शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना घरी पाठवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 14:01 IST

कोरोना आजाराची धास्ती लक्षात घेता राज्यातील आदिवासी आश्रमशाळांनाही ३१ मार्चपर्यंत सुट्या जाहीर करण्यात आल्या आहे. तर आश्रमशाळा वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ताबडतोब त्यांच्या घरी पाठविण्याचे निर्देश आदिवासी विकास आयुक्तालयाने दिले आहे.

ठळक मुद्देआयुक्तालयाचे निर्देश कोरोना रोखण्यासाठी आश्रमशाळांनाही सुट्या

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना आजाराची धास्ती लक्षात घेता राज्यातील आदिवासी आश्रमशाळांनाही ३१ मार्चपर्यंत सुट्या जाहीर करण्यात आल्या आहे. तर आश्रमशाळा वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ताबडतोब त्यांच्या घरी पाठविण्याचे निर्देश आदिवासी विकास आयुक्तालयाने दिले आहे. जिल्ह्यातील पुसद आणि पांढरकवडा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांमध्ये हे आदेश धडकले आहे.कोव्हीड-१९ आजारासाठी गर्दी धोक्याची आहे. त्यामुळे सार्वजनिक सोहळे रद्द करण्यात आले आहे. मात्र शालेय विद्यार्थी शाळेत एकत्र बसल्यानंतर संसर्गाचा धोका अधिक आहे. ही बाब टाळण्यासाठी राज्य शासनाने शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्या घोषित केल्या. मात्र हा आदेश केवळ नगरपालिका, महापालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील शाळांना लागू होता. यातून ग्रामीण भागातील शाळा वगळण्यात आल्या आहेत.मात्र आता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्देशांचा हवाला देत आदिवासी विकास उपायुक्त अविनाश चव्हाण यांनी अमरावती, नागपूरसह नाशिक आणि ठाणे येथील आदिवासी अपर आयुक्तांना आश्रमशाळा बंद ठेवण्याबाबत आदेश दिले आहे. या आदेशानुसार शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, आदिवासी विकास विभागांतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळा, नामांकित शाळा, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शीयल स्कूल आदींना ३१ मार्चपर्यंत सुट्या जाहीर करण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे आश्रमशाळांमध्ये शिकणारे आणि शासकीय वसतिगृहात राहणाºया विद्यार्थ्यांनाही वसतिगृहातील हालचाल नोंद घेऊन ताबडतोब घरी पाठविण्याचे निर्देश आहे. मात्र ज्यांची दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू आहे, त्यांना वसतिगृहात ठेवण्याची सूचना आहे.विशेष म्हणजे हा आदेशही नगरपालिका, महापालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील आश्रमशाळांसाठी लागू करण्यात आला आहे. प्रत्यक्षात बहुतांश आश्रमशाळा नगरपालिका क्षेत्राच्या बाहेरच आहे. त्यामुळे हा आदेश किती आश्रमशाळा पाळतील याबाबत साशंकता आहे. प्रत्यक्षात नुकतेच होळी, रंगपंचमीच्या सुट्यांसाठी आश्रमशाळेतील गावाकडे गेलेले विद्यार्थी अद्यापही परतलेले नाही. आता या आदेशाचा गैरफायदाही घेतला जाण्याची शक्यता आहे.शहरालगतच्या शाळाही बंद ठेवण्याचे सुधारित निर्देशकोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी राज्य शासनाने नगरपालिका, महापालिका क्षेत्रातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. मात्र आता शहरालगतच्या ग्रामीण भागातील शाळाही बंद ठेवण्याचे सुधारित निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाने निर्गमित केले आहे. मात्र या आदेशातही जिल्हा परिषदेच्या शाळांचा स्पष्ट उल्लेख नसल्याने संभ्रम कायम आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आश्रमशाळा आणि वसतिगृहे बंद ठेवण्याचे आयुक्तांचे आदेश मिळाले. त्यानुसार कार्यवाही केली जात आहे. मात्र ग्रामपंचायत क्षेत्रातील आश्रमशाळांबाबत अद्याप निर्देश प्राप्त नाही.- गितांजली निकमप्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पुसद.

टॅग्स :SchoolशाळाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस