शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात सात लाख ९७ हजार शेती पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2022 21:29 IST

Yawatmal News अतिवृष्टीने विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात सात लाख ९७ हजार शेतीपिकांना फटका बसला आहे.

ठळक मुद्देनुकसानभरपाईसाठी शासनाकडे पाठविला प्रस्ताव

अमरावती : जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात सात लाख ९७ हजार शेतीपिकांना फटका बसला आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नुकसानभरपाईचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे.

वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तब्बल चार लाख २२ हजार २९६.३० हेक्टरवर सोयाबीन, तूर, कपाशी आदी पिकांची लागवड केली. पण जुलै महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल ४३.५२ टक्के शेतीपिकांचेपूर्णतः नुकसान झाले आहे. याच दोन लाख १७ हजार २५९ हवालदिल शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून शासकीय मदत देण्यासाठी १२२ कोटी ६९ लाख ५८ हजार ८७६ रुपयांच्या निधीची गरज असून, तशी मागणी वर्धा जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात जुलैअखेरपर्यंत तीन लाख दहा हजार हेक्टरचे नुकसान झाल्याची नाेंद आहे. यात ३५ मंडळांचा समावेश आहे. पावसाने कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, भाजीपाला पिकाचे नुकसान केले आहे. मूग आणि उडीद हे दोन्ही पिके अतिपावसाने हातातून गेली आहेत. पिकाचे उत्पन्न ५० टक्क्यांपेक्षा अधिक कमी होण्याचा धोका वर्तविला जात आहे.

अमरावती जिल्ह्यात २.७० लाख हेक्टर बाधित झाले असून, जुलै महिन्यात ५६ महसुलात अतिवृष्टी झाली. त्यामुळे २,५०,२६९ शेतकऱ्यांच्या २,७०,९१० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झालेले आहे. या आपत्तीमुळे जिरायती क्षेत्रात २,११,३४५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन ९०,५१७.७५ हेक्टर, कपाशी ७५,४५२.३४, तूर ३१,००३, मूग १३.५२, उडीद ३.३६, तीळ ७, मका ३,६९०.२२, ज्वारी २,८९५.६४, मिरची १३५.२५ व इतर पिकांचे १,०७० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :floodपूरagricultureशेती