शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

नदी गावात अन् पाणी डोळ्यांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 21:59 IST

प्रचंड मोठी नदी गावाशेजारून वाहते. पूर्वी तीच तहान भावीत होती. मात्र आता नदीचे वाळवंटात रूपांतर झाले. परिणामी ‘नदी गावात, पाणी डोळ्यांत’, अशी स्थिती पैनगंगा नदीकाठावरील गावांची झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी नदीत ठिकठिकाणी विहिरे खोदून महिला पाण्यासाठी पायपीट करीत आहे.

ठळक मुद्दे५५ गावांची फरपट : पाण्यासाठी पैनगंगा नदीत ठिकठिकाणी विहिरे

अविनाश खंदारे ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : प्रचंड मोठी नदी गावाशेजारून वाहते. पूर्वी तीच तहान भावीत होती. मात्र आता नदीचे वाळवंटात रूपांतर झाले. परिणामी ‘नदी गावात, पाणी डोळ्यांत’, अशी स्थिती पैनगंगा नदीकाठावरील गावांची झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी नदीत ठिकठिकाणी विहिरे खोदून महिला पाण्यासाठी पायपीट करीत आहे.विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून कधीकाळी बारमाही वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्राचे सध्या वाळवंटात रूपांतर झाले. इसापूर प्रकल्पासह अनेक लहान, मोठे बंधारे असलेल्या या नदीत खड्डे करून महिलांवर पाणी उपसण्याची वेळ आली. हंडाभर पाण्यासाठी महिलांची धडपड सुरू झाली. जीवनदायीनी असलेल्या नदी काठावरील किमान ५५ गावांमध्ये सध्या पाण्यासाठी सर्वांचीच भटकंती सुरू आहे. गावात नदी असताना पाणी मात्र बाया-बाप्यांच्या डोळ्यांमध्ये दिसत आहे.दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट गडद होते. पैनगंगा नदी काठच्या किमान ५५ गावांना पाणीटंचाईच्या झळा बसतात. मुरली, भांबरखेडा, तिवरंग, झाडगाव, हातला, दिवट, पिंंप्री, नागापूर, बारा, बेलखेड, कुपटी, बिटरगाव, चिंचोली, मार्लेगाव, लिंबगव्हाण, तिवडी, टाकळी, विडूळ, चालगणी, साखरा, खरूस, लोहरा, कारखेड, देवसरी, उंचवडद, दिघडी, चातारी, बोरी, कोपरा, मानकेश्वर, सोईट, गांजेगाव, सावळेश्वर, अकोली, पिंपळगाव, जेवली, मुरली, पैदा, टाकळी, बंदी, जवराळा, बोरी(वन), गाडी, सोनदाभी, मोरचंडी, मथुरानगर या नदी काठावरील गावांमध्ये पाण्यासाठी पायपीट करावी लागते.यंदा अपुºया पावसाने नदी लवकरच कोरडी पडली. परिणामी महिलांसह लहान मुलही भर उन्हात पाण्यासाठी वणवण भटकत आहे. मुरली येथे नदी पात्रात लहान-लहान खड्डे करून त्यात जमा होणारे पाणी भरण्यासाठी महिलांची दिवसभर गर्दी असते. पहाटे नदी पात्रात जाऊन खड्डा करायचा, तेथे घरातील लहान मुलांना बसवून खड्ड्यात जमा झालेले पाणी कळशीत भरायचे. चार-पाच कळशी भरल्या की घरातील दुसरी महिला नदीवर येते अन् भरलेल्या कळशी घेऊन जाते. हा क्रम दिवसभर सुरू असतो.पाणी शेवटपर्यंत पोहोचतच नाहीमुरली येथे ज्या ठिकाणी खड्ड्यातून महिला पाणी भरतात, त्याच पात्रात ५० फुटांवर भव्य असा कोल्हापुरी बंधारा आहे. मात्र त्यात पाणीच नाही. या नदीवर पुसद तालुक्यात इसापूर येथे मोठा प्रकल्प आहे. काठावरील गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली की, दरवर्षी प्रकल्पातील पिण्यासाठी आरक्षित पाणी नदीत सोडले जाते. मात्र त्यातून प्रकल्प परिसरातील काही गावांचीच तहान भागते. नदी पात्रातून अखेरच्या गावापर्यंत पाणी पोहोचत नसल्याने इतर गावांमध्ये पाण्याचे दुर्भीक्ष्य कायम असते.इसापूर प्रकल्पातील पिण्यासाठी आरक्षित असलेले पाणी या गावांसाठी नदी पात्रात सोडले जात आहे. विहीर अधिग्रहण, टँकरसाठी संबंधित गावांतील ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार कारवाई सुरू आहे. ठराव आल्याशिवाय प्रशासन पुढील कारवाई करू शकत नाही. पाणीटंचाई निवारणार्थ नागरिकांनाही सहकार्य करावे.- स्वप्निल कापडणीसउपविभागीय अधिकारी, उमरखेड

टॅग्स :water shortageपाणीटंचाई