शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
2
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
3
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
4
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
5
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
6
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
7
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
8
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
9
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
10
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
11
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
14
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
15
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
16
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
17
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
18
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
19
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
20
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीच्या सात हजार कर्मचाऱ्यांना बेरोजगारीचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 08:39 IST

कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट ओढवण्याची चिन्हे पाहता शासनाने आतापासूनच त्यांना शासन सेवेत सामावून घेता येते काय? यादृष्टीने चाचपणी चालविली आहे.

ठळक मुद्दे नव्या कायद्याचा संभाव्य परिणाम शासनसेवेत सामावून घेण्यासाठी चाचपणी

विलास गावंडे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नव्या केंद्रीय कायद्याच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील ३०७ बाजार समित्या आणि तेथे कार्यरत सात हजार कर्मचाऱ्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट ओढवण्याची चिन्हे पाहता शासनाने आतापासूनच त्यांना शासन सेवेत सामावून घेता येते काय? यादृष्टीने चाचपणी चालविली आहे.

व्यापाºयांना विनाअट शेतमाल खरेदीची परवानगी देण्यात आल्याने बाजार समितीच्या अस्तित्वाला धक्का पोहोचला आहे. खासगी बाजार समित्यांमुळे शेतकरी बाजार समितीत येण्याविषयी शंका आहे. परिणामी या संस्थांचे उत्पन्न कमी होण्यासोबतच कालांतराने सुरू राहण्याविषयीसुध्दा शंका आहे. हे धोके लक्षात घेऊनच शासनाने कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या असल्याचे सांगितले जाते.राज्यभरात असलेल्या ३०७ बाजार समित्या आणि ६१५ उपबाजारात सद्यस्थितीत ६ हजार ८७७ कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये सचिव, सहायक सचिव, लेखापाल, प्रतवारीकार (ग्रेडर), लिपिक, सांख्यिकी, शिपाई आदी प्रवर्गातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बाजार समितीच्या विस्तारानुसार कर्मचाऱ्यांची संख्या आहेत. एका ठिकाणी किमान २० ते २५ कर्मचारी आहेत. गेली अनेक वर्षांपासून सेवा देत असलेल्या या कर्मचाऱ्यांना अचानक धक्का पोहोचू नये, यासाठी आतापासूनच उपाययोजना आखण्याची तयार सुरू करण्यात आली आहे.२१ सप्टेंबरच्या बैठकीकडे नजरासहकार व पणन मंत्री जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार २१ सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे. यामध्ये बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना शासनसेवेत सामावून घेण्याविषयी चर्चा केली जाणार आहे. यासाठी पणन संचालक, बाजार समितीचे कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ अध्यक्ष, मराठा क्रांती ठोक मोर्चा प्रमुख आबासाहेब पाटील आणि बाजार समिती कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत घेण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला. या कर्मचाऱ्यांची उपासमार होणार नाही, त्यांचे कुटुंब उघड्यावर येणार नाही, यासाठी हा प्रयत्न आहे. शासन यादृष्टीने धोरणात्मक निर्णय घेईल.- भीमराव केराम, आमदार किनवट विधानसभा

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड