शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

एकाच दिवशी २७२८ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 23:19 IST

संपूर्ण जिल्ह्यात साथरोगाने थैमान घातले आहे. यामुळे रूग्णाची संख्या दररोज वाढत आहे. यामध्ये सर्वाधिक रूग्ण शहरासह मागासवस्त्या आणि जिल्ह्यातील विविध गावांमधील आहेत. यामुळे ओपीडी हाऊसफुल्ल झाली आहे. तेथे एकाच दिवशी उपचारासाठी आलेल्या तब्बल दोन हजार ७२८ रुग्णांची नोंद करण्यात आली.

ठळक मुद्देशासकीय वैद्यकीय महाविद्यालय : उपचारासाठी ‘ओपीडी’ फुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण जिल्ह्यात साथरोगाने थैमान घातले आहे. यामुळे रूग्णाची संख्या दररोज वाढत आहे. यामध्ये सर्वाधिक रूग्ण शहरासह मागासवस्त्या आणि जिल्ह्यातील विविध गावांमधील आहेत. यामुळे ओपीडी हाऊसफुल्ल झाली आहे. तेथे एकाच दिवशी उपचारासाठी आलेल्या तब्बल दोन हजार ७२८ रुग्णांची नोंद करण्यात आली. उपचारासाठी रांगाच्या रांगा लागल्या. ही आजवरच्या इतिहासातील या महाविद्यालयातील उच्चांकी नोंद मानली जाते.कॉलरा, स्क्रब टायफस आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरीभागातील मागास वस्त्या आणि विलिन झालेल्या वस्त्यांमधून मोठ्या संख्येने रुग्ण वैद्यकीय महाविद्यालयात येत आहे. शहरालगतच्या आठ ग्रामपंचायती यवतमाळ नगरपरिषदेत समाविष्ठ झाल्या असल्या तरी त्यांची आरोग्य व्यवस्था मात्र ग्रामीण भागातच ठेवण्यात आली आहे. हे प्राथमिक आरोग्य केंद्र शहरापासून १५ ते २० किमी अंतरावर आहे. या ठिकाणी पुरेशा सेवा नाहीत. यामुळे सर्व रुग्ण थेट वैद्यकीय महाविद्यालयात धडक देतात. त्यातूनच तेथे दरदिवशी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचा आकडा प्रचंड वाढतो. त्यामुळे एका बेडवर तीन रुग्णांना ठेवावे लागत आहे. काहींना वेळप्रसंगी जमिनीवरही उपचार करावे लागत आहे. रुग्णांच्या या गर्दीचा ताण वैद्यकीय महाविद्यालयाच्या आधीच तुटपुंजा असलेल्या यंत्रणेवर पडतो. डेंग्यू सदृश आजाराने अनेक रुग्ण भरती होत आहेत. त्यातील ६५ रुग्ण डेंग्यू पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. डेंग्यूच्या या वाढत्या रुग्ण संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पहायला मिळत आहे. महाविद्यालयात स्वच्छता व व्यवस्था ठिकठाक असली तरी दुपारी १२ नंतर औषधी वितरण बंद होत असल्याने अनेक रुग्णांना औषधांच्या चिठ्ठ्या घेऊन खासगी मेडिकलमध्ये जावे लागते व त्यासाठी आधी पैशाची तडजोड करावी लागते, अशी ओरड काही रुग्णांमधून ऐकायला मिळाली.ही आहेत डेंग्यूच्या डासांची पैदास केंद्रेसाठलेल्या स्वच्छ अथवा गढूळ पाण्यात डेंग्यूचे डास निर्माण होतात. ते टाळण्यासाठी साठवलेले पाणी १४ दिवसांच्या आत फेकणे गरजेचे आहे. तरच या डासांची उत्पत्ती थांबविली जाऊ शकते. कचरा कुंडी, कुलर, एसी, फ्रीजच्या मागील भागात साचलेल्या पाण्यात प्रकर्षाने या डासांची उत्पत्ती होते. त्याकरिता किमान एकदा तरी ‘कोरडा दिवस’ पाळणे गरजेचे आहे.अशी आहेत लक्षणेताप येणे, तापामध्ये चढउतार होणे, डोके दुखणे, जॉर्इंटमध्ये(सांधे) दुखणे, चक्कर येणे ही डेंग्यूची लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसताच रुग्णांनी तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.वैद्यकीय महाविद्यालयात येणाºया रुग्णांचा आकडा वाढत आहे. या ठिकाणच्या सुविधा आणि स्वच्छता यामुळे रुग्णांची पहिली पसंती या दवाखान्याला मिळाली आहे. यंत्रणा साथरोगाला नियंत्रित करण्यात झटत आहे.- डॉ. मनीष श्रीगिरीवारअधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ.

टॅग्स :Yawatmal Medical Collegeयवतमाळ मेडिकल कॉलेजHealthआरोग्य