शहरं
Join us  
Trending Stories
1
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
2
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
3
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
4
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
5
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
6
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
7
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
8
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
9
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
10
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
11
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
12
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
13
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
14
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
15
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
16
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
17
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
18
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
19
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
20
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना

दीड हजार विद्यार्थ्यांचे ‘आरटीई’ प्रवेश थेट शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 05:00 IST

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी राखीव ठेवल्या जातात. समग्र शिक्षाच्या जिल्हा कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार, यंदा जिल्ह्यातील २०० शाळा आरटीईच्या या प्रवेशप्रक्रियेत नोंदणीकृत झाल्या आहेत. या २०० शाळांमधील १६४७ जागा गरीब विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देकागदपत्र पडताळणीला फाटा : कोरोनामुळे थांबलेली प्रक्रिया पुन्हा झाली सुरू, जिल्ह्यातील २०० शाळा सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची मोफत प्रवेश प्रक्रिया यंदा कोरोनामुळे अर्धवट राहिली होती. आता शैक्षणिक सत्राची घोषणा झाली असून आरटीई प्रवेश प्रक्रियाही पुढे सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात विद्यार्थ्यांच्या कागदपत्र पडताळणीला फाटा देत जिल्ह्यातील दीड हजार विद्यार्थ्यांचे थेट शाळेतच प्रवेश होणार आहेत.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी राखीव ठेवल्या जातात. समग्र शिक्षाच्या जिल्हा कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार, यंदा जिल्ह्यातील २०० शाळा आरटीईच्या या प्रवेशप्रक्रियेत नोंदणीकृत झाल्या आहेत. या २०० शाळांमधील १६४७ जागा गरीब विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या जागांवर प्रवेश देण्यासाठी १७ मार्च रोजीच लॉटरी काढण्यात आली. त्याद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एसएमएस पाठविण्यात आले आहे. मात्र लॉकडाऊनमुळे प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया थांबली होती.कारण प्रवेशापूर्वी पंचायत समिती स्तरावर पडताळणी समितीकडे जाऊन विद्यार्थी व पालकांना आपल्या कागदपत्रांची पडताळणी करून घेणे आवश्यक होते. आता शिक्षण संचालकांनी बुधवारी दिलेल्या सुधारित आदेशानुसार कागदपत्र पडताळणीचा हा टप्पा वगळण्यात आला आहे. त्याऐवजी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना थेट शाळेत पोहोचून तेथेच आपली कागदपत्रे दाखवावी लागणार आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारे आरटीईतून प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेतर्फे सुरू असलेल्या आॅनलाईन शिक्षणातही सहभागी करून घेण्याचे आदेश आहे. मात्र संबंधित विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना प्रवेश प्रक्रियेसाठी शाळेत कधी बोलवावे याची तारीख ठरविण्याचे अधिकार संंबंधित शाळांना दिले गेले आहे.कागदपत्रात गडबड आढळली तर पालकांवर होणार फौजदारी कारवाईतूर्त कोरोनामुळे कागदपत्र पडताळणी न करता थेट शाळेत विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया होणार आहे. मात्र त्यानंतर शाळेला पडताळणी समितीकडून या कागदपत्रांची पडताळणी करून घेतल्यावर प्रवेश निश्चिती होणार आहे. अशा वेळी पडताळणीत कागदपत्रे चुकीची आढळल्यास, पालकाने पोर्टलवर चुकीची माहिती भरल्याचे निदर्शनास आल्यास अशा पालकांवर फौजदारी कारवाई करणे, विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द करणे, त्या पालकाकडून पूर्ण फी घेणे अशा प्रकारची कारवाई करण्याचे अधिकार पडताळणी समितीला राहणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षण