शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

धक्कादायक; महाराष्ट्रातील सहाशे नर्सेसची नोकरी ३१ ऑगस्टपासून थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 07:20 IST

Yawatmal News राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तब्बल सहाशे नर्सेसची नोकरी ३१ ऑगस्टपासून थांबविण्याचे आदेश केंद्र शासनाने राज्याच्या आरोग्य विभागाला दिले आहेत.

ठळक मुद्देकेंद्र शासनाकडून पद कपात ३१ जिल्ह्यातील बिगर आदिवासी क्षेत्राला फटका

अविनाश साबापुरे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तब्बल सहाशे नर्सेसची नोकरी ३१ ऑगस्टपासून थांबविण्याचे आदेश केंद्र शासनाने राज्याच्या आरोग्य विभागाला दिले आहेत. अभियानातील या सहाशे महिला कर्मचारी एकाच झटक्यात कमी होणार असल्याने तब्बल ३१ जिल्ह्यातील बिगर आदिवासी क्षेत्रातील ग्रामीण आरोग्य सेवेवर ताण वाढणार आहे. (Jobs for 600 nurses in Maharashtra will stop from August 31)गेल्या दीड वर्षात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी विशेषत: ग्रामीण भागात जीव धोक्यात घालून काम करणा?्या महिलांनाच या निर्णयाचा फटका बसला आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक चांगली करण्याच्या उद्देशानेच आरोग्य अभियानाची सुरुवात करण्यात आली होती. मात्र आता याच अभियानातील कर्मचारी कपातीवर सरकार जोर देत आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सध्या बिगर आदिवासी क्षेत्रात ३२०७ एएनएम पदे मंजूर आहेत. २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीही महाराष्ट्राच्या आरोग्य सेवा आयुक्तांनी तेवढीच पदे प्रस्तावित करणारा अंमलबजावणी आराखडा मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठविला होता. मात्र त्यातील केवळ २६१० पदांना मंजुरी देऊन केंद्र शासनाकडून ५९७ पदे नामंजूर करण्यात आली. त्यामुळे एएनएमची (ऑक्झिलरी नर्सिंग मिडवाईफरी) ही पदे ३१ ऑगस्टपूर्वी रद्द करण्याचे आदेश आयुक्तांनी शुक्रवारी बजावले आहेत.३१ ऑगस्टनंतर अशा पदांचे वेतन अदा करू नये तसेच या पदांबाबतचा अहवाल १५ सप्टेंबरपूर्वी सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.कमी होणारे कर्मचारी गैरआदिवासी भागातील आहेत. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार या आदिवासी भागाचे नेतृत्व करतात. त्यामुळे त्यांना बदनाम करण्यासाठी अधिकाऱ्यांनीच गैरआदिवासी क्षेत्रात सेवा नाकारण्याचा डाव रचला. ही पद कपात रद्द करण्यासाठी डॉ. पवार यांनी प्रयत्न करावे, अन्यथा त्यांच्याच घरापुढे आंदोलन केले जाईल.- अशोक जयसिंगपुरे, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना. 

टॅग्स :Healthआरोग्य