शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

चुरमुरा येथे तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 23:42 IST

गावकुसाबाहेरील पिण्याच्या पाण्याचे सर्व स्त्रोत आटल्याने चुरमुरा येथील गावकऱ्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी आबालवृद्धांसह महिलांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : गावकुसाबाहेरील पिण्याच्या पाण्याचे सर्व स्त्रोत आटल्याने चुरमुरा येथील गावकऱ्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी आबालवृद्धांसह महिलांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.गावाच्या चारही बाजूंनी घनदाट जंगल आहे. सीताफळांचा बगीचा म्हणून या परिसराची ओळख आहे. तेंदूपत्ता संकलन, शेतीसह पशूपालन असे पूरक व्यसाय करून ग्रामस्थ उदरनिवार्ह करतात. वर्षांपूर्वी या परिसराची सुजलाम, सुफलाम म्हणून ओळख होती. मात्र आता त्याच चुरमुरा गावाचे वैभव शासन व लोकप्रतिनीधींच्या नाकर्तेपणामुळे संपुष्टात आले आहे.जंगलात बेसुमार वृक्षतोड झाल्यामुळे सभोवतालच्या विहिरी, बोअर, हातपंप हे पाण्याचे संपूर्ण स्रोतच आटले आहे. त्यामुळे रणरणत्या उन्हात महिला, पुरुष, बालकांना हंडाभर पाण्यासाठी तास न् तास भटकंती करावी लागत आहे. गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी हालअपेष्टा भोगाव्या लागत आहेत. २०१७ मध्ये पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत गावकºयांनी सहभाग घेतला होता.येथील काही सामाजिक संघटनांनी गावकऱ्यांना प्रोत्साहित करून सलग समतल चर, लूज बोल्ड स्ट्रक्चर बंधारे, सिमेंट बांध, माती नाला बांध, शेततळे, दगडी बांध आदी कामे केली होती. त्यामुळे चुरमुरा गावाने तालुक्यातून तिसरा क्रमांक मिळविला होता. गावाला पाच लाखांचे बक्षीस मिळाले होते. मात्र बक्षिसाची रक्कम गावातील तीव्र पाणी टंचाईचा कायमस्वरूपी निपटारा करण्यासाठी वापर करण्यास गावातील लोकप्रतीनिधी उदासीन आहे. परिणामी गावकºयांची पिण्याच्या पाण्यावाचून दैना होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई