शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
5
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
6
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
7
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
8
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
9
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
10
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
11
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
13
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
14
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
15
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
16
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
17
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
18
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
19
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
20
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

सात कोटींची योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 22:42 IST

साडेचार वर्षांपूर्वी येथील सात कोटींच्या वाढीव पाणपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली. मात्र साडेचार वर्ष लोटूनही ही योजना अर्धवट आहे. त्यामुळे राळेगावकरांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.

ठळक मुद्देराळेगाव वाढीव पाणीपुरवठा : साडेचार वर्षे लोटूनही काम अद्याप सुरूच

के.एस. वर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : साडेचार वर्षांपूर्वी येथील सात कोटींच्या वाढीव पाणपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली. मात्र साडेचार वर्ष लोटूनही ही योजना अर्धवट आहे. त्यामुळे राळेगावकरांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.प्रा.वसंतराव पुरके विधानसभा उपाध्यक्ष असताना १९ नोव्हेंबर २०१३ रोजी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालयाने सहा कोटी ९५ लाख रुपयांच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेला मान्यता दिली. आवश्यक ती लोकवर्गणी जुळवून प्रत्यक्ष कामाला सुरूवातही झाली. योजना मंजुरीच्या वेळी येथे ग्रामपंचायत अस्तित्वात होती. १ मार्च २०१४ रोजी नगरपंचायत अस्तित्वात आली. २०१५ अखेर नगरपंचायतीवर निर्वाचित प्रतिनिधी आले. मात्र गेल्या साडेचार वर्षात योजनेची गती मंदावली आहे.यावर्षी तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. मात्र वाढीव पाणीपुरवठा योजना अद्याप पूर्णत्वास गेली नाही. यामुळे शहरातील १७ प्रभागात नियमित पाणी पुरवठा करणे शक्य झाले नाही. त्यामुळे नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली असून संताप वाढत आहे. दोन- अडीच वर्षात योजना पूर्णत्वास जाणे अपेक्षित असताना विलंब लागल्याने आता अनेक नवे प्रश्न निर्माण झाले आहे. योजनेच्या खर्चात वाढ झाली. शहराचा भौगोलिक विस्तार झाला. त्यात अनेक ठिकाणची पाईपलाईन छोट्या आकाराची असल्याने सध्या अनेक भागात पाणी पोहोचविणे कठीण झाले आहे.जुनी नळ योजना ६० टक्के शहरालाच पाणी पुरवठा करू शकत होती. आता वाढीव पाणीपुरवठा योजा क्रियान्वित करताना अनेक अडचणी येत असल्याने कधी कोठे जुन्या, तर कधी कोठे नव्या नळ योजनेद्वारे पाणी पुरवठा केला जातो. दुसरीकडे शहरातील खासगी, सार्वजनिक हातपंप, विहिरी आटल्याने नागरिक संकटात सापडले आहे. अनेकांनी केवळ पाण्यासाठी जुना व चालू कर, पाणी कर, नळ कनेक्शन शुल्क, जोडणी शुल्काचा खर्च केला. मात्र त्यांना चातकाप्रमाणे पाण्याची प्रतीक्षा आहे.दुसरीकडे प्रत्येक मार्गावर पाईप टाकण्यासाठी नाल्या खोदण्यात आल्या. नळ कनेक्शनसाठी रस्ते फोडण्यात आले. यामुळे डांबरी रस्ते, सिमेंट रस्त्यांची दुरावस्था झाली. त्यात पाईप फुटण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचा संयम सुटू लागला आहे.जीवन प्राधिकरण, कंत्रादटारात असमन्वयमहाराष्टÑ जीवन प्राधिकरण व कंत्राटदारात समन्वय नसल्यानेही ही योजना लांबणीवर पडली आहे. तांत्रिक बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने शहराच्या अनेक भागात पाणी पोहोचत नाही. त्यामुळे नागरिक दिवस-रात्र पाण्यासाठी ठिकठिकाणी भटकंती करीत आहे. लोकप्रतिनिधी, नगरपंचायत पदाधिकारी, मुख्याधिकारी आदींनी वेळोवेळी याकरिता प्रयत्न केले. तथापि त्यांचे प्रयत्न थिटे पडले. परिणामी भर उन्हाळ्यात २० हजार लोकसंख्येच्या या तालुका, उपविभाग, विधानसभा क्षेत्र मुख्यालयाला दिलासा मिळाला नाही.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई