शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

शिवसेनेची आंदोलने बंद का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 22:05 IST

काँग्रेस आघाडीचे सरकार असताना विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेच्या खासदार भावना गवळी, आमदार संजय राठोड शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर धुमधडाक्यात आंदोलने करीत होते. या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला जात होता.

ठळक मुद्देसंतप्त शेतकऱ्यांचा सवाल : खासदार गवळींना जिल्हा कचेरीत घेराव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : काँग्रेस आघाडीचे सरकार असताना विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेच्या खासदार भावना गवळी, आमदार संजय राठोड शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर धुमधडाक्यात आंदोलने करीत होते. या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला जात होता. परंतु भाजप सरकारमध्ये गवळी, राठोड यापैकी कुणीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलने करताना रस्त्यावर उतरले नाहीत. शिवसेना अचानक बॅकफूटवर जाण्यामागील कारणे काय, असा सवाल संतप्त शेतकºयांनी सोमवारी खासदार भावना गवळी यांना विचारला.आढावा बैठकीच्या निमित्ताने भावना गवळी जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या असता घाटंजी व महागाव तालुक्यातील शेतकरी तेथे धडकले. त्यांनी गवळी यांना घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती करीत धारेवर धरले. लोकसभा व विधानसभा निवडणूककाळात आम्ही शेतकरी तुमच्या पाठीशी उभे राहिलो, तुम्हाला निवडून दिले. परंतु तुम्ही आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत नाही. राज्यमंत्री संजय राठोड हेसुद्धा मूग गिळून आहेत. शिवसेना बघ्याची भूमिका घेत असल्याने सरकार वाटेल तसे वागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कुणी वालीच उरलेले नाही, अशी भावना या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मध्ये डाळवर्गीय पिके घेण्याचे आवाहन शेतकºयांना केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी तूर लावली. मात्र, शासनाने ती खरेदी न करता अन्य देशातून तुरीची आयात केली. आजही शेतकºयांची तूर पडून आहे. विकल्या गेलेल्या तुरीला भाव नाही. शेतकऱ्यांना संगणक आणि सरकारचे धोरण समजले असते तर तूर केव्हाच विकली गेली असती, असा उपरोधिक टोलाही या शेतकऱ्यांनी गवळी यांना लगावला.पेरणी झाल्यावर कर्ज देणार काय?दीड लाखावरील कर्ज प्रकरणात बँकांनी शेतकऱ्यांकडून वरचे कर्ज भरून घेतले. मात्र, नवीन कर्ज अजूनही दिले नाही. कर्जाची रक्कम बँक खात्यात वळती व्हायची आहे. यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला. खासदारांनी इतके टोकाचे पाऊल उचलू नका, म्हणत त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्या बँक अधिकाऱ्यांशी बोलल्या. नंतर आठ दिवसात प्रश्न सुटेल, असे सांगताच शेतकरी अधिक संतापले. पेरणीनंतर मदत मिळणार का, असा प्रश्न त्यांनी केला. केंद्र आणि राज्याचे सरकार म्हणजे ‘कोल्हा आला रे आला’ असेच काम झाले, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.भावना गवळी म्हणतात, उद्धव ठाकरेंमुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली, असा दावा खासदार भावना गवळी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना केला आहे. सरकार तूर दरातील तफावतीपोटी एक हजार रुपये देत असले तरी शिवसेनेने ही दोन हजारांची मागणी केली आहे. त्यासाठी प्रयत्नही सुरू आहे. शिवसेना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नेहमीच आंदोलने करीत आली आहे. उद्धव ठाकरे यांनी ‘सरकारमध्ये असलो तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरा’ असे आदेशच शिवसैनिकांना दिले असून त्यानुसार वेळोवेळी पक्षाकडून आंदोलने केली जात असून आपण त्यात सहभाग घेत असल्याचा दावा भावना गवळी यांनी शेतकऱ्यांशी बोलताना केला.