शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
2
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
3
“मनसेचा आघाडीचा प्रस्ताव नाही, आम्हाला महाराष्ट्र धर्म शिकवू नये”; काँग्रेस नेत्यांचे उत्तर
4
निवडणूक न लढताच 'जीन्स-शर्ट'मधील तरुणाने घेतली मंत्रिपदाची शपथ! कोण आहेत दीपक प्रकाश?
5
IIT दिल्लीमध्ये देशातील पहिल्या ‘Gen-Z पोस्ट ऑफिस’ची सुरुवात; Wifi, QR द्वारे पार्सल बुकिंग
6
"आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!"; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान
7
Tesla Model Y सेफ्टी टेस्टमध्ये 'Pass' की 'Fail'? 5-स्टार रेटिंगमध्ये किती पॉइंट्स मिळाले? जाणून घ्या
8
“बिहारने जंगलराज नाकारून विकासाला मत दिले”; शिंदेंनी केले PM मोदी-नितीश कुमारांचे अभिनंदन
9
Metaचे मोठे पाऊल! WhatsApp मध्ये लवकरच येणार 'हे' जबरदस्त फीचर; वारंवार लॉग-इन करण्याची कटकट संपणार
10
मुलांच्या भविष्यासाठी सोने की SIP? 'या' दोन्ही पर्यायांचे फायदे-तोटे समजून घ्या आणि योग्य गुंतवणूक निवडा!
11
...त्यामुळे सर्व छोट्या मोठ्या कुरुबरी अमित शाह यांना जाऊन सांगितल्या जातात; काँग्रेसचा टोला
12
जम्मूमध्ये 'काश्मीर टाईम्स'च्या कार्यालयावर SIA चा मोठा छापा; AK-47 च्या गोळ्या आणि ग्रेनेडचा लिव्हर जप्त!
13
बाजारात तेजीचा डबल धमका! निफ्टी वर्षभरानंतर २६,२०० पार, गुंतवणूकदारांची ६८,००० कोटींची कमाई
14
Red Fort Blast: दिल्लीतील स्फोट प्रकरणात आणखी चार प्रमुख आरोपींना अटक, एनआयएची मोठी कारवाई
15
सप्तपदी झाले, डीजेवर नाचली, पाठवणीच्या वेळी पसार, नवरदेव म्हणतो, "जमीन गहाण ठेवून लग्न..."
16
दिल्ली दंगल सूनियोजित कट होता; उमर खालिद-शरजील इमामच्या जामिनास पोलिसांचा विरोध
17
अ‍ॅसिड हल्ल्यातील 'ममता'चा अखेर मृत्यू; फेसबुकवर वेदना मांडणाऱ्या आईची दोन मुले झाली पोरकी
18
नेपाळमध्ये पुन्हा एकदा Gen-Z रस्त्यावर उतरले, मोठा गोंधळ सुरू; कर्फ्यू लागू
19
EVM मध्ये ३६ मतांची आघाडी, पण ३६० पोस्टल मते बाद झाली आणि पारडे फिरले, बिहारमधील अजब निकाल चर्चेत
20
Supreme Court: संसद न्यायालयीन निर्णयावर कुरघोडी करू शकत नाही; लवाद सुधारणा कायद्याच्या तरतुदी सुप्रीम कोर्टाकडून रद्द
Daily Top 2Weekly Top 5

नदी गावात अन् पाणी डोळ्यांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 21:59 IST

प्रचंड मोठी नदी गावाशेजारून वाहते. पूर्वी तीच तहान भावीत होती. मात्र आता नदीचे वाळवंटात रूपांतर झाले. परिणामी ‘नदी गावात, पाणी डोळ्यांत’, अशी स्थिती पैनगंगा नदीकाठावरील गावांची झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी नदीत ठिकठिकाणी विहिरे खोदून महिला पाण्यासाठी पायपीट करीत आहे.

ठळक मुद्दे५५ गावांची फरपट : पाण्यासाठी पैनगंगा नदीत ठिकठिकाणी विहिरे

अविनाश खंदारे ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : प्रचंड मोठी नदी गावाशेजारून वाहते. पूर्वी तीच तहान भावीत होती. मात्र आता नदीचे वाळवंटात रूपांतर झाले. परिणामी ‘नदी गावात, पाणी डोळ्यांत’, अशी स्थिती पैनगंगा नदीकाठावरील गावांची झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी नदीत ठिकठिकाणी विहिरे खोदून महिला पाण्यासाठी पायपीट करीत आहे.विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून कधीकाळी बारमाही वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्राचे सध्या वाळवंटात रूपांतर झाले. इसापूर प्रकल्पासह अनेक लहान, मोठे बंधारे असलेल्या या नदीत खड्डे करून महिलांवर पाणी उपसण्याची वेळ आली. हंडाभर पाण्यासाठी महिलांची धडपड सुरू झाली. जीवनदायीनी असलेल्या नदी काठावरील किमान ५५ गावांमध्ये सध्या पाण्यासाठी सर्वांचीच भटकंती सुरू आहे. गावात नदी असताना पाणी मात्र बाया-बाप्यांच्या डोळ्यांमध्ये दिसत आहे.दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट गडद होते. पैनगंगा नदी काठच्या किमान ५५ गावांना पाणीटंचाईच्या झळा बसतात. मुरली, भांबरखेडा, तिवरंग, झाडगाव, हातला, दिवट, पिंंप्री, नागापूर, बारा, बेलखेड, कुपटी, बिटरगाव, चिंचोली, मार्लेगाव, लिंबगव्हाण, तिवडी, टाकळी, विडूळ, चालगणी, साखरा, खरूस, लोहरा, कारखेड, देवसरी, उंचवडद, दिघडी, चातारी, बोरी, कोपरा, मानकेश्वर, सोईट, गांजेगाव, सावळेश्वर, अकोली, पिंपळगाव, जेवली, मुरली, पैदा, टाकळी, बंदी, जवराळा, बोरी(वन), गाडी, सोनदाभी, मोरचंडी, मथुरानगर या नदी काठावरील गावांमध्ये पाण्यासाठी पायपीट करावी लागते.यंदा अपुºया पावसाने नदी लवकरच कोरडी पडली. परिणामी महिलांसह लहान मुलही भर उन्हात पाण्यासाठी वणवण भटकत आहे. मुरली येथे नदी पात्रात लहान-लहान खड्डे करून त्यात जमा होणारे पाणी भरण्यासाठी महिलांची दिवसभर गर्दी असते. पहाटे नदी पात्रात जाऊन खड्डा करायचा, तेथे घरातील लहान मुलांना बसवून खड्ड्यात जमा झालेले पाणी कळशीत भरायचे. चार-पाच कळशी भरल्या की घरातील दुसरी महिला नदीवर येते अन् भरलेल्या कळशी घेऊन जाते. हा क्रम दिवसभर सुरू असतो.पाणी शेवटपर्यंत पोहोचतच नाहीमुरली येथे ज्या ठिकाणी खड्ड्यातून महिला पाणी भरतात, त्याच पात्रात ५० फुटांवर भव्य असा कोल्हापुरी बंधारा आहे. मात्र त्यात पाणीच नाही. या नदीवर पुसद तालुक्यात इसापूर येथे मोठा प्रकल्प आहे. काठावरील गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली की, दरवर्षी प्रकल्पातील पिण्यासाठी आरक्षित पाणी नदीत सोडले जाते. मात्र त्यातून प्रकल्प परिसरातील काही गावांचीच तहान भागते. नदी पात्रातून अखेरच्या गावापर्यंत पाणी पोहोचत नसल्याने इतर गावांमध्ये पाण्याचे दुर्भीक्ष्य कायम असते.इसापूर प्रकल्पातील पिण्यासाठी आरक्षित असलेले पाणी या गावांसाठी नदी पात्रात सोडले जात आहे. विहीर अधिग्रहण, टँकरसाठी संबंधित गावांतील ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार कारवाई सुरू आहे. ठराव आल्याशिवाय प्रशासन पुढील कारवाई करू शकत नाही. पाणीटंचाई निवारणार्थ नागरिकांनाही सहकार्य करावे.- स्वप्निल कापडणीसउपविभागीय अधिकारी, उमरखेड

टॅग्स :water shortageपाणीटंचाई