शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

संतोषसाठी सरसावली संवेदनशील मने

By admin | Updated: May 15, 2017 00:59 IST

‘दुनिया में इतना गम है, मेरा गम कितना कम है, लोगों का गम देखा तो, मै अपना गम भुला गया’ या पंक्तितून

मुकेश इंगोले । लोकमत न्यूज नेटवर्क दारव्हा : ‘दुनिया में इतना गम है, मेरा गम कितना कम है, लोगों का गम देखा तो, मै अपना गम भुला गया’ या पंक्तितून एका शायराने जीवनातील दु:खावर भाष्य केले. खरंच दिव्यांग संतोषकडे पाहिलं की आपले सर्व दु:ख विसरून जातो. संतोष आणि डोंगराएवढं दु:ख ही कहाणी सोशल मीडियावर सुनील आरेकर या युवकाच्या माध्यमातून व्हायरल झाली व संवेदनशील मने पुढे सरसावली. दारव्हा येथील आर्ट आॅफ लिव्हींग परिवारातील सदस्य प्रा. प्रेम राठोड यांच्या पुढाकाराने संतोषच्या घरी दाखल झाले. राजेंद्र सोनोने, अ‍ॅड. आशीष वानखडे, रूपेश गोळे यांनी दिव्यांग संतोषला आर्थिक मदत करत दु:ख हलके करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय दारव्हा प्रहार संघटनेचे नरेश भोयर, आर्णीचे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण मुनगीनवार, विश्वास सवने, अरविंद गादेवार, महेश गांधी, रंजित झोंबाडे यांनीसुद्धा संतोषचे दु:ख कवेत घेण्याचा मनोदय व्यक्त केला. कुऱ्हाड येथील संतोष रमेश बोराडे (२८) या युवकाच्या आयुष्यातील काटेरी क्षण अंतर्मुख करायला लावणारे आहे. तो ८० टक्के अपंग आहे. आई, वडील, दोन भाऊ, एक बहीणसोबत मजुरी करून उदरनिर्वाह करायचा. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने केवळ तिसरीपर्यंत शिक्षण घेवू शकला. दहा वर्षांपूर्वीचा आयुष्यातील घटनाक्रम काळीज चिरणारा आहे. लहान बहिणीला पिसाळलेल्या कुत्र्याचे चावा घेतला. तिच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान तिला घरी आणल्यावर भावंडे एकत्र भोजन करायचे. संतोषला संसर्ग होवू नये म्हणून डॉक्टरने संतोष व त्याचा मोठा भाऊ दामा यांना इंजेक्शन दिले. तेव्हा संतोषच्या छातीपासून शरीराच्या खालील भागाची हालचाल थांबली. त्याला कायमचे अपंगत्व आले. दुर्देवाने काही दिवसातच त्याची बहीण व भाऊ दामाचा मृत्यू झाला. त्याच्या आई-वडिलांना भविष्याची चिंता सतावत होती. आजारपणात तेही वारले. बोराडे कुटुंबात आता दिव्यांग संतोष, लहान भाऊ कृष्णा आणि त्यांच्या सोबतीला आभाळाएवढं दु:ख. स्वत:ला सावरत दोघा भावंडांनी नवीन आयुष्याला प्रारंभ केला. कृष्णा मोलमजुरी करून दिव्यांग भावाचे पालनपोषण करू लागला. संतोषला चालता-फिरता येत नाही. जेवताना घाससुद्धा भरवावा लागतो. कृष्णाच जणू त्याची माय बनला. कृष्णाचे दोन आठवड्यापूर्वी लग्न झाले. संतोष केवळ बोलून आपल्या भावना व्यक्त करू शकतो. अपंग निराधार योजनेंतर्गत दरमहा ६०० रुपये त्याला मिळतात. २० किलोमीटर अंतरावरील कुऱ्हाडहून एखादा शेजारी त्याला घेवून दारव्हा येथे बँकेत येतो. अपंगांसाठी घरकूल मिळणार असल्याचे सांगितल्याने तो घरकुलाचं स्वप्न रंगवितोय. शासनाची मदत मिळाल्यास घरबसल्या एखादा व्यवसाय करून लहान भावाचा भार हलका करण्याचा संतोषचा दुर्दम्य आत्मविश्वास आयुष्यात नवी उमेद निर्माण करणारा आहे. अनेक सामाजिक संस्था तथा दानशूर व्यक्तींनी त्याच्या आयुष्यात नंदनवन फुलविण्याचा मनोदय व्यक्त केला.