शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

राळेगावातील ग्रामीण रस्ते बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 05:00 IST

खैरी ते करणवाडी हा मार्ग गड्ड्यांचा मार्ग म्हणून ओळखला जावू लागला आहे. खैरी फाटा ते आष्टोना, मंगी, दहेगाव मार्ग ग्रामस्थांची परीक्षा घेणारा ठरत आहे. येवती-चहांद-खडकी रस्ता बांधून फार वर्षे झालेली नाहीत. तरी स्थिती वाईट झाली आहे. किन्ही फाटा ते चाचोरा रस्ता झाडगाव-झरगड रस्त्यांना आता नवनिर्माणाची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देस्थिती शोचनीय : चिखल, खड्ड्यातील मार्गापासून मुक्ती कधी? गुजरी, परसोडा, रानवड, रावेरी, खैरी रस्त्यांची

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची अनेक ठिकाणी वाट लागली आहे. चिखल आणि खड्ड्यातून जवळपासच्या गावात ये-जा करण्यात ग्रामस्थांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. बिघडलेले रस्ते कधी दुरुस्त होतील, याबाबत ग्रामस्थ लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांना वारंवार विचारणा करीत आहे.काही ठिकाणी रस्त्यांची कामे मंजूर झाली. त्यातील काही कामे सुरू झाली. अनेक अद्यापही अपूर्ण आहेत. अनेक कामे सुरूच झालेली नाही. जिल्हा परिषद सदस्य मंजूर झालेल्या कामाबद्दल माहिती देत असताना बांधकाम अभियंते त्यास दुजोरा देत नाही. कृषी हंगाम सुरू झाला आहे. पुढे सर्वच महत्त्वाचे सण समोर आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी आता बिघडलेले रस्ते सुयोग्य करण्यास वेगवान हालचाल करणे अपेक्षित आहे.राळेगाव, गुजरी, नागठाणा, परसोडा रस्त्याचे हाल अत्यंत वाईट आहे. गुजरी-परसोडा रस्ता मंजूर असूनही कामास सुरुवात झालेली नाही. राळेगाव-गुजरी रस्त्याचे खड्डे ग्रामस्थांनी श्रमदानाने मागच्या महिन्यात भरून रस्ता थोडाफार वाहतुकीयोग्य केला. रानवड ते पिंपळगाव रस्ता दोन महिन्यांपासून जैसे थेच आहे. राळेगाव-मोहदा मार्गावरील रावेरी-पिंपळखुटी-वरूड-मोहदा रस्त्याची स्थिती आणखी शोचनीय झाली आहे.खैरी ते करणवाडी हा मार्ग गड्ड्यांचा मार्ग म्हणून ओळखला जावू लागला आहे. खैरी फाटा ते आष्टोना, मंगी, दहेगाव मार्ग ग्रामस्थांची परीक्षा घेणारा ठरत आहे. येवती-चहांद-खडकी रस्ता बांधून फार वर्षे झालेली नाहीत. तरी स्थिती वाईट झाली आहे. किन्ही फाटा ते चाचोरा रस्ता झाडगाव-झरगड रस्त्यांना आता नवनिर्माणाची प्रतीक्षा आहे. धानोरा ते रोहिणी रस्ता दुरुस्तीची मागणी करून ग्रामस्थ थकले आहे. उंदरी ते आदिवासी समाजाची पंढरी असलेल्या जागजई रस्त्याची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. अनेकदा अधिकारी व लोकप्रतिनिधींना निवेदने देण्यात आली, पण दुर्लक्ष केले जात आहे. या प्रश्नाकडे गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिकाराष्ट्रीय महामार्ग असलेला वडकी-करंजी चारपदरी मार्ग दोन वर्षांच्या आतच खड्डेमय झाल्याने दररोज लहान-मोठे अपघात होवू लागले आहे. देखभाल दुरुस्तीच्या काळात खालावलेले रस्ते ठेकेदाराकडून पुन्हा दुरुस्त करून घेण्यास विभागांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

टॅग्स :Socialसामाजिक