शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील एक लाख हेक्टर वनजमिनीवर रस्त्यांचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 12:45 IST

राज्यात साडेतीन लाख किलोमीटरचे रस्ते बांधले गेले असून त्याचे रूंदीकरण करण्यात आले आहे. हे रस्ते वनहद्दीतून गेल्याने एक लाख हेक्टर वनजमीन या रूंदीकरणात वापरली गेली.

ठळक मुद्देवनखात्याकडून जमिनीची शोधाशोध यवतमाळातील प्रकरणानंतर सारवासारव, सद्यस्थितीची माहिती मागितली

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यात साडेतीन लाख किलोमीटरचे रस्ते बांधले गेले असून त्याचे रूंदीकरण करण्यात आले आहे. हे रस्ते वनहद्दीतून गेल्याने एक लाख हेक्टर वनजमीन या रूंदीकरणात वापरली गेली. वनखात्याने या जमिनीची आता राज्यभर शोधाशोध चालविली आहे.राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक व केंद्रस्थ अधिकारी संजीव गौड यांनी १७ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व उपवनसंरक्षकांना पत्र पाठवून वनहद्दीतून गेलेल्या रस्त्यांची माहिती मागितली आहे. तत्पूर्वी शनिवार, १५ फेब्रुवारी रोजी गौड यांनी यवतमाळात भेट दिली. नागपूर-बोरी-तुळजापूर आणि धामणगाव रोड या रस्त्यांच्या रूंदीकरणात गेलेली वनजमीन, त्यावरील परिपक्व सागवान वृक्षांची झालेली तोड, त्याच्या लाकडाची डेपोवर न नेता परस्पर लावली गेलेली विल्हेवाट आदी बाबींची प्रत्यक्ष पाहणी केली. वनजमीन असताना ती वनजमीन नसल्याचे सांगणाऱ्या यवतमाळच्या उपवनसंरक्षकांना चार्जशीट देण्यात आली आहे. यवतमाळ प्रकरणाने रस्ता रूंदीकरणातील गौडबंगाल उघड झाल्याने गौड यांनी आता राज्यभरातच रस्ता बांधकामात गेलेल्या वनजमिनीची शोध मोहीम सुरू केली आहे. २५ आॅक्टोबर १९८० ला रस्त्यांची स्थिती काय होती आणि आज काय आहे, याबाबत माहिती मागितली आहे. शिवाय रस्ता रूंदीकरणाबाबत वनविभागाला मार्गदर्शक तत्त्वेही जारी करण्यात आली आहे.

सहा मीटरऐवजी थेट ४० मीटर मार्गअनेक राज्य मार्गांची रूंदी सहा मीटर असताना कंत्राटदार कंपन्यांच्या सोयीसाठी थेट ४० मीटर दाखवून रूंदीकरणाला ग्रीन सिग्नल दिला गेला. त्यात हजारो सागवान वृक्षांची कत्तल झाली. वनजमिनीचा केंद्राच्या परवानगीशिवाय वनेत्तर कामासाठी वापर झाला. आता या प्रकरणात वनअधिकाऱ्यांकडून वसुली होण्याची शक्यता आहे.बांधकाम खात्याच्या परिपत्रकाकडे दुर्लक्षराज्यात रस्त्यांच्या चौपदरीकरणाची व रूंदीकरणाची परवानगी देताना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या १९८१ च्या परिपत्रकाकडे दुर्लक्ष केले गेले. त्यावेळी राष्ट्रीय महामार्गाची रूंदी १२ मीटर, राज्य व जिल्हा मार्ग सहा मीटर, इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्ते पाच मीटर अशी निर्धारित करण्यात आली होती. केंद्रीय भुपृष्ट वाहतूक मंत्रालयाने अलीकडेच ही रूंदी राष्ट्रीय महामार्ग ६० मीटर, राज्य मार्ग ४५ मीटर, जिल्हा मार्ग ४० मीटर, इतर जिल्हा मार्ग २४ मीटर, तर ग्रामीण मार्ग १२ मीटर अशी निश्चित केली. मात्र ते लागू होण्यापुर्वीच त्याचा अनेक रस्त्यांसाठी वापर केला गेला.

टॅग्स :forestजंगल