शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

सावळी रस्त्याची चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 05:00 IST

रस्त्याने दिवसरात्र ओव्हरलोड रेती वाहतूक केली जात आहे. रेतीची वाहने धावत आहे. रेती वाहतुकीने रस्त्याची पुरती वाट लागली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. परिणामी या रस्त्यावर नेहमी अपघात घडत आहे. त्यात अनेकांना अपंगत्व आले आहे. आर्णी ही बाजारपेठ व तालुक्याचे ठिकाण असल्याने याच रस्त्याने सावळीसदोबा परिसरातील जनतेला दररोज येथे यावे लागते.

ठळक मुद्देओव्हरलोड रेती वाहतूक : १५ गावातील ग्रामस्थांना नाहक त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : आर्णी ते सावळीसदोबा रसतयाची पूर्णत: चाळणी झाली आहे. रस्त ठिकठिकाणी उखडल्याने अपघातांत वाढ झाली आहे. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करणे कठीण झाले आहे.येथून सावळीसदोबाकडे जाताना प्रवाशांना दररोज जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. हा रस्ता तयार करण्यात आला, तेव्हापासूनच उखडण्यास सुरूवात झाली. विशेष म्हणजे या रस्त्याने दिवसरात्र ओव्हरलोड रेती वाहतूक केली जात आहे. रेतीची वाहने धावत आहे. रेती वाहतुकीने रस्त्याची पुरती वाट लागली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. परिणामी या रस्त्यावर नेहमी अपघात घडत आहे. त्यात अनेकांना अपंगत्व आले आहे.आर्णी ही बाजारपेठ व तालुक्याचे ठिकाण असल्याने याच रस्त्याने सावळीसदोबा परिसरातील जनतेला दररोज येथे यावे लागते. दररोज शेकडो नागरिक व विद्यार्थी दररोज या रस्त्याने ये-जा करतात. एसटी बस, अवैध प्रवासी वाहतूक वाहनेही याच रस्त्याने धावतात. मात्र रस्त्या पूर्णत: उखडल्याने दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांचे अपघात होत आहे. वाहन चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे या रस्त्याने होणारी रेती वाहतूक बंद करण्याची मागणी १५ गावांतील नागरिकांकडून होत आहे.नवीन रस्ता तयार करावाआर्णी ते सावळीसदोबा रस्त्याने रेतीची वाहतूक केली जाते. त्यामुळे रस्ता उखडला. आता नवीन रस्ता तयार करून द्यावा किंवा रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे. या रस्त्यावर जवळपास १५ गावे येतात. या गावांतील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन त्वरित उपाययोजना करावी, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा