शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

शंभूराजांच्या राज्याभिषेकाचा मान शेतकरी महिलेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 6:00 AM

१६ जानेवारी हा छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिन म्हणून साजरा होतो. त्यानिमित्त त्यांचे जन्मस्थळ असलेल्या पुरंदर किल्ल्यावर दरवर्षी राज्याभिषेक सोहळा केला जातो. पुण्याच्या शिवपूत्र शंभूराजे ट्रस्टच्या आयोजन समितीकडून हा सोहळा होतो. यंदा समितीने राज्याभिषेक करण्याचा मान यवतमाळ जिल्ह्यातील राजूर (ता. कळंब) येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त महिला वैशाली सुधाकर येडे यांना दिला.

ठळक मुद्देवैशाली येडे : किल्ले पुरंदरवर सोहळा

निश्चलसिंग गौर ।लोकमत न्यूज नेटवर्कडोंगरखर्डा : शिवपूत्र शंभूराजे यांच्या राज्याभिषेक दिनाच्या सोहळ्यात यंदा यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलेला राज्याभिषेकाचा मान देण्यात आला. कळंब तालुक्यातील वैशाली येडे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचा राज्याभिषेक करण्यात आला. राजांच्या जन्मस्थळी किल्ले पुरंदरवर झालेल्या या सोहळ्याने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले.१६ जानेवारी हा छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिन म्हणून साजरा होतो. त्यानिमित्त त्यांचे जन्मस्थळ असलेल्या पुरंदर किल्ल्यावर दरवर्षी राज्याभिषेक सोहळा केला जातो. पुण्याच्या शिवपूत्र शंभूराजे ट्रस्टच्या आयोजन समितीकडून हा सोहळा होतो. यंदा समितीने राज्याभिषेक करण्याचा मान यवतमाळ जिल्ह्यातील राजूर (ता. कळंब) येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त महिला वैशाली सुधाकर येडे यांना दिला. राज्याभिषेक करण्यासाठी त्यांना रितसर निमंत्रण पत्रिका पाठवून बोलावून घेण्यात आले होते. वैशाली येडे निमंत्रण प्राप्त झाल्यावर आपल्या दोन्ही मुलींसह पुरंदर गडावर हजर झाल्या.गडावरील सोहळ्यात वैशाली येडे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाराजांना पुष्पहार अर्पण करून त्यांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी महाराजांना साकडे घातले. यावेळी महाराष्ट्रातील शिवप्रेमींसह मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.साहित्यिक विसरले, महाराष्ट्र नव्हे !२०१९ मध्ये यवतमाळात झालेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उद्घाटक नयनतारा सहगल यांच्या नावावर मोठा वाद झाला होता. त्यानंतर ऐनवेळी वैशाली येडे यांना उद्घाटक म्हणून सन्मान देण्यात आला. उद्घाटनाच्या भाषणातून वैशाली येडे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर तडाखेबाज भाषण केले होते. मात्र, साहित्यिकांनी वर्षभरातच त्यांचे नाव अडगळीत टाकले. यंदा उस्मानाबादमध्ये झालेल्या ९३ व्या संमेलनात वैशाली येडे यांना साधे निमंत्रण पाठविण्याचेही औचित्य साहित्यिकांनी दाखविले नाही. मात्र साहित्यिक त्यांना विसरले, तरी महाराष्ट्र विसरलेला नाही. म्हणूनच पुरंदर किल्ल्यावर झालेल्या शंभूराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यात त्यांना सन्मानपूर्वक अभिषेकाचा मान देण्यात आला, अशी प्रतिक्रिया राजूर गावातून उमटत आहेत.

शंभूराजांच्या राज्याभिषेकाचा मान शेतकरी महिलेलावैशाली येडे : किल्ले पुरंदरवर सोहळानिश्चलसिंग गौर ।लोकमत न्यूज नेटवर्कडोंगरखर्डा : शिवपूत्र शंभूराजे यांच्या राज्याभिषेक दिनाच्या सोहळ्यात यंदा यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलेला राज्याभिषेकाचा मान देण्यात आला. कळंब तालुक्यातील वैशाली येडे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचा राज्याभिषेक करण्यात आला. राजांच्या जन्मस्थळी किल्ले पुरंदरवर झालेल्या या सोहळ्याने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले.१६ जानेवारी हा छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिन म्हणून साजरा होतो. त्यानिमित्त त्यांचे जन्मस्थळ असलेल्या पुरंदर किल्ल्यावर दरवर्षी राज्याभिषेक सोहळा केला जातो. पुण्याच्या शिवपूत्र शंभूराजे ट्रस्टच्या आयोजन समितीकडून हा सोहळा होतो. यंदा समितीने राज्याभिषेक करण्याचा मान यवतमाळ जिल्ह्यातील राजूर (ता. कळंब) येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त महिला वैशाली सुधाकर येडे यांना दिला. राज्याभिषेक करण्यासाठी त्यांना रितसर निमंत्रण पत्रिका पाठवून बोलावून घेण्यात आले होते. वैशाली येडे निमंत्रण प्राप्त झाल्यावर आपल्या दोन्ही मुलींसह पुरंदर गडावर हजर झाल्या.गडावरील सोहळ्यात वैशाली येडे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाराजांना पुष्पहार अर्पण करून त्यांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी महाराजांना साकडे घातले. यावेळी महाराष्ट्रातील शिवप्रेमींसह मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.साहित्यिक विसरले, महाराष्ट्र नव्हे !२०१९ मध्ये यवतमाळात झालेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उद्घाटक नयनतारा सहगल यांच्या नावावर मोठा वाद झाला होता. त्यानंतर ऐनवेळी वैशाली येडे यांना उद्घाटक म्हणून सन्मान देण्यात आला. उद्घाटनाच्या भाषणातून वैशाली येडे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर तडाखेबाज भाषण केले होते. मात्र, साहित्यिकांनी वर्षभरातच त्यांचे नाव अडगळीत टाकले. यंदा उस्मानाबादमध्ये झालेल्या ९३ व्या संमेलनात वैशाली येडे यांना साधे निमंत्रण पाठविण्याचेही औचित्य साहित्यिकांनी दाखविले नाही. मात्र साहित्यिक त्यांना विसरले, तरी महाराष्ट्र विसरलेला नाही. म्हणूनच पुरंदर किल्ल्यावर झालेल्या शंभूराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यात त्यांना सन्मानपूर्वक अभिषेकाचा मान देण्यात आला, अशी प्रतिक्रिया राजूर गावातून उमटत आहेत.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती