शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

डिजिटल स्वाक्षरीची मुदत संपल्याने सातबारा मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 18:34 IST

शासनाचा महसूल बुडाला : जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्क वणी : वणी उपविभागातील तलाठी साझांमध्ये डिजिटल स्वाक्षरीची मुदत संपल्याने शेतकऱ्यांना डिजिटल सातबाऱ्यासह इतरही दस्तऐवज मिळणे कठीण झाले आहे. याअभावी जमीन खरेदी-विक्रीचे कोट्यवधी रुपयांचे कामकाज थांबले आहे. उपविभागातील अनेकांची डिजिटल स्वाक्षरीची मुदत संपलेली आहे. काहींची मुदत येत्या दोन ते तीन दिवसांत संपण्याच्या मार्गावर असल्याने या समस्येत आणखीनच भर पडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दोन ते तीन आठवड्यांपासून या समस्येचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

कोणत्याही प्रकारचे कर्ज काढण्यासाठी शेतकरी किंवा जमीनधारकांना सातबारा सादर करणे बंधनकारक आहे. सातबाऱ्याला ऑनलाइनची जोड देण्यात आली असून, तलाठी, आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू केंद्रातून डिजिटल संगणकीकृत सातबारा दिला जातो. मात्र, वणी तालुक्यातील तलाठ्यांच्या डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट (डीएससी) ची कंत्राटाची मुदत संपल्याने डिजिटल सात-बारा मिळणे आता कठीण झाले आहे. शेतजमीन खरेदी-विक्री, बँक कर्ज, कार्यालयीन कामकाज आदी महत्त्वपूर्ण बाबींसाठी अत्यंत मौलिक असलेले सात-बारा, आठ-अ, फेरफार या दस्तऐवजांसाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालय किंवा सेतू केंद्राचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. तलाठी कार्यालयातूनही शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असून, शेतकरी व खरेदीदार यांना सातबारापासून वंचित राहावे लागत आहे. एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी तलाठ्यांना हस्तलिखित सातबारा देण्यास बंदी घातलेली आहे, तर दुसरीकडे तलाठ्यांच्या डीएससीची मुदत संपल्याने सातबारा मिळत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांपुढे पेच निर्माण झाला आहेत. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. 

दोन आठवड्यांचा कालावधी लोटलावणी तालुक्यासह संपूर्ण परीसरात खरेदी-विक्रीची कामे मंदावली आहेत. असंख्य गावांमध्ये डिजिटल सात-बारा मिळणे तूर्त बंद झाले. दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीपासून ही समस्या तलाठी सजांमध्ये आणि त्याअंतर्गत गावांमध्ये भेडसावत आहे. या स्थितीला निवडणुकीचाही हातभार लागला आहे. तालुक्यात जमीन खरेदी-विक्रीची संख्या खूप मोठी आहे. ती ठप्प झाल्याने सरकारला मोठ्या महसुलालाही मुकावे लागणार आहे.

"वणी तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांची डीएससीची मुदत संपल्याची मला कल्पना नाही. या प्रकाराची कोणती तक्रार ही नाही. माहिती घेऊन काय अडचणी आहेत. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे." - निखिल धुळधर, तहसीलदार, वणी.

टॅग्स :YavatmalयवतमाळAgriculture Sectorशेती क्षेत्र