शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

Ganesh Mahotsav; यवतमाळात पोलिसांकडून सामूहिक गणेश विसर्जनाचा वेगळा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 11:16 IST

नगरपरिषदांच्या सहाय्याने गणेश विसर्जनासाठी रथ तयार केला जाणार आहे. पोलिसांचा हा रथ मंडळाची गणेश मूर्ती विसर्जनासाठी नेणार आहे. एका रथात एका वेळी किमान १० ते २० सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी नेले जाणार आहेत.

ठळक मुद्देपोलिसांचा गणेश विसर्जन रथ स्वत: जाणार मंडळांकडे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: दरवर्षी जिल्ह्यात तब्बल एक हजार ७२३ सार्वजनिक मंडळांकडून गणेशाची स्थापना करून उत्सव साजरा केला जातो. परंतु यावर्षी कोरोनामुळे पोलिसांनी केलेल्या आवाहनाला मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रस्त्यावर मंडप न टाकता उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय लेखी स्वरूपात जाहीर केला. विशेष असे, मंडळांच्या गणपतीचे विसर्जन करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाने आपल्या खांद्यावर घेतली.जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना यावर्षी उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्याला सर्वांनीच जोरदार प्रतिसाद दिला. त्यानुसार आतापर्यंत ८१२ मंडळांनी आपण यावर्षी गणेशोत्सव साजरा करणार नाही असे लेखी कळविले आहे. सुमारे साडेसहाशे सार्वजनिक मंडळ गणेशाची स्थापना करणार, परंतु त्यासाठी कुठेही रस्त्यावर मंडप टाकणार नाही. दुकान, मंदिर अथवा पदाधिकाऱ्याच्या घरी ही स्थापना केली जाणार आहे. तर सध्या १०० ते १२० मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यावर ठाम आहे. त्यांचेही मन वळविण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून केला जातोय.

यावर्षी गणेश मंडळांना कोरोनामुळे फारशी वर्गणी मिळण्याची चिन्हे नाहीत, त्यामुळे गणेश विसर्जनासाठी ट्रॅक्टर लावण्याचा त्यांचा खर्च वाचविण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला. शिवाय किमान चार-पाच लोक व ट्रॅक्टर एकाच वेळी रस्त्यावर आल्यास गर्दी होण्याची भीती आहे. म्हणून नगरपरिषदांच्या सहाय्याने गणेश विसर्जनासाठी रथ तयार केला जाणार आहे. मंडळांनी आपल्या गणपतीची आरती व पूजाअर्चा करायची, पोलिसांचा हा रथ  मंडळाची गणेश मूर्ती विसर्जनासाठी नेणार आहे. विसर्जनासाठी वेगवेगळे दिवस ठरवून दिले जाणार आहे. एका रथात एका वेळी किमान १० ते २० सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी नेले जाणार आहेत. त्यांचे विधीवत विसर्जन करण्यात येईल. त्यामुळे कोरोना काळात संसर्ग रोखणे व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास मोठी मदत होणार आहे. सामाजिक स्वाथ्यही त्यातून सांभाळले जाणार असल्याचे सांगण्यात आले.पोलिसांच्या नियोजनांचे पालकमंत्र्यांकडून कौतुकराज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी गुरुवारी गणेशोत्सव तयारीचा जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्याकडून आढावा घेतला. पोलिसांनी उत्सव काळातील गर्दी टाळण्यासाठी सादर केलेल्या नियोजनाचे पालकमंत्र्यांनी तोंड भरुन कौतुक केले. अजूनही सार्वजनिक उत्सवाच्या मानसिकतेत असलेल्या १०० ते १२० मंडळांना कन्व्हेन्स करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी एसपींना केल्या.समाजकार्यावरच द्या जोरगणेश मंडळांनी खर्चाचे नियोजन केले. परंतु हा पैसा मंडप टाकून उत्सव करण्याऐवजी कोरोनामुळे आर्थिक संकटात असलेल्या गोरगरिबांना मदतीसाठी वापरण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले. त्याला मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समर्थन दिले आहे.गणेशोत्सवाचे सार्वजनिक स्वरूप कोरोनामुळे यंदा थांबविण्याचा प्रयत्न आहे. त्याला मंडळांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून त्यांची पोलिसांना साथ आहे.- एम. राज कुमार पोलीस अधीक्षक

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव