शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना घरी पाठवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 14:01 IST

कोरोना आजाराची धास्ती लक्षात घेता राज्यातील आदिवासी आश्रमशाळांनाही ३१ मार्चपर्यंत सुट्या जाहीर करण्यात आल्या आहे. तर आश्रमशाळा वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ताबडतोब त्यांच्या घरी पाठविण्याचे निर्देश आदिवासी विकास आयुक्तालयाने दिले आहे.

ठळक मुद्देआयुक्तालयाचे निर्देश कोरोना रोखण्यासाठी आश्रमशाळांनाही सुट्या

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना आजाराची धास्ती लक्षात घेता राज्यातील आदिवासी आश्रमशाळांनाही ३१ मार्चपर्यंत सुट्या जाहीर करण्यात आल्या आहे. तर आश्रमशाळा वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ताबडतोब त्यांच्या घरी पाठविण्याचे निर्देश आदिवासी विकास आयुक्तालयाने दिले आहे. जिल्ह्यातील पुसद आणि पांढरकवडा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांमध्ये हे आदेश धडकले आहे.कोव्हीड-१९ आजारासाठी गर्दी धोक्याची आहे. त्यामुळे सार्वजनिक सोहळे रद्द करण्यात आले आहे. मात्र शालेय विद्यार्थी शाळेत एकत्र बसल्यानंतर संसर्गाचा धोका अधिक आहे. ही बाब टाळण्यासाठी राज्य शासनाने शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्या घोषित केल्या. मात्र हा आदेश केवळ नगरपालिका, महापालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील शाळांना लागू होता. यातून ग्रामीण भागातील शाळा वगळण्यात आल्या आहेत.मात्र आता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्देशांचा हवाला देत आदिवासी विकास उपायुक्त अविनाश चव्हाण यांनी अमरावती, नागपूरसह नाशिक आणि ठाणे येथील आदिवासी अपर आयुक्तांना आश्रमशाळा बंद ठेवण्याबाबत आदेश दिले आहे. या आदेशानुसार शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, आदिवासी विकास विभागांतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळा, नामांकित शाळा, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शीयल स्कूल आदींना ३१ मार्चपर्यंत सुट्या जाहीर करण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे आश्रमशाळांमध्ये शिकणारे आणि शासकीय वसतिगृहात राहणाºया विद्यार्थ्यांनाही वसतिगृहातील हालचाल नोंद घेऊन ताबडतोब घरी पाठविण्याचे निर्देश आहे. मात्र ज्यांची दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू आहे, त्यांना वसतिगृहात ठेवण्याची सूचना आहे.विशेष म्हणजे हा आदेशही नगरपालिका, महापालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील आश्रमशाळांसाठी लागू करण्यात आला आहे. प्रत्यक्षात बहुतांश आश्रमशाळा नगरपालिका क्षेत्राच्या बाहेरच आहे. त्यामुळे हा आदेश किती आश्रमशाळा पाळतील याबाबत साशंकता आहे. प्रत्यक्षात नुकतेच होळी, रंगपंचमीच्या सुट्यांसाठी आश्रमशाळेतील गावाकडे गेलेले विद्यार्थी अद्यापही परतलेले नाही. आता या आदेशाचा गैरफायदाही घेतला जाण्याची शक्यता आहे.शहरालगतच्या शाळाही बंद ठेवण्याचे सुधारित निर्देशकोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी राज्य शासनाने नगरपालिका, महापालिका क्षेत्रातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. मात्र आता शहरालगतच्या ग्रामीण भागातील शाळाही बंद ठेवण्याचे सुधारित निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाने निर्गमित केले आहे. मात्र या आदेशातही जिल्हा परिषदेच्या शाळांचा स्पष्ट उल्लेख नसल्याने संभ्रम कायम आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आश्रमशाळा आणि वसतिगृहे बंद ठेवण्याचे आयुक्तांचे आदेश मिळाले. त्यानुसार कार्यवाही केली जात आहे. मात्र ग्रामपंचायत क्षेत्रातील आश्रमशाळांबाबत अद्याप निर्देश प्राप्त नाही.- गितांजली निकमप्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पुसद.

टॅग्स :SchoolशाळाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस