शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल स्वाक्षरीची मुदत संपल्याने सातबारा मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 18:34 IST

शासनाचा महसूल बुडाला : जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्क वणी : वणी उपविभागातील तलाठी साझांमध्ये डिजिटल स्वाक्षरीची मुदत संपल्याने शेतकऱ्यांना डिजिटल सातबाऱ्यासह इतरही दस्तऐवज मिळणे कठीण झाले आहे. याअभावी जमीन खरेदी-विक्रीचे कोट्यवधी रुपयांचे कामकाज थांबले आहे. उपविभागातील अनेकांची डिजिटल स्वाक्षरीची मुदत संपलेली आहे. काहींची मुदत येत्या दोन ते तीन दिवसांत संपण्याच्या मार्गावर असल्याने या समस्येत आणखीनच भर पडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दोन ते तीन आठवड्यांपासून या समस्येचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

कोणत्याही प्रकारचे कर्ज काढण्यासाठी शेतकरी किंवा जमीनधारकांना सातबारा सादर करणे बंधनकारक आहे. सातबाऱ्याला ऑनलाइनची जोड देण्यात आली असून, तलाठी, आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू केंद्रातून डिजिटल संगणकीकृत सातबारा दिला जातो. मात्र, वणी तालुक्यातील तलाठ्यांच्या डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट (डीएससी) ची कंत्राटाची मुदत संपल्याने डिजिटल सात-बारा मिळणे आता कठीण झाले आहे. शेतजमीन खरेदी-विक्री, बँक कर्ज, कार्यालयीन कामकाज आदी महत्त्वपूर्ण बाबींसाठी अत्यंत मौलिक असलेले सात-बारा, आठ-अ, फेरफार या दस्तऐवजांसाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालय किंवा सेतू केंद्राचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. तलाठी कार्यालयातूनही शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असून, शेतकरी व खरेदीदार यांना सातबारापासून वंचित राहावे लागत आहे. एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी तलाठ्यांना हस्तलिखित सातबारा देण्यास बंदी घातलेली आहे, तर दुसरीकडे तलाठ्यांच्या डीएससीची मुदत संपल्याने सातबारा मिळत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांपुढे पेच निर्माण झाला आहेत. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. 

दोन आठवड्यांचा कालावधी लोटलावणी तालुक्यासह संपूर्ण परीसरात खरेदी-विक्रीची कामे मंदावली आहेत. असंख्य गावांमध्ये डिजिटल सात-बारा मिळणे तूर्त बंद झाले. दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीपासून ही समस्या तलाठी सजांमध्ये आणि त्याअंतर्गत गावांमध्ये भेडसावत आहे. या स्थितीला निवडणुकीचाही हातभार लागला आहे. तालुक्यात जमीन खरेदी-विक्रीची संख्या खूप मोठी आहे. ती ठप्प झाल्याने सरकारला मोठ्या महसुलालाही मुकावे लागणार आहे.

"वणी तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांची डीएससीची मुदत संपल्याची मला कल्पना नाही. या प्रकाराची कोणती तक्रार ही नाही. माहिती घेऊन काय अडचणी आहेत. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे." - निखिल धुळधर, तहसीलदार, वणी.

टॅग्स :YavatmalयवतमाळAgriculture Sectorशेती क्षेत्र