शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

सवनाच्या लक्ष्मीची रेशीम उद्योगात भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 23:36 IST

पारंपारिक शेतीला फाटा देत रणरागिणीने आधी गुलाब शेती फुलविली. आता विविध सकटांवर मात करीत त्यांनी चक्क रेशीम शेतीकडे आपला मोर्चा वळविला. पुरुष शेतकऱ्यांना लाजवेल, असे काम करून या महिला शेतकऱ्याने तालुक्यात आदर्श निर्माण केला.

ठळक मुद्देगुलाब शेती : संकटावर मात करीत कसली शेती, शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात आदर्श

संजय भगत ।लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : पारंपारिक शेतीला फाटा देत रणरागिणीने आधी गुलाब शेती फुलविली. आता विविध सकटांवर मात करीत त्यांनी चक्क रेशीम शेतीकडे आपला मोर्चा वळविला. पुरुष शेतकऱ्यांना लाजवेल, असे काम करून या महिला शेतकऱ्याने तालुक्यात आदर्श निर्माण केला.लक्ष्मीबाई बापूजी पारवेकर, असे या महिला शेतकऱ्याचे नाव आहे. तालुक्यातील सवना येथे त्यांची शेती आहे. गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात जाण्यासाठी धड रस्ता नाही. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शेतात जाताना सतत वन्यप्राण्यांची भीती असते. मात्र या संकटांना लक्ष्मीबाई डगमगल्या नाही. उलट त्यांनी संकटांचा सामना करीत पारंपारीत शेतीला फाटा दिला. पहिल्यांदा शेतात गुलाबाची लागवड केली. त्याला यश येताच केळीची बाग फुलविली. सोबतच ऊसाचे उत्पन्न घेण्यास सुरुवात केली.तालुक्यात गुलाबाची शेती करणाऱ्या महिला म्हणून त्या नावारुपास आल्या. अनेक कृषी प्रदर्शनात त्यांच्या शेतातील गुलाबाने सर्वांचे लक्ष वेधले. त्यांची मेहनत दिसून आली. परिणामी त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. राज्य शासनानेसुद्धा त्यांच्या परिश्रमाची दखल घेत सन्मानित केले. मात्र कोणत्याही सन्मानाने लक्ष्मीबाई हुरळून गेल्या नाही. उलट नव्या जोमाने त्यांनी शेतीत नवीन प्रयोग सुरू केले. नावीन्यपूर्ण प्रयोग त्यांनी थांबविले नाही. यातूनच आता त्यांनी रेशीम उद्योगाकडे आपला मोर्चा वळविला आहे. आता त्यांनी शेतात रेशीम लागवड करून त्यापासून उत्पन्न घेण्यास सुरूवात केली आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातीलच एका महिलेने शेतीत नवनवे प्रयोग करून आदर्श निर्माण केला आहे. जिल्ह्यातील नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांसाठी लक्ष्मीबाई प्रेरणदायी ठरल्या आहेत. आता त्या दर रविवारी इतर शेतकºयांच्या शेतात पोहोचून त्यांनाही मार्गदर्शन करीत आहे. यातून शेतकºयांना नवी उभारी मिळत आहे.शासन, प्रशासनाचा कोडगेपणा कायमचलक्ष्मीबाई पारवेकर यांचे शेत डोंगराळ भागात गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे. शेतात जायला धड रस्ता नाही. रस्त्यासाठी अनेकदा त्यांनी शासन, प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र शासन आणि प्रशासनाचा कोडगेपणा अद्याप कायम आहे. तरीही न डगमगता लक्ष्मीबाईने शेती कसली. जिद्दीने गुलाब फुलविला. आता रेशीम शेती सुरु केली. तालुक्यातील इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्या प्रेरणा देत आहे. समाजकारण आणि राजकारणातही त्यांचा वावर आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकºयांसाठी त्या प्रेरणादूत ठरल्या असताना शासन आणि प्रशासन मात्र शेतात जाण्यासाठी धड रस्ता तयार करून देण्यास तयार नाही. पालकमंत्री पांदण रस्त्याचे भयावह वास्तवही यातून अधोरेखीत होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती