शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

राष्ट्रीयीकृत बँकांचे नऊ लाख कोटी बुडीत खात्यात; दहा वर्षांत आलेख चढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 11:00 IST

वाटप केलेले कर्ज वसूल झाले नसल्याने देशातील राष्ट्रीयीकृत बँकांचे ८ लाख ८४ हजार ६७९ कोटी रुपये बुडीत खात्यात गेले आहेत.

विलास गावंडे

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : वाटप केलेले कर्ज वसूल झाले नसल्याने देशातील राष्ट्रीयीकृत बँकांचे ८ लाख ८४ हजार ६७९ कोटी रुपये बुडीत खात्यात गेले आहेत. वसुलीसाठी घेतलेली मवाळ भूमिका, कारवाई करण्यात दाखविलेली उदासीनता यामुळे थकीत रकमेचा आकडा फुगत गेला आहे. मागील दहा वर्षांतील बुडीत कर्जाचे हे आकडे बँकांनी कर्जदारांवर दाखविलेले औदार्य दाखवतात. यामुळे काही बँका डबघाईसही आल्या आहेत.

नागपूर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संजय थूल यांनी माहितीच्या अधिकारात रिझर्व्ह बँकेला मागितलेल्या माहितीत बुडीत कर्जाचे आकडे पुढे आले आहेत. सन २०११-१२ या आर्थिक वर्षात राष्ट्रीयीकृत बँकांचे बुडीत कर्ज १५ हजार ५५१ कोटी रुपये एवढे होते. पुढील काळात बुडीत कर्ज वाढतच गेले आहे.

दहा वर्षांत सर्वाधिक कर्ज २०१८-१९ या वर्षात एक लाख ८३ हजार २०२ कोटी बुडीत खात्यात टाकण्यात आले आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात एक लाख ३१ हजार ८९४ कोटी रुपये बुडाल्याचे आरबीआयने दिलेल्या माहितीतून पुढे आले आहे. कर्जदारांची मालमत्ता विकून शिल्लक राहिलेली रक्कम बुडीत खात्यात गेली आहे.

वसुलीत उदासीनता, बेसुमार कर्जवाटप

१. राष्ट्रीयीकृत बँकांनी व्यावसायिक, उद्योजकांना बेसुमार कर्जवाटप केले.

२. वसुलीसाठी बँकांनी या कर्जदारांना दीर्घकाळपर्यंत मुभा दिली.

३. खासगी बँकांप्रमाणे वसुली मोहीम राबविण्यात राष्ट्रीयीकृत बँका अपयशी.

४. निव्वळ कागदोपत्री पत्रव्यवहार केल्याने वसुलीवर परिणाम.

५. कर्जदाराची उपयोगात न येणाऱ्या मालमत्तेची जप्ती. ती विकूनही कर्जवसुली अपूर्णच.

टॅग्स :bankबँकbusinessव्यवसाय