोष झाडे व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनTeacherशिक्षक