शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
3
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
4
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
5
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
6
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
7
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
8
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
9
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
10
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
11
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
12
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
13
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
14
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
15
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
16
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
17
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
18
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
19
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
20
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय

सत्ताधारी- विरोधकांची जिल्हा परिषदेत ‘छुपी’ युती

By admin | Updated: April 28, 2017 02:28 IST

जिल्हा परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा होताच सत्ताधारी व विरोधकांची छुपी युती झाल्याचे स्पष्ट होत आहे.

८ मे रोजी पुन्हा सभा : समिती गठनासाठी चढाओढ रवींद्र चांदेकर  यवतमाळ जिल्हा परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा होताच सत्ताधारी व विरोधकांची छुपी युती झाल्याचे स्पष्ट होत आहे. पहिल्या सभेत आक्रमक भूमिका घेणाऱ्या विरोधकांनी विषय समिती गठनासाठी दुसऱ्या विशेष सभेची तारीख बदलवून घेण्यात यश मिळविले. यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांपुढे सपशेल नांगी टाकल्याचे आणि विरोधकांनी सत्ताधाऱ्यांशी छुपी युती केल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्हा परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडली. या सभेत पदाधिकाऱ्यांना स्वकीयांसह आक्रमक विरोधकांचा सामना करावा लागला. विषय समिती गठनावरून विरोधकांनी सभेत प्रश्नांचा भडीमार केला. त्यावेळी समिती गठनासाठी ४ मे रोजी विशेष सभा घेणार असल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले. नंतर पाणी टंचाईवरून घमासान झाले. मात्र सभा संपताच विरोधक नरमल्याचे स्पष्ट झाले. अध्यक्षांनी समिती गठनासाठी ४ मे रोजीची तारीख दिली होती, मात्र तत्पूर्वी विरोधकांची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक असल्याने ४ ऐवजी ८ मे रोजी पुढील सभा घेण्याची मागणी त्यांनी केली. विरोधकांची ही मागणी सत्ताधाऱ्यांनी निमूपटणे मान्य करीत आता प्रशासनाला ८ मे रोजी विशेष सभा बोलविण्याचे निर्देश दिले. यावरून विरोधकांसमोर सत्ताधाऱ्यांनी नांगी टाकल्याचे, तर विरोधकांनीही पहिल्या सभेतील आक्रमकता बाजूला सारून सभा संपताच सत्ताधाऱ्यांशी जमवून घेण्याचे धोरण अवलंबल्याचे स्पष्ट झाले. सत्ताधारी व विरोधकांची ही छुपी युती असल्याची चर्चा सुरू आहे. सभागृहात एकमेकांविरूद्ध आरोप-प्रत्यारोप करायचे व पडद्यामागे सर्वांनी मिळूनमिसळून कारभार हाकायचा, असा हा फंडा असल्याची चर्चा आहे. यात जिल्ह्यातील जनतेचे चांगलेच मनोरंजन होणार असल्याचे संकेत आहेत. स्थायी, बांधकामसाठी चुरस ८ मे रोजी विषय समितींचे गठन केले जाणार आहे. यात स्थायी आणि बांधकाम समितीसाठी सदस्यांमध्ये सर्वाधिक चुरस आहे. पहिल्या सभेत या समितींचे ध्येय समोर ठेवूनच काही सदस्यांनी बॅटींग केल्याचे बोलले जाते. त्यापैकी काहींना कोणत्याही स्थितीत स्थायीचे सदस्यत्व मिळणार नसल्याची माहिती आहे. विशेषत: आपल्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर पहिल्या सभेत चौफेर हल्ला करणाऱ्या काँग्रेस सदस्यांना स्थायी समिती मिळणे कठीण असल्याचे सांगितले जाते. समितीत प्रत्येक पक्षाचे दोन सदस्य स्थायी, कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, शिक्षण, बांधकाम, महिला व बालकल्याण, अर्थ, समाजकल्याण आदी समितींचे पुढील विशेष सभेत गठन केले जाईल. प्रत्येक समितीत किमान आठ सदस्य राहतील. यात प्रत्येक समितीवर काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन सदस्य राहण्याची शक्यता आहे. काही समितींवर पदाधिकारी असलेल्या अपक्षालाही संधी मिळेल. समिती गठन प्रक्रियेत सत्ताधाऱ्यांसह विरोधकही एकमेकांसोबत ‘जमवून’ घेण्याची शक्यता आहे.