शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बोरी महलचे चिमुकले वॉटर कपच्या लघु चित्रपटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 22:12 IST

गाव पाणीदार करण्यासाठी जिल्ह्यात गावागावात चुरस लागली असून वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून शेकडो हात श्रमदानात व्यस्त आहे. त्यांच्या या कार्यात चिमुकलेही मागे नाही. मोठ्यांचा आदर्श घेत चिमुकल्यांनी या स्पर्धेत खारीचा वाटा उचलला.

ठळक मुद्देआमीर खानकडून दखल : गाव पाणीदार करण्याचा संकल्प

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : गाव पाणीदार करण्यासाठी जिल्ह्यात गावागावात चुरस लागली असून वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून शेकडो हात श्रमदानात व्यस्त आहे. त्यांच्या या कार्यात चिमुकलेही मागे नाही. मोठ्यांचा आदर्श घेत चिमुकल्यांनी या स्पर्धेत खारीचा वाटा उचलला. याची माहिती सिनेअभिनेता आमीर खान यांच्यापर्यंत पोहोचली. चिमुकल्यांना भेटून त्यांचे मनोबलच वाढविले नाही तर आपल्या वॉटर कप स्पर्धेच्या लघु चित्रपटातही स्थान दिले. हे चिमुकले आहेत कळंब तालुक्यातील बोरी महलचे.कळंब तालुक्यात पाणी फाऊंडेशनच्यावतीने गावागावात वॉटर कप स्पर्धेसाठी श्रमदान सुरू आहे. दररोज श्रमदान करून गाव पाणीदार करण्याचा दृढ संकल्प गावकऱ्यांनी केला आहे. त्यांच्या या कार्यात बोरी महल येथील १४ ते २० वयोगटातील विद्यार्थीही सहभागी झाले. या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली ते कळंब तहसील कार्यालयात आयोजित पाणी फाऊंडेशनच्या प्रदर्शनातून. प्रदर्शन पाहून विद्यार्थ्यांनी आपले गाव पाणीदार करण्याचा निश्चिय केला. दर रविवारी गावात स्वच्छता अभियान राबविणे सुरू केले. त्यानंतर दैनंदिन अभियान राबविणे सुरू झाले. झाडे लावा उपक्रम हाती घेतला. एवढेच नाही तर चिमुकल्यांनी रोपवाटिकाही तयार केली. विद्यार्थ्यांची गँग आता शोषखड्डे तयार करण्यासाठी मार्गदर्शन करीत आहे. बंधाºयांची आखणी करून देण्यात विद्यार्थ्यांचा हातखंड झाला आहे. ढाळीचे बांध व इतर बंधारे तयार करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. एवढेच नव्हेतर गावात गॅबियन स्ट्रक्चरचा बंधारा बांधण्यासाठी वर्गणी गोळा करून लोखंडी जाळी खरेदी केली. गावात यामुळे नवचैतन्य निर्माण झाले. पूर्वज डोंगरकरच्या नेतृत्वात यश निकुडे, आदर्श भानखेडे, चेतन भानखेडे, तेजस कांबळे, शिवम पंधरे, अभय राहाणहिरे, हेमंत चुनारकर, प्रज्वल शिवरकर, प्रशिक कांबळे, ओम पंधरे, सचिन शिवरकर, दुर्गेश रहाणहिरे, आकाश गायकवाड, रोशन निकुडे, चेतन निकुडे, अनिकेत निकुडे, अजय वाघाडे, मंगेश कांबळे, शुभम थूल, ज्ञान निकोडे, आशीष मेश्राम, यश चौधरी गाव पाणीदार करीत आहे. या सर्वांना मेकॅनिकल इंजिनिअर रवी राहणहिरे मार्गदर्शन करीत आहे. अभियंता असलेला हा तरुणही गावात श्रमदानासाठी तळ ठोकून आहे. बोरी महलच्या या विद्यार्थ्यांची महती पाणी फाऊंडेशनचे सर्वेसर्वा अभिनेता आमीर खान यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी या विद्यार्थ्यांना खंडाळा येथे भेटण्यास बोलावले. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कार्याची प्रशंसा केली. एवढेच नाही तर लघु चित्रपटात सर्वांना स्थान दिले. काही भागाचे शूटिंग पूर्ण झाले आहे.अधिकाऱ्यांचे सक्रिय मार्गदर्शनवॉटर कप स्पर्धेसाठी कळंब तालुक्यातील गावागावात जावून उपविभागीय अधिकारी संदीप अपार व तहसीलदार रंजित भोसले मार्गदर्शन करीत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने प्रेरित होवून गावेच्या गावे स्पर्धेत सहागी होत आहे. आगामी काळात दुष्काळावर मात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा