शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

खून, बलात्काराचे प्रलंबित गुन्हे चार दिवसात निकाली काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 05:00 IST

डॉ. भुजबळ यांनी जिल्ह्यातील प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी सर्व ठाणेदार व एसडीपीओंची बैठक घेतली. त्यात सर्व प्रकारच्या प्रलंबित गुन्ह्यांचा लेखाजोखा ठेवला गेला. चक्क चार ते पाच वर्षांपासून गुन्हे प्रलंबित असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. त्यामुळे एसपी भुजबळ जाम संतापले. तपासाच्या या पद्धती व संथगती कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असा प्रकार पुन्हा दिसल्यास थेट कारवाईला तयार राहा असा थेट इशारा एसपींनी दिला.

ठळक मुद्देएसपींचा ‘अल्टीमेटम’ : जबाबदारी एसडीपीओंवर, आढावा बैठकीत संताप

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात खून, बलात्कार, वाटमारी, खुनाचा प्रयत्न, घरफोडी, शासकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ले, अकस्मात संशयास्पद मृत्यू असे शंभरावर गुन्हे प्रलंबित आहे. यातील काही गुन्हे एक ते पाच वर्षांपेक्षा अधिक काळापासून निकाली निघालेले नाही. जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या तपासाच्या या संथगतीवर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला. प्रलंबित गुन्हे निकाली काढण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना चार दिवसाचा अल्टीमेटम देण्यात आला असून गुन्हे मार्गी लावण्याची जबाबदारी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. डॉ. भुजबळ यांनी जिल्ह्यातील प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी सर्व ठाणेदार व एसडीपीओंची बैठक घेतली. त्यात सर्व प्रकारच्या प्रलंबित गुन्ह्यांचा लेखाजोखा ठेवला गेला. चक्क चार ते पाच वर्षांपासून गुन्हे प्रलंबित असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. त्यामुळे एसपी भुजबळ जाम संतापले. तपासाच्या या पद्धती व संथगती कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असा प्रकार पुन्हा दिसल्यास थेट कारवाईला तयार राहा असा थेट इशारा एसपींनी दिला. यवतमाळ शहर, अवधूतवाडी, पुसद ग्रामीण, पुसद शहर, उमरखेड, महागाव अशा काही पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्याचे आढळून आले. अकस्मात संशयास्पद मृत्यूची ३० ते ४० प्रकरणे प्रलंबित आहे. त्यानंतरही तपास अधिकारी, ठाणेदार, एसडीपीओ यांनी दखल न घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. एवढ्या मोठ्या संख्येने गुन्हे प्रलंबित असताना संबंधित तपास अधिकारी बिनधास्त रजेवर जाऊ शकतात कसे असा सवाल एसपींनी उपस्थित केला. काही गुन्हे दाखल झाले असताना मासिक अहवालात नमूद केले गेले नाही, प्रलंबित गुन्ह्यांचा आकडा कमी  दिसावा म्हणून अहवालातून गुन्हे दडपले गेल्याचा संशय व्यक्त केला गेला. एकूणच प्रलंबित गुन्ह्यांचा वाढलेला डोंगर खणून काढण्याची जबाबदारी एसपी भुजबळ यांनी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपविली आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्याकडे गुन्हे प्रलंबित आहे, त्यांना एसडीपीओ कार्यालयात आणून बसवा, तेथेच त्यांच्याकडून पुढील चार दिवसात हे गुन्हे निकाली काढा असे निर्देश एसडीपीओंना देण्यात आले. उमरखेड, पुसद, दारव्हा, यवतमाळ विभागाच्या तुलनेत पांढरकवडा व वणी विभागात प्रलंबित गुन्ह्यांची संख्या नगण्य असल्याचे सांगितले जाते.  

पोलिसांवर निलंबन कारवाईची टांगती तलवार अवैध धंदे कोणत्याही परिस्थितीत नकोच अशी स्पष्ट भूमिका जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी जिल्ह्यात रुजू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून घेतली आहे. त्यानंतरही काही ठिकाणी धंदे सुरू आहेत. तर कुठे संबंधित बीट जमादार व पोलिसांचे दुर्लक्ष, अप्रत्यक्ष संरक्षण त्याला कारणीभूत ठरल्याचे आढळून आले. त्यामुळे अशा पोलिसांना निलंबित करण्याचा सपाटा एसपींनी सुरू केला आहे. अनेक वर्ष गुन्हे प्रलंबित ठेवणाऱ्या काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरसुद्धा निलंबन कारवाईची टांगती तलवार आहे. पुढील आठवड्यात त्यांच्यावर ही कारवाई होण्याची शक्यता आहे. एका एपीआयकडे तब्बल २५ गुन्हे प्रलंबित असल्याचे आढळून आले. याशिवाय काही जमादारांकडे अकस्मात मृत्यूची प्रकरणे अशीच मोठ्या संख्येने प्रलंबित दिसून आली. त्यांच्यावर एसपींच्या कारवाईचा हातोडा पडणार असल्याचेही सांगितले जाते.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस