शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात सात लाख ९७ हजार शेती पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2022 21:29 IST

Yawatmal News अतिवृष्टीने विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात सात लाख ९७ हजार शेतीपिकांना फटका बसला आहे.

ठळक मुद्देनुकसानभरपाईसाठी शासनाकडे पाठविला प्रस्ताव

अमरावती : जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात सात लाख ९७ हजार शेतीपिकांना फटका बसला आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नुकसानभरपाईचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे.

वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तब्बल चार लाख २२ हजार २९६.३० हेक्टरवर सोयाबीन, तूर, कपाशी आदी पिकांची लागवड केली. पण जुलै महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल ४३.५२ टक्के शेतीपिकांचेपूर्णतः नुकसान झाले आहे. याच दोन लाख १७ हजार २५९ हवालदिल शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून शासकीय मदत देण्यासाठी १२२ कोटी ६९ लाख ५८ हजार ८७६ रुपयांच्या निधीची गरज असून, तशी मागणी वर्धा जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात जुलैअखेरपर्यंत तीन लाख दहा हजार हेक्टरचे नुकसान झाल्याची नाेंद आहे. यात ३५ मंडळांचा समावेश आहे. पावसाने कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, भाजीपाला पिकाचे नुकसान केले आहे. मूग आणि उडीद हे दोन्ही पिके अतिपावसाने हातातून गेली आहेत. पिकाचे उत्पन्न ५० टक्क्यांपेक्षा अधिक कमी होण्याचा धोका वर्तविला जात आहे.

अमरावती जिल्ह्यात २.७० लाख हेक्टर बाधित झाले असून, जुलै महिन्यात ५६ महसुलात अतिवृष्टी झाली. त्यामुळे २,५०,२६९ शेतकऱ्यांच्या २,७०,९१० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झालेले आहे. या आपत्तीमुळे जिरायती क्षेत्रात २,११,३४५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन ९०,५१७.७५ हेक्टर, कपाशी ७५,४५२.३४, तूर ३१,००३, मूग १३.५२, उडीद ३.३६, तीळ ७, मका ३,६९०.२२, ज्वारी २,८९५.६४, मिरची १३५.२५ व इतर पिकांचे १,०७० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :floodपूरagricultureशेती