शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

बाजार समितीच्या सात हजार कर्मचाऱ्यांना बेरोजगारीचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 08:39 IST

कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट ओढवण्याची चिन्हे पाहता शासनाने आतापासूनच त्यांना शासन सेवेत सामावून घेता येते काय? यादृष्टीने चाचपणी चालविली आहे.

ठळक मुद्दे नव्या कायद्याचा संभाव्य परिणाम शासनसेवेत सामावून घेण्यासाठी चाचपणी

विलास गावंडे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नव्या केंद्रीय कायद्याच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील ३०७ बाजार समित्या आणि तेथे कार्यरत सात हजार कर्मचाऱ्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट ओढवण्याची चिन्हे पाहता शासनाने आतापासूनच त्यांना शासन सेवेत सामावून घेता येते काय? यादृष्टीने चाचपणी चालविली आहे.

व्यापाºयांना विनाअट शेतमाल खरेदीची परवानगी देण्यात आल्याने बाजार समितीच्या अस्तित्वाला धक्का पोहोचला आहे. खासगी बाजार समित्यांमुळे शेतकरी बाजार समितीत येण्याविषयी शंका आहे. परिणामी या संस्थांचे उत्पन्न कमी होण्यासोबतच कालांतराने सुरू राहण्याविषयीसुध्दा शंका आहे. हे धोके लक्षात घेऊनच शासनाने कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या असल्याचे सांगितले जाते.राज्यभरात असलेल्या ३०७ बाजार समित्या आणि ६१५ उपबाजारात सद्यस्थितीत ६ हजार ८७७ कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये सचिव, सहायक सचिव, लेखापाल, प्रतवारीकार (ग्रेडर), लिपिक, सांख्यिकी, शिपाई आदी प्रवर्गातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बाजार समितीच्या विस्तारानुसार कर्मचाऱ्यांची संख्या आहेत. एका ठिकाणी किमान २० ते २५ कर्मचारी आहेत. गेली अनेक वर्षांपासून सेवा देत असलेल्या या कर्मचाऱ्यांना अचानक धक्का पोहोचू नये, यासाठी आतापासूनच उपाययोजना आखण्याची तयार सुरू करण्यात आली आहे.२१ सप्टेंबरच्या बैठकीकडे नजरासहकार व पणन मंत्री जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार २१ सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे. यामध्ये बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना शासनसेवेत सामावून घेण्याविषयी चर्चा केली जाणार आहे. यासाठी पणन संचालक, बाजार समितीचे कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ अध्यक्ष, मराठा क्रांती ठोक मोर्चा प्रमुख आबासाहेब पाटील आणि बाजार समिती कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत घेण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला. या कर्मचाऱ्यांची उपासमार होणार नाही, त्यांचे कुटुंब उघड्यावर येणार नाही, यासाठी हा प्रयत्न आहे. शासन यादृष्टीने धोरणात्मक निर्णय घेईल.- भीमराव केराम, आमदार किनवट विधानसभा

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड