शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सत्ताधारी- विरोधकांची जिल्हा परिषदेत ‘छुपी’ युती

By admin | Updated: April 28, 2017 02:28 IST

जिल्हा परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा होताच सत्ताधारी व विरोधकांची छुपी युती झाल्याचे स्पष्ट होत आहे.

८ मे रोजी पुन्हा सभा : समिती गठनासाठी चढाओढ रवींद्र चांदेकर  यवतमाळ जिल्हा परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा होताच सत्ताधारी व विरोधकांची छुपी युती झाल्याचे स्पष्ट होत आहे. पहिल्या सभेत आक्रमक भूमिका घेणाऱ्या विरोधकांनी विषय समिती गठनासाठी दुसऱ्या विशेष सभेची तारीख बदलवून घेण्यात यश मिळविले. यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांपुढे सपशेल नांगी टाकल्याचे आणि विरोधकांनी सत्ताधाऱ्यांशी छुपी युती केल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्हा परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडली. या सभेत पदाधिकाऱ्यांना स्वकीयांसह आक्रमक विरोधकांचा सामना करावा लागला. विषय समिती गठनावरून विरोधकांनी सभेत प्रश्नांचा भडीमार केला. त्यावेळी समिती गठनासाठी ४ मे रोजी विशेष सभा घेणार असल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले. नंतर पाणी टंचाईवरून घमासान झाले. मात्र सभा संपताच विरोधक नरमल्याचे स्पष्ट झाले. अध्यक्षांनी समिती गठनासाठी ४ मे रोजीची तारीख दिली होती, मात्र तत्पूर्वी विरोधकांची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक असल्याने ४ ऐवजी ८ मे रोजी पुढील सभा घेण्याची मागणी त्यांनी केली. विरोधकांची ही मागणी सत्ताधाऱ्यांनी निमूपटणे मान्य करीत आता प्रशासनाला ८ मे रोजी विशेष सभा बोलविण्याचे निर्देश दिले. यावरून विरोधकांसमोर सत्ताधाऱ्यांनी नांगी टाकल्याचे, तर विरोधकांनीही पहिल्या सभेतील आक्रमकता बाजूला सारून सभा संपताच सत्ताधाऱ्यांशी जमवून घेण्याचे धोरण अवलंबल्याचे स्पष्ट झाले. सत्ताधारी व विरोधकांची ही छुपी युती असल्याची चर्चा सुरू आहे. सभागृहात एकमेकांविरूद्ध आरोप-प्रत्यारोप करायचे व पडद्यामागे सर्वांनी मिळूनमिसळून कारभार हाकायचा, असा हा फंडा असल्याची चर्चा आहे. यात जिल्ह्यातील जनतेचे चांगलेच मनोरंजन होणार असल्याचे संकेत आहेत. स्थायी, बांधकामसाठी चुरस ८ मे रोजी विषय समितींचे गठन केले जाणार आहे. यात स्थायी आणि बांधकाम समितीसाठी सदस्यांमध्ये सर्वाधिक चुरस आहे. पहिल्या सभेत या समितींचे ध्येय समोर ठेवूनच काही सदस्यांनी बॅटींग केल्याचे बोलले जाते. त्यापैकी काहींना कोणत्याही स्थितीत स्थायीचे सदस्यत्व मिळणार नसल्याची माहिती आहे. विशेषत: आपल्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर पहिल्या सभेत चौफेर हल्ला करणाऱ्या काँग्रेस सदस्यांना स्थायी समिती मिळणे कठीण असल्याचे सांगितले जाते. समितीत प्रत्येक पक्षाचे दोन सदस्य स्थायी, कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, शिक्षण, बांधकाम, महिला व बालकल्याण, अर्थ, समाजकल्याण आदी समितींचे पुढील विशेष सभेत गठन केले जाईल. प्रत्येक समितीत किमान आठ सदस्य राहतील. यात प्रत्येक समितीवर काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन सदस्य राहण्याची शक्यता आहे. काही समितींवर पदाधिकारी असलेल्या अपक्षालाही संधी मिळेल. समिती गठन प्रक्रियेत सत्ताधाऱ्यांसह विरोधकही एकमेकांसोबत ‘जमवून’ घेण्याची शक्यता आहे.