शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

नदी गावात अन् पाणी डोळ्यांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 21:59 IST

प्रचंड मोठी नदी गावाशेजारून वाहते. पूर्वी तीच तहान भावीत होती. मात्र आता नदीचे वाळवंटात रूपांतर झाले. परिणामी ‘नदी गावात, पाणी डोळ्यांत’, अशी स्थिती पैनगंगा नदीकाठावरील गावांची झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी नदीत ठिकठिकाणी विहिरे खोदून महिला पाण्यासाठी पायपीट करीत आहे.

ठळक मुद्दे५५ गावांची फरपट : पाण्यासाठी पैनगंगा नदीत ठिकठिकाणी विहिरे

अविनाश खंदारे ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : प्रचंड मोठी नदी गावाशेजारून वाहते. पूर्वी तीच तहान भावीत होती. मात्र आता नदीचे वाळवंटात रूपांतर झाले. परिणामी ‘नदी गावात, पाणी डोळ्यांत’, अशी स्थिती पैनगंगा नदीकाठावरील गावांची झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी नदीत ठिकठिकाणी विहिरे खोदून महिला पाण्यासाठी पायपीट करीत आहे.विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून कधीकाळी बारमाही वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्राचे सध्या वाळवंटात रूपांतर झाले. इसापूर प्रकल्पासह अनेक लहान, मोठे बंधारे असलेल्या या नदीत खड्डे करून महिलांवर पाणी उपसण्याची वेळ आली. हंडाभर पाण्यासाठी महिलांची धडपड सुरू झाली. जीवनदायीनी असलेल्या नदी काठावरील किमान ५५ गावांमध्ये सध्या पाण्यासाठी सर्वांचीच भटकंती सुरू आहे. गावात नदी असताना पाणी मात्र बाया-बाप्यांच्या डोळ्यांमध्ये दिसत आहे.दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट गडद होते. पैनगंगा नदी काठच्या किमान ५५ गावांना पाणीटंचाईच्या झळा बसतात. मुरली, भांबरखेडा, तिवरंग, झाडगाव, हातला, दिवट, पिंंप्री, नागापूर, बारा, बेलखेड, कुपटी, बिटरगाव, चिंचोली, मार्लेगाव, लिंबगव्हाण, तिवडी, टाकळी, विडूळ, चालगणी, साखरा, खरूस, लोहरा, कारखेड, देवसरी, उंचवडद, दिघडी, चातारी, बोरी, कोपरा, मानकेश्वर, सोईट, गांजेगाव, सावळेश्वर, अकोली, पिंपळगाव, जेवली, मुरली, पैदा, टाकळी, बंदी, जवराळा, बोरी(वन), गाडी, सोनदाभी, मोरचंडी, मथुरानगर या नदी काठावरील गावांमध्ये पाण्यासाठी पायपीट करावी लागते.यंदा अपुºया पावसाने नदी लवकरच कोरडी पडली. परिणामी महिलांसह लहान मुलही भर उन्हात पाण्यासाठी वणवण भटकत आहे. मुरली येथे नदी पात्रात लहान-लहान खड्डे करून त्यात जमा होणारे पाणी भरण्यासाठी महिलांची दिवसभर गर्दी असते. पहाटे नदी पात्रात जाऊन खड्डा करायचा, तेथे घरातील लहान मुलांना बसवून खड्ड्यात जमा झालेले पाणी कळशीत भरायचे. चार-पाच कळशी भरल्या की घरातील दुसरी महिला नदीवर येते अन् भरलेल्या कळशी घेऊन जाते. हा क्रम दिवसभर सुरू असतो.पाणी शेवटपर्यंत पोहोचतच नाहीमुरली येथे ज्या ठिकाणी खड्ड्यातून महिला पाणी भरतात, त्याच पात्रात ५० फुटांवर भव्य असा कोल्हापुरी बंधारा आहे. मात्र त्यात पाणीच नाही. या नदीवर पुसद तालुक्यात इसापूर येथे मोठा प्रकल्प आहे. काठावरील गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली की, दरवर्षी प्रकल्पातील पिण्यासाठी आरक्षित पाणी नदीत सोडले जाते. मात्र त्यातून प्रकल्प परिसरातील काही गावांचीच तहान भागते. नदी पात्रातून अखेरच्या गावापर्यंत पाणी पोहोचत नसल्याने इतर गावांमध्ये पाण्याचे दुर्भीक्ष्य कायम असते.इसापूर प्रकल्पातील पिण्यासाठी आरक्षित असलेले पाणी या गावांसाठी नदी पात्रात सोडले जात आहे. विहीर अधिग्रहण, टँकरसाठी संबंधित गावांतील ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार कारवाई सुरू आहे. ठराव आल्याशिवाय प्रशासन पुढील कारवाई करू शकत नाही. पाणीटंचाई निवारणार्थ नागरिकांनाही सहकार्य करावे.- स्वप्निल कापडणीसउपविभागीय अधिकारी, उमरखेड

टॅग्स :water shortageपाणीटंचाई