शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
2
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
3
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
4
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
5
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
6
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
7
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
8
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
9
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
10
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
11
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
12
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
13
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
14
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
15
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
16
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
17
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
18
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
19
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
20
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक वास्तव; घरातील स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून ६० कुटुंबांनी सोडले गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2022 07:00 IST

Yawatmal News अनन्वित अत्याचाराला कंटाळून ६० पारधी कुटुंबीयांना गाव सोडून पलायन करावे लागले. ते सर्वजण मुला-बाळांसह गेल्या महिनाभरापासून जंगलात जीव मुठीत घेऊन राहत आहेत.

ठळक मुद्देमहिनाभरापासून जंगलात वास्तव्यरोजगार नाही, अन्न-पाण्यावाचून हाल

अविनाश साबापुरे

यवतमाळ : जग चंद्रावर वस्ती करण्याच्या बाता मारत आहे, तर दुसरीकडे अजूनही काही जणांना जातीच्या जोखडात जखडून त्यांचा छळ केला जात आहे. पारधी समाजाच्या महिलांवर भरदिवसा, तर कधी रात्री अपरात्री लैंगिक अत्याचार होत आहेत. याच अनन्वित अत्याचाराला कंटाळून ६० पारधी कुटुंबीयांना गाव सोडून पलायन करावे लागले. ते सर्वजण मुला-बाळांसह गेल्या महिनाभरापासून जंगलात जीव मुठीत घेऊन राहत आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्याच्या माळवाकद गावात हा प्रकार उघडकीस आला. येथे वर्षानुवर्षांपासून अनेक पारधी समाज बांधव वास्तव्यास आहेत. सामाजिक आरक्षणामुळे मागील वेळी येथे पारधी समाजाच्या एका तरुणाकडे सरपंचपदही आले होते. मात्र, त्यालाही गावकऱ्यांनी मारहाण केली. गावातील काही दारुड्या नागरिकांचा पारधी महिलांना गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात त्रास सुरू आहे. शेतात जाताना अश्लील टोमणे मारणे, शेतात एकटी महिला पाहून लैंगिक शोषण करणे, विनयभंग करणे, रात्री खाटेवर जाऊन बळजबरी करणे असे प्रकार घडत आहे.

विशेष म्हणजे ही बाब घरातील पुरुषाच्या लक्षात आल्यास सामाजिक प्रथेनुसार घरातूनही त्या स्त्रीला बहिष्कृत केले जाते. अशा काही महिलांनी आत्महत्या केल्याची काही उदाहरणेही येथे घडली आहेत. मात्र, कोणताही आधार नसल्यामुळे पारधी समाज बांधव हा अन्याय सहन करीत राहिले. शेवटी महिनाभरापूर्वी या लोकांनी गावच सोडून दोन किलोमीटरवर जंगलात एका पाझर तलावाच्या बाजूला आसरा घेतला. मात्र, हा तलावही कोरडा असल्याने आणि या लोकांकडे कुठलाही रोजगार नसल्याने सध्या अन्न-पाण्यावाचून त्यांचे हाल होत आहेत. शेवटी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरतीताई फुपाटे यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पारधी महिलांशी संवाद साधला. त्यावेळी महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांची कहाणीच कथन केली.

जिल्हा कचेरीवर धडक

अत्याचाराला कंटाळून तब्बल ६० कुटुंबांना आपले स्वत:चे गाव सोडून महिनाभरापासून जंगलात राहावे लागत आहे. एवढी गंभीर घटना घडूनही जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा संबंधित एसडीओ, तहसीलदारांनी या गावात साधी भेटही दिली नाही. त्यामुळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या विदर्भ प्रदेश महासचिव डॉ. आरतीताई फुपाटे यांनी अन्यायग्रस्त नागरिकांसह सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. या संवेदनशील प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून अन्यायग्रस्तांना किमान सोयी-सुविधा तरी पुरवाव्यात, अशी मागणी केली. यावेळी माजी आयुक्त संभाजी सिरकुंडे, तुषार आत्राम, नारायण कऱ्हाळे, भास्कर मुकाडे, वसंता इंगळे, स्वप्निल इंगळे, चिरांगे, कान्हा तिरपण चव्हाण, उमेश पवार, बादल पवार, चंदू पवार, सुषमा चव्हाण, माया पवार, पूनम उमेश पवार, अनिल कुचक्या पवार, आदी उपस्थित होते.

टॅग्स :Molestationविनयभंग