शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
2
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
3
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
4
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
5
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
6
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
7
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
8
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
9
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
10
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
11
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
12
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
13
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
14
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
15
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
16
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
17
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
18
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
19
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
20
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?

शिवकाळात एकही शेतकरी आत्महत्या नाही

By admin | Updated: February 15, 2016 02:43 IST

छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांंना जगण्याचं बळ दिले. त्यामुळे शिवकाळात एकाही शेतकऱ्यांची आत्महत्या झाली नाही.

पुसद : छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांंना जगण्याचं बळ दिले. त्यामुळे शिवकाळात एकाही शेतकऱ्यांची आत्महत्या झाली नाही. हा आदर्श राज्यकर्त्यांनी घेण्याची आज गरज असल्याचे प्रतिपादन पंकज रणदिवे यांनी येथे केले.छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीच्यावतीने येथील पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी सभागृहात आयोजित शिवपर्वात शनिवारी द्वितीय पुष्प गुंफताना ‘छत्रपती शिवराय- आजच्या युवकांपुढील आव्हाने व उपाय’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. भानुप्रकाश कदम होते. पंकज रणदिवे म्हणाले, महाराष्ट्राची माती ही विरांना जन्म देणारी आहे. जगातील अनेक राष्ट्रांनी शिवरायांचा आदर्श जोपासला. छत्रपतींनी वतनदारी पद्धती बंद करून वेतनदारी पद्धती सुरू केली. शिवनिती डोळ्यांसमोर ठेऊन व्हिएतनाम सारख्या छोट्याशा राष्ट्राने अमेरिकेएवढ्या बलाढ्य राष्ट्राचा तब्बल सात वेळा हरविले. छत्रपतींनी रयतेसाठी आदर्श धोरण ठरविले व त्याची अंमलबजावणी केली. म्हणूनच जाणता राजा अशी नोंद इतिहासाने घेतली. शिवरायांनी समाजातील सर्व क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला. शिवरायांचा आदर जीवनात उतरविल्यास खऱ्या अर्थाने प्रगती होणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी डॉ. अकील मेमन, प्रा. संजय खुपासे, यशवंतराव चौधरी, इंदल राठोड, बाबाराव उबाळे, हरिभाऊ ठाकरे उपस्थित होते. संचालन चंद्रकांत ढेंगे यांनी तर आभार सुनील ठाकरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष प्रकाश पानपट्टे, कार्याध्यक्ष प्रा. प्रकाश लामणे, शेखर नादरे, शशांक गावंडे, किशोर पानपट्टे, शरद दुधाने, सुशील वानखेडे, ज्ञानेश्वर बांडे, कैलास भोसले, प्रकाश बेंद्रे, प्रा. बाळासाहेब पौळ, गजानन सुरोशे आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)