शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

धक्कादायक; महाराष्ट्रातील सहाशे नर्सेसची नोकरी ३१ ऑगस्टपासून थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 07:20 IST

Yawatmal News राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तब्बल सहाशे नर्सेसची नोकरी ३१ ऑगस्टपासून थांबविण्याचे आदेश केंद्र शासनाने राज्याच्या आरोग्य विभागाला दिले आहेत.

ठळक मुद्देकेंद्र शासनाकडून पद कपात ३१ जिल्ह्यातील बिगर आदिवासी क्षेत्राला फटका

अविनाश साबापुरे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तब्बल सहाशे नर्सेसची नोकरी ३१ ऑगस्टपासून थांबविण्याचे आदेश केंद्र शासनाने राज्याच्या आरोग्य विभागाला दिले आहेत. अभियानातील या सहाशे महिला कर्मचारी एकाच झटक्यात कमी होणार असल्याने तब्बल ३१ जिल्ह्यातील बिगर आदिवासी क्षेत्रातील ग्रामीण आरोग्य सेवेवर ताण वाढणार आहे. (Jobs for 600 nurses in Maharashtra will stop from August 31)गेल्या दीड वर्षात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी विशेषत: ग्रामीण भागात जीव धोक्यात घालून काम करणा?्या महिलांनाच या निर्णयाचा फटका बसला आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक चांगली करण्याच्या उद्देशानेच आरोग्य अभियानाची सुरुवात करण्यात आली होती. मात्र आता याच अभियानातील कर्मचारी कपातीवर सरकार जोर देत आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सध्या बिगर आदिवासी क्षेत्रात ३२०७ एएनएम पदे मंजूर आहेत. २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीही महाराष्ट्राच्या आरोग्य सेवा आयुक्तांनी तेवढीच पदे प्रस्तावित करणारा अंमलबजावणी आराखडा मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठविला होता. मात्र त्यातील केवळ २६१० पदांना मंजुरी देऊन केंद्र शासनाकडून ५९७ पदे नामंजूर करण्यात आली. त्यामुळे एएनएमची (ऑक्झिलरी नर्सिंग मिडवाईफरी) ही पदे ३१ ऑगस्टपूर्वी रद्द करण्याचे आदेश आयुक्तांनी शुक्रवारी बजावले आहेत.३१ ऑगस्टनंतर अशा पदांचे वेतन अदा करू नये तसेच या पदांबाबतचा अहवाल १५ सप्टेंबरपूर्वी सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.कमी होणारे कर्मचारी गैरआदिवासी भागातील आहेत. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार या आदिवासी भागाचे नेतृत्व करतात. त्यामुळे त्यांना बदनाम करण्यासाठी अधिकाऱ्यांनीच गैरआदिवासी क्षेत्रात सेवा नाकारण्याचा डाव रचला. ही पद कपात रद्द करण्यासाठी डॉ. पवार यांनी प्रयत्न करावे, अन्यथा त्यांच्याच घरापुढे आंदोलन केले जाईल.- अशोक जयसिंगपुरे, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना. 

टॅग्स :Healthआरोग्य