शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

राष्ट्रीयीकृत बँकांचे नऊ लाख कोटी बुडीत खात्यात; दहा वर्षांत आलेख चढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 11:00 IST

वाटप केलेले कर्ज वसूल झाले नसल्याने देशातील राष्ट्रीयीकृत बँकांचे ८ लाख ८४ हजार ६७९ कोटी रुपये बुडीत खात्यात गेले आहेत.

विलास गावंडे

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : वाटप केलेले कर्ज वसूल झाले नसल्याने देशातील राष्ट्रीयीकृत बँकांचे ८ लाख ८४ हजार ६७९ कोटी रुपये बुडीत खात्यात गेले आहेत. वसुलीसाठी घेतलेली मवाळ भूमिका, कारवाई करण्यात दाखविलेली उदासीनता यामुळे थकीत रकमेचा आकडा फुगत गेला आहे. मागील दहा वर्षांतील बुडीत कर्जाचे हे आकडे बँकांनी कर्जदारांवर दाखविलेले औदार्य दाखवतात. यामुळे काही बँका डबघाईसही आल्या आहेत.

नागपूर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संजय थूल यांनी माहितीच्या अधिकारात रिझर्व्ह बँकेला मागितलेल्या माहितीत बुडीत कर्जाचे आकडे पुढे आले आहेत. सन २०११-१२ या आर्थिक वर्षात राष्ट्रीयीकृत बँकांचे बुडीत कर्ज १५ हजार ५५१ कोटी रुपये एवढे होते. पुढील काळात बुडीत कर्ज वाढतच गेले आहे.

दहा वर्षांत सर्वाधिक कर्ज २०१८-१९ या वर्षात एक लाख ८३ हजार २०२ कोटी बुडीत खात्यात टाकण्यात आले आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात एक लाख ३१ हजार ८९४ कोटी रुपये बुडाल्याचे आरबीआयने दिलेल्या माहितीतून पुढे आले आहे. कर्जदारांची मालमत्ता विकून शिल्लक राहिलेली रक्कम बुडीत खात्यात गेली आहे.

वसुलीत उदासीनता, बेसुमार कर्जवाटप

१. राष्ट्रीयीकृत बँकांनी व्यावसायिक, उद्योजकांना बेसुमार कर्जवाटप केले.

२. वसुलीसाठी बँकांनी या कर्जदारांना दीर्घकाळपर्यंत मुभा दिली.

३. खासगी बँकांप्रमाणे वसुली मोहीम राबविण्यात राष्ट्रीयीकृत बँका अपयशी.

४. निव्वळ कागदोपत्री पत्रव्यवहार केल्याने वसुलीवर परिणाम.

५. कर्जदाराची उपयोगात न येणाऱ्या मालमत्तेची जप्ती. ती विकूनही कर्जवसुली अपूर्णच.

टॅग्स :bankबँकbusinessव्यवसाय