शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

शालेय पोषण आहार आता स्वयंपाक्यांच्या भरवशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 11:03 IST

शाळेतल्या पोरांसाठी खिचडी शिजवायची अन् महिन्याची हजार रुपयांची मजुरी मिळवायची, हे काम करणाऱ्यांना आता शालेय पोषण आहार योजनेची संपूर्ण जबाबदारीच पेलावी लागणार आहे.

ठळक मुद्देसंचालनालयाने झटकले हात उरलेला तांदूळ वापरा अन् किराणाही तुम्हीच आणा

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्क।यवतमाळ : शाळेतल्या पोरांसाठी खिचडी शिजवायची अन् महिन्याची हजार रुपयांची मजुरी मिळवायची, हे काम करणाऱ्यांना आता शालेय पोषण आहार योजनेची संपूर्ण जबाबदारीच पेलावी लागणार आहे. ‘अन्न शिजविणाऱ्या’ यंत्रणेनेच धान्यादी माल आणून पोषण आहार शिजवावा, असे फर्मान राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालकांनी सोडले आहे. दर महिन्याची मजुरीच वेळेवर मिळण्याचे वांदे असलेले हे ‘स्वयंपाकी’ स्वत:च किराणा आणून पोरांना आहार देऊ शकतील का, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.भारतीय अन्न महामंडळाकडून शाळांपर्यंत तांदळाचा पुरवठा करणाऱ्या वाहतूकदाराचा कंत्राट संपलेला आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यासाठी शाळांपर्यंत तांदूळ पुरविण्याची समस्या निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, नव्या कंत्राटासाठी शिक्षण संचालनालयाने आता कुठे ई-निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. ती पूर्ण होण्यास वेळ लागणार आहे.त्यामुळे १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या काळात पोषण आहाराची जबाबदारी शाळेतील स्वयंपाक्यावर लोटण्याचा प्रकार करण्यात आला आहे. याबाबत संचालकांनी परिपत्रक जारी केले आहे. जे स्वयंपाकी स्वत: धान्यादी माल खरेदी करून आणण्यास तयार असतील, त्यांचेच काम सुरू ठेवावे अन्यथा नव्या स्वयंपाक्यांना काम द्यावे, असे संकेत संचालकांनी दिले आहेत. नोव्हेंबर महिन्यातील उरलेला तांदूळ डिसेंबरमध्ये वापरण्याचे निर्देश आहेत. ज्या शाळांमध्ये असा तांदूळ उपलब्ध नसेल, त्यांनी इतर शाळेतून तांदूळ मिळविण्याचे परिपत्रकात म्हटले आहे. मात्र, अशा ऐनवेळी किती शाळांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात तांदूळ उरलेला असेल, हा प्रश्न आहे. शिवाय, तेल, चटणी, हळद व इतर धान्यादी माल स्वत: स्वयंपाकी मंडळीने विकत आणायचा आहे. हे तुघलकी फर्मान शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले आहे.केंद्राच्या समितीच्या धसक्याने लोटालोटीशालेय पोषण आहार योजनेची झाडाझडती घेण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाची सहा सदस्यीय समिती राज्यात येत आहे. ३ ते १० डिसेंबर या काळात समिती जिल्हानिहाय योजनेची अमलबजावणी तपासणार आहे. उरलेला तांदूळ वापरून, स्वत:च किराणा आणून स्वयंपाक्यांनीच शिजविलेला आहार या समितीला पाहता येणार आहे. त्यामुळे योजनेच्या अमलबजावणीत काही त्रृटी आढळलीच तर त्याचे खापर रोजमजुरी करणाऱ्या स्वयंपाक्यावर फोडणे संचालनालयाला, राज्याच्या शिक्षण सचिवालयाला सहज शक्य होणार आहे.

टॅग्स :Schoolशाळा