शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
5
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
6
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
7
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
8
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
9
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
10
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
14
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
15
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
16
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
17
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
18
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर

शाळेतील मुलांचे दप्तर पुढच्या वर्षी होणार आणखी हलके

By अविनाश साबापुरे | Updated: July 19, 2023 06:25 IST

केंद्र सरकारने २०२० मध्ये घोषित केलेल्या नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी आता हळूहळू सुरू होत आहे

अविनाश साबापुरे

यवतमाळ : विद्यार्थ्यांचे दप्तर हलके करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एकात्मिक पाठ्यपुस्तकांचा प्रयोग सुरू केला आहे. मात्र, पुढच्या वर्षी दप्तराचे ओझे आणखी कमी होणार असून, त्यासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात खास तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक धड्यानंतर शिक्षकांसाठी अध्यापनाच्या दृष्टीने दिल्या जाणाऱ्या सूचना पाठ्यपुस्तकातून वगळल्या जाणार आहेत. त्यामुळे पुस्तकाचा आकार जवळपास अर्धाच होणार आहे. 

केंद्र सरकारने २०२० मध्ये घोषित केलेल्या नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी आता हळूहळू सुरू होत आहे. धोरणानुसार देशभरात सारखीच शिक्षणपद्धती राबविण्यासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला आहे. ६२८ पानांच्या या आराखड्यात विद्यार्थी-शिक्षकांसाठी विशेष तरतुदी आहेत. 

‘अध्ययन, अध्यापन, अभ्यासक्रमाबाबतचा नवा दृष्टिकोन’ असे स्वतंत्र चॅप्टर देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, प्रत्येक वर्गाच्या प्रत्येक पुस्तकात धडा संपल्यानंतर एका पानावर शिक्षकांसाठी सूचना तसेच नोंदी दिलेल्या असतात. परंतु, या नोंदींमुळे पुस्तकाचा आकार अनावश्यकरीत्या वाढतो. या नोंदी वगळण्यात येऊन पुस्तकाचा आकार जवळपास अर्धा होण्याची शक्यता आहे.  

प्रत्येक पुस्तकाच्या दोन आवृत्त्या पुढच्या वर्षीपासून पाठ्यपुस्तके दोन स्वरूपांत छापली जातील. एक आवृत्ती विद्यार्थ्यांसाठी (टेक्स्ट बुक), दुसरी शिक्षकांसाठी (टेक्स्ट बुक प्लस) असेल. शिक्षक आवृत्तीमध्ये प्रत्येक धड्यानंतर सूचना, नोंदी, क्यूआर कोड असतील.   

डिजिटल वाचनावर भरसोशल मीडियातील मजकुराचे सुरक्षित आणि उपयुक्त वाचन कसे करावे, यासाठी अभ्यासक्रम आराखड्यात ‘बायलिट्रसी’ ही संकल्पना मांडण्यात आली आहे.  त्यासोबतच डिजिटल रायटिंग शिकविण्यासाठी विद्यार्थ्यांना ई-मेल, ब्लाॅग तसेच पोस्ट लिहिण्याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी शिक्षकांनी चांगले ब्लाॅग, ई-मेल, पोस्ट विद्यार्थ्यांना दाखवाव्यात, अशीही सूचना आराखड्यात आहे.

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण