शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

राष्ट्रसंतांच्या सान्निध्यात वसतेय ‘सांझग्राम’; निराधारांसाठी सहा एकरांत स्वतंत्र गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 07:00 IST

Yawatmal News अत्याचारग्रस्त मुलींना अनेक कुटुंबेही स्वीकारत नाहीत. मात्र, त्यांच्यासाठी एका युवकाने चक्क सहा एकरांत स्वतंत्र गावच वसविण्याचा वसा घेतला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज मोझरीनजीक हे गाव वसत आहे.

ठळक मुद्देअत्याचारग्रस्त मुली, महिला, दिव्यांग, वृद्धांसाठी माहेर

अविनाश साबापुरे

यवतमाळ : जग कितीही पुढारले, तरी आजही महिला-मुलींवर घाणेरडे अत्याचार सुरूच आहेत. अशा अत्याचारग्रस्त मुलींना अनेक कुटुंबेही स्वीकारत नाहीत. मात्र, त्यांच्यासाठी एका युवकाने चक्क सहा एकरांत स्वतंत्र गावच वसविण्याचा वसा घेतला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज मोझरीनजीक हे गाव वसत आहे.

अत्याचारग्रस्त महिला, मुली, दिव्यांग, वृद्ध अशा सर्वच निराधार व्यक्तींना आधार देणाऱ्या या गावाचे नावही ‘सांझग्राम’ असे अर्थपूर्ण आहे. गावाची पायाभरणी आता २०२१ मध्ये झाली असली, तरी या सेवेच्या व्रताची सुरुवात मात्र २००८ मध्येच अकोला जिल्ह्यातून अमोल मानकर या तरुणाच्या मनात झाली.

झाले असे की, २००८ मध्ये अकोला जिल्ह्यातील एका गावात जात पंचायतीने एका मुलीवर अनन्वित अत्याचार केले. त्यानंतर या मुलीने महिनाभर स्वत:ला घरात कोंडून घेतले. अमोल मानकर यांनी तिला स्वत:च्या घरात आश्रय दिला. त्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागातील अत्याचारग्रस्त महिला व मुलींनी आधारासाठी अमोल मानकर यांच्याशी संपर्क केला. त्यातूनच मानकर यांनी समविचारी तरुणांची फळी उभी करून ‘समर्पण’ ही संस्था स्थापन केली. त्या माध्यमातून महाराष्ट्रात विविध १२ ठिकाणी भाडेतत्त्वावर होस्टेल सुरू करून त्यात अत्याचारग्रस्त महिला-मुलींना निवारा दिला.

गेल्या १२ वर्षांत ‘समर्पण’च्या माध्यमातून चार हजार ९०० महिलांना समुपदेशन, तसेच न्यायालयाच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला गेला. तर, ९७० महिलांना होस्टेलमध्ये निवारा दिला गेला. २८ अत्याचारग्रस्त मुलींचा सन्मानपूर्वक विवाह लावून दिला गेला.

मात्र, समर्पणच्या होस्टेलमध्ये काही दिवसच या महिलांना ठेवता येते. त्यांना त्यांचे कुटुंब परत मिळावे, समाजात सन्मानाने जगता यावे याकरिता सांझग्रामची संकल्पना पुढे आली. त्यासाठी समर्पणने लोकसहभागातून गुरुकुंज मोझरीजवळ सहा एकर जागा मिळविली. त्यावर गावाची रचना केली जात आहे. त्यात निराधार महिलांसह निराधार वृद्ध, दिव्यांग आदींचीही सोय होणार आहे.

१८ वर्षांवरील ‘कबिरां’नाही सांभाळणार

अनाथाश्रम आणि बालसुधारगृहांमधील बालकांचे वय १८ वर्षांचे झाल्यावर त्यांना तेथे ठेवता येत नाही. यातील बहुतांश मुले वाममार्गाला लागण्याची शक्यता असते. अशा मुलांसाठीच अमोल मानकर यांनी ‘कबीर’ ही संज्ञा पुढे आणली आहे. अशा निराधार कबिरांना रोजगार मिळावा, ओळख मिळावी आणि राहण्यासाठी हक्काचे घरही मिळावे म्हणून सांझग्राममध्ये त्यांना ठेवले जाणार आहे.

आप्त, नातेवाईकांनी झिडकारलेल्या महिलांना माहेरपण देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यांना सक्षम करून परत समाजात पाठवितो. मात्र, समाजात पाठविताना उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे या महिलांना पुन्हा गुलामीचे जीवन जगावे लागते. त्यामुळे ‘सांझग्राम’मध्ये कायमस्वरूपी निवारा आणि प्रत्येकाला कामही दिले जाणार आहे.

- अमोल मानकर

संचालक, समर्पण

टॅग्स :Socialसामाजिक