शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमधील पदोन्नतीने वाढणार शिक्षकांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:00 IST

जिल्हा परिषदेने २०११ पासून केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी या पदांवर पदोन्नतीची प्रक्रिया राबविलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक पात्र शिक्षक बढतीपासून वंचित आहे. दरम्यान, केंद्र प्रमुख सभेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र वेरुळकर यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर गेल्या आठवड्यात विस्तार अधिकारी पदासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली.

ठळक मुद्देदुर्गम गावातील शाळांचा प्रश्न : विस्तार अधिकारी यादीतही चुका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विस्तार अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी शिक्षण विभागाने पदोन्नतीचे दार उघडले आहे. त्यामुळे बीएडधारक शिक्षकांना अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बढतीची संधी चालून आली आहे. मात्र दुसरीकडे आधीच तुटवडा असलेल्या सहायक शिक्षकांची तूट काही शेकड्यांवरून हजारांवर जाण्याचीही भीती आहे. त्यामुळे पात्र शिक्षकांना बढती देणे आणि शिक्षकांची रिक्त पदे भरून काढणे हा दुहेरी समतोल साधण्याची कसरत अधिकाऱ्यांना करावी लागेल.जिल्हा परिषदेने २०११ पासून केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी या पदांवर पदोन्नतीची प्रक्रिया राबविलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक पात्र शिक्षक बढतीपासून वंचित आहे. दरम्यान, केंद्र प्रमुख सभेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र वेरुळकर यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर गेल्या आठवड्यात विस्तार अधिकारी पदासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली. १४७८ शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र या यादीत अनेक नावे दोनदा टाकण्यात आली आहे. तर अनेक पात्र शिक्षकांची नावेच गायब आहेत. केंद्र प्रमुख सभेने पुन्हा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतर शिक्षणाधिकाºयांनी २८ मेपर्यंत पुन्हा आक्षेप मागविले आहेत. तर दुसरीकडे लॉकडाऊन कालावधीत होणाºया या पदोन्नतीमुळे जिल्ह्यात शिक्षकांचा मोठा तुटवडा निर्माण होणार आहे.जिल्हा परिषद शिक्षण समितीचे सदस्य मधुकर काठोळे यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून दुर्गम गावांमध्ये शिक्षकच उपलब्ध नाहीत. आता विस्तार अधिकारी म्हणून शिक्षकांची बढती झाल्यास आणखी अनेक शाळा शिक्षकांना मूकणार आहेत. कोरोनामुळे मजूर खेड्यात परतल्याने पटसंख्या वाढणार असून त्यासाठी जादा शिक्षक कसे मिळतील हा प्रश्न आहे.बदल्या, भरतीसाठी जिल्हा परिषदेवर बंदीएकीकडे शिक्षण विभागाने शिक्षकांच्या बढत्यांची प्रक्रिया सुरू केली आहे. तर दुसरीकडे राज्य शासनाने नवीन शिक्षक नियुक्ती, बदल्यांवर निर्बंध घातले आहे. त्यामुळे बढतीमुळे शाळा सोडून तालुका पातळीवर जाणाºया शिक्षकामुळे शाळेतील जागा रिक्त होणार आहे. मात्र शासनाच्या निर्बंधामुळे तेथे नवा शिक्षक देणे किंवा बदलीने दुसरा शिक्षक पाठविणे अशक्य होईल.

टॅग्स :Socialसामाजिक