शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

सवनाच्या लक्ष्मीची रेशीम उद्योगात भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 23:36 IST

पारंपारिक शेतीला फाटा देत रणरागिणीने आधी गुलाब शेती फुलविली. आता विविध सकटांवर मात करीत त्यांनी चक्क रेशीम शेतीकडे आपला मोर्चा वळविला. पुरुष शेतकऱ्यांना लाजवेल, असे काम करून या महिला शेतकऱ्याने तालुक्यात आदर्श निर्माण केला.

ठळक मुद्देगुलाब शेती : संकटावर मात करीत कसली शेती, शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात आदर्श

संजय भगत ।लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : पारंपारिक शेतीला फाटा देत रणरागिणीने आधी गुलाब शेती फुलविली. आता विविध सकटांवर मात करीत त्यांनी चक्क रेशीम शेतीकडे आपला मोर्चा वळविला. पुरुष शेतकऱ्यांना लाजवेल, असे काम करून या महिला शेतकऱ्याने तालुक्यात आदर्श निर्माण केला.लक्ष्मीबाई बापूजी पारवेकर, असे या महिला शेतकऱ्याचे नाव आहे. तालुक्यातील सवना येथे त्यांची शेती आहे. गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात जाण्यासाठी धड रस्ता नाही. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शेतात जाताना सतत वन्यप्राण्यांची भीती असते. मात्र या संकटांना लक्ष्मीबाई डगमगल्या नाही. उलट त्यांनी संकटांचा सामना करीत पारंपारीत शेतीला फाटा दिला. पहिल्यांदा शेतात गुलाबाची लागवड केली. त्याला यश येताच केळीची बाग फुलविली. सोबतच ऊसाचे उत्पन्न घेण्यास सुरुवात केली.तालुक्यात गुलाबाची शेती करणाऱ्या महिला म्हणून त्या नावारुपास आल्या. अनेक कृषी प्रदर्शनात त्यांच्या शेतातील गुलाबाने सर्वांचे लक्ष वेधले. त्यांची मेहनत दिसून आली. परिणामी त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. राज्य शासनानेसुद्धा त्यांच्या परिश्रमाची दखल घेत सन्मानित केले. मात्र कोणत्याही सन्मानाने लक्ष्मीबाई हुरळून गेल्या नाही. उलट नव्या जोमाने त्यांनी शेतीत नवीन प्रयोग सुरू केले. नावीन्यपूर्ण प्रयोग त्यांनी थांबविले नाही. यातूनच आता त्यांनी रेशीम उद्योगाकडे आपला मोर्चा वळविला आहे. आता त्यांनी शेतात रेशीम लागवड करून त्यापासून उत्पन्न घेण्यास सुरूवात केली आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातीलच एका महिलेने शेतीत नवनवे प्रयोग करून आदर्श निर्माण केला आहे. जिल्ह्यातील नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांसाठी लक्ष्मीबाई प्रेरणदायी ठरल्या आहेत. आता त्या दर रविवारी इतर शेतकºयांच्या शेतात पोहोचून त्यांनाही मार्गदर्शन करीत आहे. यातून शेतकºयांना नवी उभारी मिळत आहे.शासन, प्रशासनाचा कोडगेपणा कायमचलक्ष्मीबाई पारवेकर यांचे शेत डोंगराळ भागात गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे. शेतात जायला धड रस्ता नाही. रस्त्यासाठी अनेकदा त्यांनी शासन, प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र शासन आणि प्रशासनाचा कोडगेपणा अद्याप कायम आहे. तरीही न डगमगता लक्ष्मीबाईने शेती कसली. जिद्दीने गुलाब फुलविला. आता रेशीम शेती सुरु केली. तालुक्यातील इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्या प्रेरणा देत आहे. समाजकारण आणि राजकारणातही त्यांचा वावर आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकºयांसाठी त्या प्रेरणादूत ठरल्या असताना शासन आणि प्रशासन मात्र शेतात जाण्यासाठी धड रस्ता तयार करून देण्यास तयार नाही. पालकमंत्री पांदण रस्त्याचे भयावह वास्तवही यातून अधोरेखीत होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती