शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

एकाच दिवशी २७२८ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 23:19 IST

संपूर्ण जिल्ह्यात साथरोगाने थैमान घातले आहे. यामुळे रूग्णाची संख्या दररोज वाढत आहे. यामध्ये सर्वाधिक रूग्ण शहरासह मागासवस्त्या आणि जिल्ह्यातील विविध गावांमधील आहेत. यामुळे ओपीडी हाऊसफुल्ल झाली आहे. तेथे एकाच दिवशी उपचारासाठी आलेल्या तब्बल दोन हजार ७२८ रुग्णांची नोंद करण्यात आली.

ठळक मुद्देशासकीय वैद्यकीय महाविद्यालय : उपचारासाठी ‘ओपीडी’ फुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण जिल्ह्यात साथरोगाने थैमान घातले आहे. यामुळे रूग्णाची संख्या दररोज वाढत आहे. यामध्ये सर्वाधिक रूग्ण शहरासह मागासवस्त्या आणि जिल्ह्यातील विविध गावांमधील आहेत. यामुळे ओपीडी हाऊसफुल्ल झाली आहे. तेथे एकाच दिवशी उपचारासाठी आलेल्या तब्बल दोन हजार ७२८ रुग्णांची नोंद करण्यात आली. उपचारासाठी रांगाच्या रांगा लागल्या. ही आजवरच्या इतिहासातील या महाविद्यालयातील उच्चांकी नोंद मानली जाते.कॉलरा, स्क्रब टायफस आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरीभागातील मागास वस्त्या आणि विलिन झालेल्या वस्त्यांमधून मोठ्या संख्येने रुग्ण वैद्यकीय महाविद्यालयात येत आहे. शहरालगतच्या आठ ग्रामपंचायती यवतमाळ नगरपरिषदेत समाविष्ठ झाल्या असल्या तरी त्यांची आरोग्य व्यवस्था मात्र ग्रामीण भागातच ठेवण्यात आली आहे. हे प्राथमिक आरोग्य केंद्र शहरापासून १५ ते २० किमी अंतरावर आहे. या ठिकाणी पुरेशा सेवा नाहीत. यामुळे सर्व रुग्ण थेट वैद्यकीय महाविद्यालयात धडक देतात. त्यातूनच तेथे दरदिवशी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचा आकडा प्रचंड वाढतो. त्यामुळे एका बेडवर तीन रुग्णांना ठेवावे लागत आहे. काहींना वेळप्रसंगी जमिनीवरही उपचार करावे लागत आहे. रुग्णांच्या या गर्दीचा ताण वैद्यकीय महाविद्यालयाच्या आधीच तुटपुंजा असलेल्या यंत्रणेवर पडतो. डेंग्यू सदृश आजाराने अनेक रुग्ण भरती होत आहेत. त्यातील ६५ रुग्ण डेंग्यू पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. डेंग्यूच्या या वाढत्या रुग्ण संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पहायला मिळत आहे. महाविद्यालयात स्वच्छता व व्यवस्था ठिकठाक असली तरी दुपारी १२ नंतर औषधी वितरण बंद होत असल्याने अनेक रुग्णांना औषधांच्या चिठ्ठ्या घेऊन खासगी मेडिकलमध्ये जावे लागते व त्यासाठी आधी पैशाची तडजोड करावी लागते, अशी ओरड काही रुग्णांमधून ऐकायला मिळाली.ही आहेत डेंग्यूच्या डासांची पैदास केंद्रेसाठलेल्या स्वच्छ अथवा गढूळ पाण्यात डेंग्यूचे डास निर्माण होतात. ते टाळण्यासाठी साठवलेले पाणी १४ दिवसांच्या आत फेकणे गरजेचे आहे. तरच या डासांची उत्पत्ती थांबविली जाऊ शकते. कचरा कुंडी, कुलर, एसी, फ्रीजच्या मागील भागात साचलेल्या पाण्यात प्रकर्षाने या डासांची उत्पत्ती होते. त्याकरिता किमान एकदा तरी ‘कोरडा दिवस’ पाळणे गरजेचे आहे.अशी आहेत लक्षणेताप येणे, तापामध्ये चढउतार होणे, डोके दुखणे, जॉर्इंटमध्ये(सांधे) दुखणे, चक्कर येणे ही डेंग्यूची लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसताच रुग्णांनी तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.वैद्यकीय महाविद्यालयात येणाºया रुग्णांचा आकडा वाढत आहे. या ठिकाणच्या सुविधा आणि स्वच्छता यामुळे रुग्णांची पहिली पसंती या दवाखान्याला मिळाली आहे. यंत्रणा साथरोगाला नियंत्रित करण्यात झटत आहे.- डॉ. मनीष श्रीगिरीवारअधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ.

टॅग्स :Yawatmal Medical Collegeयवतमाळ मेडिकल कॉलेजHealthआरोग्य