शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

सात कोटींची योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 22:42 IST

साडेचार वर्षांपूर्वी येथील सात कोटींच्या वाढीव पाणपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली. मात्र साडेचार वर्ष लोटूनही ही योजना अर्धवट आहे. त्यामुळे राळेगावकरांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.

ठळक मुद्देराळेगाव वाढीव पाणीपुरवठा : साडेचार वर्षे लोटूनही काम अद्याप सुरूच

के.एस. वर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : साडेचार वर्षांपूर्वी येथील सात कोटींच्या वाढीव पाणपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली. मात्र साडेचार वर्ष लोटूनही ही योजना अर्धवट आहे. त्यामुळे राळेगावकरांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.प्रा.वसंतराव पुरके विधानसभा उपाध्यक्ष असताना १९ नोव्हेंबर २०१३ रोजी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालयाने सहा कोटी ९५ लाख रुपयांच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेला मान्यता दिली. आवश्यक ती लोकवर्गणी जुळवून प्रत्यक्ष कामाला सुरूवातही झाली. योजना मंजुरीच्या वेळी येथे ग्रामपंचायत अस्तित्वात होती. १ मार्च २०१४ रोजी नगरपंचायत अस्तित्वात आली. २०१५ अखेर नगरपंचायतीवर निर्वाचित प्रतिनिधी आले. मात्र गेल्या साडेचार वर्षात योजनेची गती मंदावली आहे.यावर्षी तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. मात्र वाढीव पाणीपुरवठा योजना अद्याप पूर्णत्वास गेली नाही. यामुळे शहरातील १७ प्रभागात नियमित पाणी पुरवठा करणे शक्य झाले नाही. त्यामुळे नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली असून संताप वाढत आहे. दोन- अडीच वर्षात योजना पूर्णत्वास जाणे अपेक्षित असताना विलंब लागल्याने आता अनेक नवे प्रश्न निर्माण झाले आहे. योजनेच्या खर्चात वाढ झाली. शहराचा भौगोलिक विस्तार झाला. त्यात अनेक ठिकाणची पाईपलाईन छोट्या आकाराची असल्याने सध्या अनेक भागात पाणी पोहोचविणे कठीण झाले आहे.जुनी नळ योजना ६० टक्के शहरालाच पाणी पुरवठा करू शकत होती. आता वाढीव पाणीपुरवठा योजा क्रियान्वित करताना अनेक अडचणी येत असल्याने कधी कोठे जुन्या, तर कधी कोठे नव्या नळ योजनेद्वारे पाणी पुरवठा केला जातो. दुसरीकडे शहरातील खासगी, सार्वजनिक हातपंप, विहिरी आटल्याने नागरिक संकटात सापडले आहे. अनेकांनी केवळ पाण्यासाठी जुना व चालू कर, पाणी कर, नळ कनेक्शन शुल्क, जोडणी शुल्काचा खर्च केला. मात्र त्यांना चातकाप्रमाणे पाण्याची प्रतीक्षा आहे.दुसरीकडे प्रत्येक मार्गावर पाईप टाकण्यासाठी नाल्या खोदण्यात आल्या. नळ कनेक्शनसाठी रस्ते फोडण्यात आले. यामुळे डांबरी रस्ते, सिमेंट रस्त्यांची दुरावस्था झाली. त्यात पाईप फुटण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचा संयम सुटू लागला आहे.जीवन प्राधिकरण, कंत्रादटारात असमन्वयमहाराष्टÑ जीवन प्राधिकरण व कंत्राटदारात समन्वय नसल्यानेही ही योजना लांबणीवर पडली आहे. तांत्रिक बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने शहराच्या अनेक भागात पाणी पोहोचत नाही. त्यामुळे नागरिक दिवस-रात्र पाण्यासाठी ठिकठिकाणी भटकंती करीत आहे. लोकप्रतिनिधी, नगरपंचायत पदाधिकारी, मुख्याधिकारी आदींनी वेळोवेळी याकरिता प्रयत्न केले. तथापि त्यांचे प्रयत्न थिटे पडले. परिणामी भर उन्हाळ्यात २० हजार लोकसंख्येच्या या तालुका, उपविभाग, विधानसभा क्षेत्र मुख्यालयाला दिलासा मिळाला नाही.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई