शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

धक्कादायक वास्तव; घरातील स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून ६० कुटुंबांनी सोडले गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2022 07:00 IST

Yawatmal News अनन्वित अत्याचाराला कंटाळून ६० पारधी कुटुंबीयांना गाव सोडून पलायन करावे लागले. ते सर्वजण मुला-बाळांसह गेल्या महिनाभरापासून जंगलात जीव मुठीत घेऊन राहत आहेत.

ठळक मुद्देमहिनाभरापासून जंगलात वास्तव्यरोजगार नाही, अन्न-पाण्यावाचून हाल

अविनाश साबापुरे

यवतमाळ : जग चंद्रावर वस्ती करण्याच्या बाता मारत आहे, तर दुसरीकडे अजूनही काही जणांना जातीच्या जोखडात जखडून त्यांचा छळ केला जात आहे. पारधी समाजाच्या महिलांवर भरदिवसा, तर कधी रात्री अपरात्री लैंगिक अत्याचार होत आहेत. याच अनन्वित अत्याचाराला कंटाळून ६० पारधी कुटुंबीयांना गाव सोडून पलायन करावे लागले. ते सर्वजण मुला-बाळांसह गेल्या महिनाभरापासून जंगलात जीव मुठीत घेऊन राहत आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्याच्या माळवाकद गावात हा प्रकार उघडकीस आला. येथे वर्षानुवर्षांपासून अनेक पारधी समाज बांधव वास्तव्यास आहेत. सामाजिक आरक्षणामुळे मागील वेळी येथे पारधी समाजाच्या एका तरुणाकडे सरपंचपदही आले होते. मात्र, त्यालाही गावकऱ्यांनी मारहाण केली. गावातील काही दारुड्या नागरिकांचा पारधी महिलांना गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात त्रास सुरू आहे. शेतात जाताना अश्लील टोमणे मारणे, शेतात एकटी महिला पाहून लैंगिक शोषण करणे, विनयभंग करणे, रात्री खाटेवर जाऊन बळजबरी करणे असे प्रकार घडत आहे.

विशेष म्हणजे ही बाब घरातील पुरुषाच्या लक्षात आल्यास सामाजिक प्रथेनुसार घरातूनही त्या स्त्रीला बहिष्कृत केले जाते. अशा काही महिलांनी आत्महत्या केल्याची काही उदाहरणेही येथे घडली आहेत. मात्र, कोणताही आधार नसल्यामुळे पारधी समाज बांधव हा अन्याय सहन करीत राहिले. शेवटी महिनाभरापूर्वी या लोकांनी गावच सोडून दोन किलोमीटरवर जंगलात एका पाझर तलावाच्या बाजूला आसरा घेतला. मात्र, हा तलावही कोरडा असल्याने आणि या लोकांकडे कुठलाही रोजगार नसल्याने सध्या अन्न-पाण्यावाचून त्यांचे हाल होत आहेत. शेवटी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरतीताई फुपाटे यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पारधी महिलांशी संवाद साधला. त्यावेळी महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांची कहाणीच कथन केली.

जिल्हा कचेरीवर धडक

अत्याचाराला कंटाळून तब्बल ६० कुटुंबांना आपले स्वत:चे गाव सोडून महिनाभरापासून जंगलात राहावे लागत आहे. एवढी गंभीर घटना घडूनही जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा संबंधित एसडीओ, तहसीलदारांनी या गावात साधी भेटही दिली नाही. त्यामुळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या विदर्भ प्रदेश महासचिव डॉ. आरतीताई फुपाटे यांनी अन्यायग्रस्त नागरिकांसह सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. या संवेदनशील प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून अन्यायग्रस्तांना किमान सोयी-सुविधा तरी पुरवाव्यात, अशी मागणी केली. यावेळी माजी आयुक्त संभाजी सिरकुंडे, तुषार आत्राम, नारायण कऱ्हाळे, भास्कर मुकाडे, वसंता इंगळे, स्वप्निल इंगळे, चिरांगे, कान्हा तिरपण चव्हाण, उमेश पवार, बादल पवार, चंदू पवार, सुषमा चव्हाण, माया पवार, पूनम उमेश पवार, अनिल कुचक्या पवार, आदी उपस्थित होते.

टॅग्स :Molestationविनयभंग