शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सांगा मोदी साहेब, आम्ही जगायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 22:24 IST

शासकीय धोरणामुळे भुकेचा भीषण प्रश्न निर्माण झाला. मोदी साहेब, सांगा आता आम्ही जगायचे कसे, असा जीवन मरणाचा प्रश्न घेऊन जिल्ह्यातील पारधी समाज बांधवांनी मारेगाव तालुक्यातील गोंड बुरांडा ते पांढरकवडा अशी पदयात्रा काढली.

ठळक मुद्देपारधी समाज बांधवांचा सवाल : गोंडबुरांडा ते पांढरकवडा पदयात्रा

नरेश मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा (यवतमाळ) : शासकीय धोरणामुळे भुकेचा भीषण प्रश्न निर्माण झाला. मोदी साहेब, सांगा आता आम्ही जगायचे कसे, असा जीवन मरणाचा प्रश्न घेऊन जिल्ह्यातील पारधी समाज बांधवांनी मारेगाव तालुक्यातील गोंड बुरांडा ते पांढरकवडा अशी पदयात्रा काढली. पंतप्रधानांना भेटून आपल्या व्यथा त्यांच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न मात्र सफल झाला नाही.शनिवारी पांढरकवडा येथे महिला बचतगटांचा महामेळावा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी या मेळाव्यासाठी आले होते. या पार्श्वभूमीवर पारधी समाज संघटनेचे राज्याध्यक्ष मतिन भोसले यांच्या नेतृत्वात मारेगाव तालुक्यातील गोंड बुरांडा येथून शुक्रवारी पांढरकवडापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत जिल्ह्यातील चारशेवर समाजबांधव सहभागी झाले होते. शासनाने शिकारीवर बंदी आणल्याने पारधी समाज बांधवांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे शिकारीला परवानगी देण्यात यावी, शिकारी बंद झाल्याने शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून पोटाची भूक भागविण्याचा प्रयत्न केला. मात्र शासनाने त्या जमिनीही हिसकावून घेतल्या. आता आम्ही जगायचे कसे, असा या पारधी बांधवांचा सवाल आहे. शासनाने शिकारीची परवानगी द्यावी किंवा अतिक्रमणाची हिसकावून घेतलेली शेती परत करावी, अशी या समाजबांधवांची मागणी आहे.शनिवारी मेळावा सुरू होण्यापूर्वी मजल दरमजल करीत पदयात्रेद्वारे पारधी समाज बांधव कार्यक्रमस्थळी पोहोचले. मात्र पोलिसांनी सभास्थळी जाण्यास त्यांना मज्जाव केला. सभा होईस्तोवर हे समाजबांधव ताटकळत कार्यक्रमस्थळाच्या काही अंतरावर दूर उभे होते. आम्हाला मोदी साहेबांना भेटू द्या, अशी आर्जव ते पोलिसांना करीत होते. मात्र, शेवटपर्यंत त्यांना अडवून धरण्यात आले. मेळावा संपल्यानंतर मतिन भोसले व पारधी समाजबांधवांनी पालकमंत्री मदन येरावार यांची भेट घेऊन त्यांना आपली व्यथा सांगितली. ना. येरावार यांनी दोन दिवसानंतर यवतमाळला भेटून चर्चा करू, असे आश्वासन दिले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी