शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! वरळी डोमच्या बाहेर तुफान गर्दी, अनेक नेते प्रवेशद्वारावरच अडकले
2
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
3
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
4
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
5
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
6
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
7
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
8
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
9
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
10
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
11
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
12
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
13
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
14
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
15
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
16
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
17
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
18
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
20
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी

‘संग्राम’बाबत सुधारित धोरण

By admin | Updated: November 6, 2015 03:47 IST

ई-पंचायत हा एक मिशनमोड प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी तेराव्या वित्त आयोगाचा निधी

यवतमाळ : ई-पंचायत हा एक मिशनमोड प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी तेराव्या वित्त आयोगाचा निधी वापरण्याच्या मार्गदर्शक सूचना आहेत. तेराव्या वित्त आयोगाचा निधी वापरास व प्रचलित धोरणानुसार ई-पंचायत प्रकल्प अंमलबजावणीस ३१ आॅक्टोंबर २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच तेराव्या वित्त आयोगाच्या निधीच्या वापरास ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. संग्राम प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे सुधारित धोरण ठरविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सुधारीत धोरण तयार होऊन अंमलबजावणीसाठी आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता लक्षात घेता, प्रचलित धोरणानुसार ई पंचायत (संग्राम प्रकल्प) अंमलबजावणीस मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व जिल्हा परिषदांनी संग्राम प्रकल्प अंमलबजावणीसाठी तेराव्या वीत्त आयोगातून निधी राखून ठेवण्याबाबतच्या स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत. संग्राम दोन प्रकल्पाचे सुधारित धोरण ठरविण्याबाबतची कार्यवाही सुरू असल्याने ही मुदतवाढ देण्यात आली. संग्राम दोन साठीच्या सूचना प्राप्त होईपर्यंत अद्यापही काही कालावधीसाठी जिल्हा परिषदांनी प्रचलित धोरणानुसार तेराव्या वीत्त आयोगातून पुरेसा निधी राखीव ठेवण्याची तजवीज करण्याबाबतच्या सूचना जिल्हा परिषदांना निर्गमित करण्यात आल्या आहेत. संग्राम प्रकल्प अंमलबजावणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पुरेसा निधी राखीव राहील, यासाठी मुख्य लेखा व वीत्त अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना शासनाच्या ग्राम विकास विभागाने केल्या आहेत. ग्रामविकास विभागातर्फे संग्राम (संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र) ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील कामे अतिशय वेगाने व्हावी यासाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेमध्ये महाराष्ट्रातील ३३ जिल्हा परिषदा, ३५१ पंचायत समिती आणि २७ हजार ८९६ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत आॅनलाईन सेवा पोहोचावी आणि त्यांना योजनांचा लाभ मिळावा, हा यामागील हेतू आहे. (प्रतिनिधी)महाआॅनलाईनची महत्त्वपूर्ण जबाबदारी४महाआॅनलाईनने सन २०१५-१६ या आर्थिक वर्षातील प्रकल्पाच्या अनुषंगिक सर्व दहा मोड्युलचे डेट्रा एन्ट्रीचे काम पूर्णपणे अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाआॅनलाईनने या प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिलेल्या तांत्रिक मनुष्यबळाचे मानधन देण्याची जबाबदारी महाआॅनलाईनचीच असल्याने महाआॅनलाईनने देखील सर्व तांत्रिक मनुष्यबळाला विहित मोबदला वेळेत अदा करण्याची खबरदारी घ्यावी. तांत्रिक मनुष्यबळ व त्यांना अदा करावयाचा मोबदला या प्रकरणात काही बाबी उद्भवल्यास त्याचा निपटारा करण्याची जबाबदारी महाआॅनलाईकडेच देण्यात आली आहे. ताळमेळ व थकबाकी बाबत स्पष्ट सूचना शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आहेत. तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारेही महाआॅनलाईन व जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना संयुक्तपणे मार्गदर्शन करण्यात आलेले असल्याचेही ग्रामीण विकास विभागाने स्पष्ट केले आहे.