शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

दिग्रस येथील वळण रस्ताच वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 22:18 IST

मुसळधार पावसामुळे दिग्रस शहर व देवनगरला जोडणारा वळण रस्ता धावंडा नदीच्या पुरात वाहून गेला. यामुळे देवनगरचा दिग्रस शहराशी संपर्क तुटला आहे.

ठळक मुद्देसंपर्क तुटला : देवनगरवासीय हवालदिल, शहरात जाण्यासाठी पडतो फेरा

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : मुसळधार पावसामुळे दिग्रस शहर व देवनगरला जोडणारा वळण रस्ता धावंडा नदीच्या पुरात वाहून गेला. यामुळे देवनगरचा दिग्रस शहराशी संपर्क तुटला आहे.दिग्रस-पुसद मार्गावर धावंडा नदीवरील पूल पाडून नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. हा मार्ग सध्या रहदारीकरिता बंद आहे. जड वाहनांची वाहतूक बायपासने वळविण्यात आली आहे, तर दुचाकी, लहान वाहने आणि पादचाऱ्यांकरिता तात्पुरता वळण रस्ता तयार करण्यात आला होता. संततधार पावसामुळे हा रस्ताच वाहून गेला. मुसळधार पावसामुळे धावंडा नदीला पूर आला. या पुराच्या प्रवाहाने वळण रस्ता वाहून गेला.सध्या पावसाळा असल्याने नवीन तात्पुरता वळण रस्ता तयार करणे शक्य नाही. त्यामुळे शहरातील संपूर्ण वाहतूक आता बायपासने वळविण्यात आली आहे. पूर्वी बायपासवरून केवळ जड वाहतूक वळविण्यात आली होती. आता हाच बायपास सर्व ाहतुकीसाठी वापरला जात आहे. तात्पुरता वळण रस्ता वाहून गेल्याने या धोकादायक रस्त्याने नदीपात्र ओलांडून कुणीही जावू नये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता बंद केला. या रस्त्याने कुणीही ये-जा करू नये, असे आवाहन शाखा अभियंता राजू चव्हाण यांनी केले.दोन किलोमीटरचा फेरातात्पुरता वळण रस्ता पुरामुळे वाहून गेल्याने बायपासने शहरात येण्यासाठी सर्वांना दोन किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे. देवनगरवासीयांना दोन किलोमीटर अंतर कापून शहरात यावे लागत आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. मागील वर्षीही अशीच स्थिती निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत येण्या-जाण्यास प्रचंड त्रास सहन करावा लागला.

टॅग्स :RainपाऊसYavatmalयवतमाळ